शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

पायल्या बुजल्यात, पूलही उखडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:08 IST

भिवापूर : भिवापूर तालुक्यातील मेढा आणि झिलबोडी या दोन गावांना जोडणाऱ्या नदीवरील पुलाच्या पायल्या रेतीमुळे आणि वाहून आलेल्या काटेरी ...

भिवापूर : भिवापूर तालुक्यातील मेढा आणि झिलबोडी या दोन गावांना जोडणाऱ्या नदीवरील पुलाच्या पायल्या रेतीमुळे आणि वाहून आलेल्या काटेरी झुडूपांमुळे बुजल्या आहेत. तर पुलावरील भागही उखडला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून लोखंडी सळाकी बाहेर आल्या आहेत. त्यामुळे थोडासा पाऊस पडला तरी या दोन गावांचा संपर्क तुटतो. मेढा आणि झिलबोडी या दोन गावांना जोडणाऱ्या मार्गावर नदी आहे. त्यावर पाच ते आठ पायल्यांचा पूल आहे. अधिक काळ उलटल्यामुळे पुलाची दुरवस्था झाली आहे.

नदीपात्रातील गाळ व झाडाझुडूपांचा गुंता खोलवर गुंतल्यामुळे पुलाच्या पायल्या बुजल्या आहेत. पाणी वाहून जाण्याकरिता जागाच मिळत नसल्यामुळे नदीपात्रात नेहमी पाणी साचून राहते. अशातच आता पाऊस झाल्याने नदीपात्रातील पाणी पुलावरून फेकल्या जात आहे. त्यामुळे दोन्ही गावांची अंतर्गत वाहतूक वारंवार ठप्प होत आहे. हा पूल जीर्ण झाला असून मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता सुध्दा बळावली आहे. दोन गावांना जोडणारा हा मार्ग तालुकास्थळी येण्याकरिता इतर गावांना सुध्दा तितकाच महत्वाचा ठरतो. चंद्रपूर जिल्ह्यातील अंतर्गत वाहतूकही याच मार्गाने होते. त्यामुळे या पुलाच्या पायल्यांची तात्काळ सफाई करून दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

---------------------------------------------

तरुणांनीच घेतला पुढाकार

पुलाच्या जीर्णावस्थेबाबत ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी केल्यात. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधींनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेरीस गावातील तरुणांनीच पुढाकार घेत श्रमदान केले. नदीपात्र भरले असतानाही पुलाच्या पायल्यात अडकलेली झुडूपे शक्य तेवढी बाहेर काढून पाण्याच्या प्रवाहाला वाट मोकळी करून दिली. येथील धोकादायक लोखंडी सळाकी सुध्दा या तरुणांनी कटरने कापल्या. त्यामुळे तात्पूरता दिलासा मिळाला आहे. मात्र येथेच न थांबता प्रशासनाने पुलाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. श्रमदान करणाऱ्या मंडळीत वैभव लाखे, आशिष ठाकरे, शुभम राऊत, रितिक इरदंडे, महेंद्र घोडमारे, गणेश राऊत, संकेत भोगे, तुषार खोब्रागडे, आदित्य खंडाळ, लोकेश चौधरी, निखिल खोब्रागडे आदींचा सहभाग होता.