शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

कोरोनाच्या भीतीने तिरडीला खांदेकरीही मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:09 IST

कुही : कोरोनाने नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. शेजारचा एखादा माणूस मृत झाला तरी त्याला कुणीही पाहायलासुद्धा जात ...

कुही : कोरोनाने नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. शेजारचा एखादा माणूस मृत झाला तरी त्याला कुणीही पाहायलासुद्धा जात नाही. एवढेच काय तर त्याच्या तिरडीला साधे खांदेकरी मिळेनासे झाले आहेत. शेवटी मृतकाचे पार्थिव स्मशानभूमीत पोहचविण्यासाठी ट्रॅक्टरचा आधार घ्यावा लागतो.

मांढळ येथील वाॅर्ड क्र. २ मध्ये कचरा वेचणाऱ्या रामू चव्हाण यांची पत्नी सविता चव्हाण (३५) हिचा बुधवारी अल्प आजाराने मृत्यू झाला. मात्र, कोरोनाच्या भीतीने कुणीही तिला पाहायला गेले नाही. तिच्या अंत्यसंस्काराची वेळ आली. परंतु, कुणीही पुढे येत नव्हते. ग्रामपंचायत सदस्य राजेश तिवस्कर यांनी पुढाकार घेऊन तिच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. मात्र, त्यांच्या मदतीला वाॅर्डातील कोणीही आलेले नाही. शेवटी त्यांनी विटांच्या भट्टीवरील दोन माणसांना सोबत घेतले व आपल्याच ट्रॅक्टरवर सविता हिचे पार्थिव स्मशानभूमीत नेत अंत्यसंस्कार पार पाडले.

भारतीय संस्कृतीप्रमाणे कुणी आपला विरोधकही असेल तरी त्याच्या तोरणी किंवा मरणी हजर राहावे, अशी रीत आहे. शत्रू असेल तरी मृत्यूनंतर विरोध संपला, असे समजून अंत्यविधीला जातात. मात्र कोरोनाने भारतीय संस्कृतीतील या चांगल्या परंपरेला अडसर निर्माण करणारी परिस्थिती आणली आहे. एकीकडे लग्न व अंत्यविधीतील गर्दीतून संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने काही नियम कडक केले आहेत. मात्र, आपल्याला संसर्ग होईल, या भीतीने जवळचे लोक ही मृतदेहाजवळ येत नाही, ही वास्तविकता आहे. मागील आठवड्यात चिकणा येथे एकाचे वृद्धापकाळाने निधन झाले. खांदेकरी न मिळाल्याने घरच्यांनी पार्थिव बैलबंडीत टाकून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पाडले. यावर ग्रामपंचायत कर्मचारी प्रवीण कळंबे यांनी खेद व्यक्त केला. जी व्यक्ती बाधित नसेल, नैसर्गिक आजाराने मृत्यू झाला असेल, त्याही व्यक्तीजवळ जाण्यास कुणी तयार नाहीत. सामाजिक रुढीप्रमाणे ग्रामीण भागात बांबूची तिरडी करून त्यावर पार्थिव ठेवत स्मशानभूमीपर्यंत खांदेकरी नेतात. मात्र, कोरोनाच्या भीतीने खांदेकरी मिळत नाही, हे वास्तव आहे.