शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
3
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
5
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
8
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
9
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
10
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
11
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
12
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
13
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
14
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
15
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
16
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
17
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
18
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांना दिला खत बचतीचा मूलमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : मृदा आराेग्य जपण्यासाठी पिकांना देण्यात येणारी खते याेग्य प्रमाणात वापरल्यास जमिनीचा पाेत बिघडणार नाही. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : मृदा आराेग्य जपण्यासाठी पिकांना देण्यात येणारी खते याेग्य प्रमाणात वापरल्यास जमिनीचा पाेत बिघडणार नाही. शिवाय त्यामुळे उत्पादनही भरघाेस मिळेल. पिकांना आवश्यक असलेल्या रासायनिक खतांमध्ये इतर पर्याय वापरल्यास १० टक्के खताची बचत करता येईल, असा मूलमंत्र कृषी संजीवनी माेहिमेंतर्गत शेतकऱ्यांना दिला जात आहे.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत २१ जून ते १ जुलैपर्यंत तालुक्यात कृषी संजीवनी माेहीम राबविली जात आहे. कृषी विभागाची चमू प्रत्येक गावागावात दाखल हाेत पी. उत्पादन तंत्रज्ञानातील बाबींबाबत मेळावे घेत आहेत. या माेहिमेंतर्गत नवेगाव (देशमुख) येथे मार्गदर्शन सभेचे आयाेजन करण्यात आले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी पी. एन. डाखळे, तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे, मंडळ अधिकारी श्याम गिरी, कृषी पर्यवेक्षक संदीप झाडे, कृषी सेवक सचिन टावरी, शेतकरी कवडू गायकवाड आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना विविध बाबींवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाच टक्के निंबोळी अर्क तयार करून फवारणी करणे, रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीनची पेरणी करणे, एकात्मिक किड व्यवस्थापन, पक्षी थांब्याचा वापर करणे आदी कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना अवगत करण्यात आले. यावेळी दिनेश चौधरी यांच्या शेतातील सरी वरंबा पद्धतीने लागवड केलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली. पिकांना द्यावयाच्या खत मात्रेत १० टक्के बचत करून त्याएवेजी सेंद्रिय खत, गांडुळ खत वापरणे, जिवाणू संवर्धकाची बियाण्याला बीजप्रक्रिया करणे, हिरवळीच्या खतांचा वापर करणे, पिकांना फवारणीद्वारे खत देणे आदी पर्यायांचा वापर करता येतो, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे यांनी दिली. यावेळी माेठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते.