शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

कोरोनाच्या भीतीमुळे उपराजधानीत मास्कची विक्री वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 10:56 IST

नागपुरात कोरोना विषाणूचे तीन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे खबरदारी म्हणून लोकांकडून व प्रवाशांकडून ‘एन-९५’ मास्कची मागणी वाढली आहे.

ठळक मुद्देरोज तीन हजारावर विक्री तुटवड्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात कोरोना विषाणूचे पाच रुग्ण आढळले असले तरी महाराष्ट्रात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. परंतु संशयित रुग्णांची संख्या वाढली आहे. नागपुरात तीन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे खबरदारी म्हणून लोकांकडून व प्रवाशांकडून ‘एन-९५’ मास्कची मागणी वाढली आहे. पूर्वी नागपुरात जिथे दिवसभरात २०० ते ५०० मास्कची विक्री व्हायची ती संख्या आता तीन हजाराच्या घरात गेली आहे. ही मागणी अशीच राहिल्यास तुटवडा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.उपराजधानीत कोरोना विषाणूला घेऊन सतर्कता पाळली जात आहे. मेडिकलमध्ये वॉर्ड क्र. २५ सज्ज करून ठेवण्यात आला आहे. येथे व्हेंटिलेटरसह औषधोपचाराची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागपुरात जे तीन संशयीत रुग्ण आढळून आले होते त्यांना याच वॉर्डात उपचारासाठी ठेवण्यात आले होते. नंतर त्यांचे नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले.

-एन-९५ मास्कचा वाढला वापरअखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे सदस्य हरीश गणेशानी म्हणाले, नागपुरात ‘एन-९५’ मास्कची विक्री दिवसभरात साधारण ५००च्या आत होती. परंतु कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे या मास्कचा वापर वाढला आहे. एका मास्कची किंमत १५० रुपये आहे. सध्या रोज तीन हजारावर मास्क विकल्या जात असल्याची माहिती आहे. या मास्कची सर्वाधिक मागणी प्रवाशांकडून होत आहे. ही मागणी वाढल्यास तुटवडा पडण्याची शक्यता आहे. सध्या देशात या मास्कचा तुटवडा निर्माण झाला असून केंद्र सरकारने मास्कच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना