शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या भीतीने तिरडीला खांदेकरीही मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:09 IST

कुही : कोरोनाने नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. शेजारचा एखादा माणूस मृत झाला तरी त्याला कुणीही पाहायलासुद्धा जात ...

कुही : कोरोनाने नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. शेजारचा एखादा माणूस मृत झाला तरी त्याला कुणीही पाहायलासुद्धा जात नाही. एवढेच काय तर त्याच्या तिरडीला साधे खांदेकरी मिळेनासे झाले आहेत. शेवटी मृतकाचे पार्थिव स्मशानभूमीत पोहचविण्यासाठी ट्रॅक्टरचा आधार घ्यावा लागतो.

मांढळ येथील वाॅर्ड क्र. २ मध्ये कचरा वेचणाऱ्या रामू चव्हाण यांची पत्नी सविता चव्हाण (३५) हिचा बुधवारी अल्प आजाराने मृत्यू झाला. मात्र, कोरोनाच्या भीतीने कुणीही तिला पाहायला गेले नाही. तिच्या अंत्यसंस्काराची वेळ आली. परंतु, कुणीही पुढे येत नव्हते. ग्रामपंचायत सदस्य राजेश तिवस्कर यांनी पुढाकार घेऊन तिच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. मात्र, त्यांच्या मदतीला वाॅर्डातील कोणीही आलेले नाही. शेवटी त्यांनी विटांच्या भट्टीवरील दोन माणसांना सोबत घेतले व आपल्याच ट्रॅक्टरवर सविता हिचे पार्थिव स्मशानभूमीत नेत अंत्यसंस्कार पार पाडले.

भारतीय संस्कृतीप्रमाणे कुणी आपला विरोधकही असेल तरी त्याच्या तोरणी किंवा मरणी हजर राहावे, अशी रीत आहे. शत्रू असेल तरी मृत्यूनंतर विरोध संपला, असे समजून अंत्यविधीला जातात. मात्र कोरोनाने भारतीय संस्कृतीतील या चांगल्या परंपरेला अडसर निर्माण करणारी परिस्थिती आणली आहे. एकीकडे लग्न व अंत्यविधीतील गर्दीतून संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने काही नियम कडक केले आहेत. मात्र, आपल्याला संसर्ग होईल, या भीतीने जवळचे लोक ही मृतदेहाजवळ येत नाही, ही वास्तविकता आहे. मागील आठवड्यात चिकणा येथे एकाचे वृद्धापकाळाने निधन झाले. खांदेकरी न मिळाल्याने घरच्यांनी पार्थिव बैलबंडीत टाकून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पाडले. यावर ग्रामपंचायत कर्मचारी प्रवीण कळंबे यांनी खेद व्यक्त केला. जी व्यक्ती बाधित नसेल, नैसर्गिक आजाराने मृत्यू झाला असेल, त्याही व्यक्तीजवळ जाण्यास कुणी तयार नाहीत. सामाजिक रुढीप्रमाणे ग्रामीण भागात बांबूची तिरडी करून त्यावर पार्थिव ठेवत स्मशानभूमीपर्यंत खांदेकरी नेतात. मात्र, कोरोनाच्या भीतीने खांदेकरी मिळत नाही, हे वास्तव आहे.