शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कोरोनाच्या भीतीने तिरडीला खांदेकरीही मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:09 IST

कुही : कोरोनाने नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. शेजारचा एखादा माणूस मृत झाला तरी त्याला कुणीही पाहायलासुद्धा जात ...

कुही : कोरोनाने नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. शेजारचा एखादा माणूस मृत झाला तरी त्याला कुणीही पाहायलासुद्धा जात नाही. एवढेच काय तर त्याच्या तिरडीला साधे खांदेकरी मिळेनासे झाले आहेत. शेवटी मृतकाचे पार्थिव स्मशानभूमीत पोहचविण्यासाठी ट्रॅक्टरचा आधार घ्यावा लागतो.

मांढळ येथील वाॅर्ड क्र. २ मध्ये कचरा वेचणाऱ्या रामू चव्हाण यांची पत्नी सविता चव्हाण (३५) हिचा बुधवारी अल्प आजाराने मृत्यू झाला. मात्र, कोरोनाच्या भीतीने कुणीही तिला पाहायला गेले नाही. तिच्या अंत्यसंस्काराची वेळ आली. परंतु, कुणीही पुढे येत नव्हते. ग्रामपंचायत सदस्य राजेश तिवस्कर यांनी पुढाकार घेऊन तिच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. मात्र, त्यांच्या मदतीला वाॅर्डातील कोणीही आलेले नाही. शेवटी त्यांनी विटांच्या भट्टीवरील दोन माणसांना सोबत घेतले व आपल्याच ट्रॅक्टरवर सविता हिचे पार्थिव स्मशानभूमीत नेत अंत्यसंस्कार पार पाडले.

भारतीय संस्कृतीप्रमाणे कुणी आपला विरोधकही असेल तरी त्याच्या तोरणी किंवा मरणी हजर राहावे, अशी रीत आहे. शत्रू असेल तरी मृत्यूनंतर विरोध संपला, असे समजून अंत्यविधीला जातात. मात्र कोरोनाने भारतीय संस्कृतीतील या चांगल्या परंपरेला अडसर निर्माण करणारी परिस्थिती आणली आहे. एकीकडे लग्न व अंत्यविधीतील गर्दीतून संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने काही नियम कडक केले आहेत. मात्र, आपल्याला संसर्ग होईल, या भीतीने जवळचे लोक ही मृतदेहाजवळ येत नाही, ही वास्तविकता आहे. मागील आठवड्यात चिकणा येथे एकाचे वृद्धापकाळाने निधन झाले. खांदेकरी न मिळाल्याने घरच्यांनी पार्थिव बैलबंडीत टाकून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पाडले. यावर ग्रामपंचायत कर्मचारी प्रवीण कळंबे यांनी खेद व्यक्त केला. जी व्यक्ती बाधित नसेल, नैसर्गिक आजाराने मृत्यू झाला असेल, त्याही व्यक्तीजवळ जाण्यास कुणी तयार नाहीत. सामाजिक रुढीप्रमाणे ग्रामीण भागात बांबूची तिरडी करून त्यावर पार्थिव ठेवत स्मशानभूमीपर्यंत खांदेकरी नेतात. मात्र, कोरोनाच्या भीतीने खांदेकरी मिळत नाही, हे वास्तव आहे.