शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

शेतकऱ्यांना दिला खत बचतीचा मूलमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : मृदा आराेग्य जपण्यासाठी पिकांना देण्यात येणारी खते याेग्य प्रमाणात वापरल्यास जमिनीचा पाेत बिघडणार नाही. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : मृदा आराेग्य जपण्यासाठी पिकांना देण्यात येणारी खते याेग्य प्रमाणात वापरल्यास जमिनीचा पाेत बिघडणार नाही. शिवाय त्यामुळे उत्पादनही भरघाेस मिळेल. पिकांना आवश्यक असलेल्या रासायनिक खतांमध्ये इतर पर्याय वापरल्यास १० टक्के खताची बचत करता येईल, असा मूलमंत्र कृषी संजीवनी माेहिमेंतर्गत शेतकऱ्यांना दिला जात आहे.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत २१ जून ते १ जुलैपर्यंत तालुक्यात कृषी संजीवनी माेहीम राबविली जात आहे. कृषी विभागाची चमू प्रत्येक गावागावात दाखल हाेत पी. उत्पादन तंत्रज्ञानातील बाबींबाबत मेळावे घेत आहेत. या माेहिमेंतर्गत नवेगाव (देशमुख) येथे मार्गदर्शन सभेचे आयाेजन करण्यात आले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी पी. एन. डाखळे, तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे, मंडळ अधिकारी श्याम गिरी, कृषी पर्यवेक्षक संदीप झाडे, कृषी सेवक सचिन टावरी, शेतकरी कवडू गायकवाड आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना विविध बाबींवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाच टक्के निंबोळी अर्क तयार करून फवारणी करणे, रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीनची पेरणी करणे, एकात्मिक किड व्यवस्थापन, पक्षी थांब्याचा वापर करणे आदी कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना अवगत करण्यात आले. यावेळी दिनेश चौधरी यांच्या शेतातील सरी वरंबा पद्धतीने लागवड केलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली. पिकांना द्यावयाच्या खत मात्रेत १० टक्के बचत करून त्याएवेजी सेंद्रिय खत, गांडुळ खत वापरणे, जिवाणू संवर्धकाची बियाण्याला बीजप्रक्रिया करणे, हिरवळीच्या खतांचा वापर करणे, पिकांना फवारणीद्वारे खत देणे आदी पर्यायांचा वापर करता येतो, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे यांनी दिली. यावेळी माेठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते.