शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
3
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
5
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
6
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
7
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
8
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
9
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
10
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
11
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
12
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
13
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
14
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
15
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
16
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
17
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
19
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
20
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार

शेतकऱ्यांना दिला खत बचतीचा मूलमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : मृदा आराेग्य जपण्यासाठी पिकांना देण्यात येणारी खते याेग्य प्रमाणात वापरल्यास जमिनीचा पाेत बिघडणार नाही. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : मृदा आराेग्य जपण्यासाठी पिकांना देण्यात येणारी खते याेग्य प्रमाणात वापरल्यास जमिनीचा पाेत बिघडणार नाही. शिवाय त्यामुळे उत्पादनही भरघाेस मिळेल. पिकांना आवश्यक असलेल्या रासायनिक खतांमध्ये इतर पर्याय वापरल्यास १० टक्के खताची बचत करता येईल, असा मूलमंत्र कृषी संजीवनी माेहिमेंतर्गत शेतकऱ्यांना दिला जात आहे.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत २१ जून ते १ जुलैपर्यंत तालुक्यात कृषी संजीवनी माेहीम राबविली जात आहे. कृषी विभागाची चमू प्रत्येक गावागावात दाखल हाेत पी. उत्पादन तंत्रज्ञानातील बाबींबाबत मेळावे घेत आहेत. या माेहिमेंतर्गत नवेगाव (देशमुख) येथे मार्गदर्शन सभेचे आयाेजन करण्यात आले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी पी. एन. डाखळे, तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे, मंडळ अधिकारी श्याम गिरी, कृषी पर्यवेक्षक संदीप झाडे, कृषी सेवक सचिन टावरी, शेतकरी कवडू गायकवाड आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना विविध बाबींवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाच टक्के निंबोळी अर्क तयार करून फवारणी करणे, रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीनची पेरणी करणे, एकात्मिक किड व्यवस्थापन, पक्षी थांब्याचा वापर करणे आदी कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना अवगत करण्यात आले. यावेळी दिनेश चौधरी यांच्या शेतातील सरी वरंबा पद्धतीने लागवड केलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली. पिकांना द्यावयाच्या खत मात्रेत १० टक्के बचत करून त्याएवेजी सेंद्रिय खत, गांडुळ खत वापरणे, जिवाणू संवर्धकाची बियाण्याला बीजप्रक्रिया करणे, हिरवळीच्या खतांचा वापर करणे, पिकांना फवारणीद्वारे खत देणे आदी पर्यायांचा वापर करता येतो, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे यांनी दिली. यावेळी माेठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते.