शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

कोरोनाप्रतीची भितीच करतेय तुमच्यातील रोगप्रतिकारक शक्तीचा ऱ्हास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 19:55 IST

जर आपण कायम भयभीत अवस्थेत राहू तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढणार नाही.

ठळक मुद्दे आधी भयमुक्त व्हा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोरोनाशी दोन हात करण्यासाठी अवघे जग सज्ज झालेअसताना त्याचा वाढता वेग पाहता कुठे चुकतंय हे तपासण्यासाठी बरीच मोठी यंत्रणा कामी लागली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम आले, मास्क लावतोय, होम क्वारंटाईन सुरू आहेच. या सगळ्यासोबत अजून काही महत्त्वाच्या गोष्टी करणे आवश्यक आहे. तीत सर्वात पहिली बाब ही की, कोरोनाने आपण ग्रस्त होऊ व मरण येईल ही भीती सर्वात जास्त नुकसान करते आहे. निसर्गायण मंडळ हा नागपुरात पर्यावरणप्रेमींनी गेल्या दहा वर्षांपासून चालवलेला एक उपक्रम आहे. यातील एक सदस्य रविकिरण महाजन यांनी कोरोनाबाबत एक वेगळा विचार मांडला आहे.ते म्हणतात, या विषाणूवर अद्याप कोणतेच औषध शोधले गेलेले नाही. ती एका महामारीच्या रुपाने आपल्यासमोर उभे आहे. अशात आपल्याजवळ असलेली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हा पहिला उपाय आहे. आणि या उपायातला महत्त्वाचा मुद्दा असा की, जर आपण कायम भयभीत अवस्थेत राहू तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढणार नाही. याचे कारण जेव्हा मानवाचे शरीर व मन भयग्रस्त होते तेव्हा ते कार्टिसोल, इन्ट्रल्युकिन व सायटोकिनसारखे घातक द्रव्य तयार करते. ही द्रव्ये तयार होण्यामागचे कारण असे की, ही द्रव्ये शरिराला संदेश देतील की, कुठलेतरी संकट येत आहे, तयार रहा. त्यामुळे एरव्ही विकास व दुरुस्तीमध्ये व्यस्त असलेलं आपलं शरीर या आपत्तीकाळासाठी सज्ज होतं. मात्र मनात अत्याधिक भय असेल तर ते आपले काम ठीक करू शकत नाही. म्हणजे आपल्याकडे लढण्याची सामग्री तर आहे पण ती सामग्री आपणच आपल्या कुलुपात बंद केल्यासारखी होते आहे. आपण आजारी पडू या भयानेच आपण अर्धमेले होत जातो. आपली ही भीतीच आपली खरी शत्रू आहे. ती दुसऱ्या शत्रूसोबत लढण्याची शरीराची क्षमता खेचून घेते. शरीर भयग्रस्त असेल तर ते रोगप्रतिकारक शक्ती योग्यरितीने वापरू शकणार नाही. त्यामुळे करोनाची भीती मनातून काढून टाकणे हा पहिला मोठा उपाय आहे.त्याचसोबत आपला आहार विहार हा योग्य असावा. कडुलिंब, तुळस, हळद, ओवा, सुंठ, अश्वगंधा, शतावरी, निलगिरी, गुळवेल, लसूण, दालचिनी, कोरफड अशा व अन्य काही गोष्टी आहेत ज्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवीत असतात. त्यांचे नित्य सेवन व्हायला हवे. निसर्ग हा आपल्या चक्रानुसार चालत असतो. मानवाने त्याच्या चक्रात निर्माण केलेले अडथळे प्रयत्नपूर्वक कमी करायला हवेत. आपण व निसर्गामध्ये आपण भिंत उभी केली आहे. ही भिंत संपायला हवी.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस