शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनाला गर्दी करूनच देशभक्तीची भावना व्यक्त होते का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:13 IST

- प्रशासकीय अधिकारी : शासकीय दिशानिर्देशांचे पालन करून ध्वजारोहणाचे कार्यक्रम करा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गर्दी करूनच देशभक्ती ...

- प्रशासकीय अधिकारी : शासकीय दिशानिर्देशांचे पालन करून ध्वजारोहणाचे कार्यक्रम करा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गर्दी करूनच देशभक्ती व्यक्त होते का, असा सवाल उपस्थित करत स्थानिक प्रशासन व विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी कोरोना संक्रमणाच्या स्थितीचा धाक दाखवला आहे. शासकीय नियम पाळा, सन्मानाने ध्वजारोहण करा आणि देशभक्तीची भावना व्यक्त करा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले आहे.

गेल्या दीड वर्षापासून कोरोना संक्रमणाचा प्रकोप बघता लॉकडाऊन व कठोर दिशानिर्देश लागू आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यदिनोत्सवाचे आयोजन सर्वसामान्यांसाठी बंद होते. यंदा मात्र, संक्रमणाचा ज्वर ओसरला आहे आणि व्यापारही रात्री १० वाजतापर्यंत सुरू आहेत. त्यामुळे, यंदा स्वातंत्र्योत्सवाचा जल्लोष करण्याची इच्छा अनेकांची आहे. परंतु, प्रशासनाने जाहीर केलेल्या कोविड प्रोटोकॉलनुसारच हा सोहळा आयोजित करता येणार आहे.

स्वत:च्या सुरक्षेसाठी घ्या काळजी ()

राज्यात काही जिल्ह्यात डेल्टा व्हेरिएंटचे संक्रमण पसरत आहे. त्यामुळे, भीतीचे वातावरण संपलेले नाही. त्याच कारणात्सव यंदा जल्लोष करण्यास परवानगी दिलेली नाही. मात्र, ध्वजारोहणाची परवानगी आहे. नागरिकांनी हे नियम स्वत:च्या सुरक्षेसाठी पाळावे.

- विमला आर. - जिल्हाधिकारी

कार्यक्रमांना आवरणे गरजेचे ()

संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने, सजगता गरजेची आहे. त्यामुळेच, प्रशासनाने कार्यक्रमांना आवरणे गरजेचे आहे. ध्वजारोहण जरूर करा. मात्र, कार्यक्रमांचे आयोजन नको. गर्दी वाढेल तर धोकाही वाढेल. म्हणून संक्रमणापासून बचाव करणे, ही काळाची गरज आहे.

- डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता मेडिकल

मोठ्या आयोजनांना परवानगी नाही ()

शासकीय निर्देशानुसार मोठ्या कार्यक्रमांना परवानगी नाही. नागरिक या नात्याने स्वातंत्र्योत्सव साजरा होणारच. मात्र, नियमानुसार करावा. शासकीय दिशानिर्देशानुसारच कमाल ५० लोकांच्या उपस्थितीत ध्वजारोहणास परवानगी आहे.

- दयाशंकर तिवारी, महापौर

कोरोना संपलेला नाही ()

कोरोना संक्रमणाचा दर कमी झाला असला तरी संक्रमण संपलेले नाही. त्यामुळेच कोरोना संक्रमणापासून बचावासाठी जे नियम लागू केले आहेत, त्याच दिशानिर्देशानुसार जिल्हा १५ ऑगस्टचा सोहळा साजरा केला जाईल.

- रश्मी बर्वे, अध्यक्ष, नागपूर जिल्हा परिषद

..............