शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाप्रतीची भितीच करतेय तुमच्यातील रोगप्रतिकारक शक्तीचा ऱ्हास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 19:55 IST

जर आपण कायम भयभीत अवस्थेत राहू तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढणार नाही.

ठळक मुद्दे आधी भयमुक्त व्हा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोरोनाशी दोन हात करण्यासाठी अवघे जग सज्ज झालेअसताना त्याचा वाढता वेग पाहता कुठे चुकतंय हे तपासण्यासाठी बरीच मोठी यंत्रणा कामी लागली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम आले, मास्क लावतोय, होम क्वारंटाईन सुरू आहेच. या सगळ्यासोबत अजून काही महत्त्वाच्या गोष्टी करणे आवश्यक आहे. तीत सर्वात पहिली बाब ही की, कोरोनाने आपण ग्रस्त होऊ व मरण येईल ही भीती सर्वात जास्त नुकसान करते आहे. निसर्गायण मंडळ हा नागपुरात पर्यावरणप्रेमींनी गेल्या दहा वर्षांपासून चालवलेला एक उपक्रम आहे. यातील एक सदस्य रविकिरण महाजन यांनी कोरोनाबाबत एक वेगळा विचार मांडला आहे.ते म्हणतात, या विषाणूवर अद्याप कोणतेच औषध शोधले गेलेले नाही. ती एका महामारीच्या रुपाने आपल्यासमोर उभे आहे. अशात आपल्याजवळ असलेली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हा पहिला उपाय आहे. आणि या उपायातला महत्त्वाचा मुद्दा असा की, जर आपण कायम भयभीत अवस्थेत राहू तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढणार नाही. याचे कारण जेव्हा मानवाचे शरीर व मन भयग्रस्त होते तेव्हा ते कार्टिसोल, इन्ट्रल्युकिन व सायटोकिनसारखे घातक द्रव्य तयार करते. ही द्रव्ये तयार होण्यामागचे कारण असे की, ही द्रव्ये शरिराला संदेश देतील की, कुठलेतरी संकट येत आहे, तयार रहा. त्यामुळे एरव्ही विकास व दुरुस्तीमध्ये व्यस्त असलेलं आपलं शरीर या आपत्तीकाळासाठी सज्ज होतं. मात्र मनात अत्याधिक भय असेल तर ते आपले काम ठीक करू शकत नाही. म्हणजे आपल्याकडे लढण्याची सामग्री तर आहे पण ती सामग्री आपणच आपल्या कुलुपात बंद केल्यासारखी होते आहे. आपण आजारी पडू या भयानेच आपण अर्धमेले होत जातो. आपली ही भीतीच आपली खरी शत्रू आहे. ती दुसऱ्या शत्रूसोबत लढण्याची शरीराची क्षमता खेचून घेते. शरीर भयग्रस्त असेल तर ते रोगप्रतिकारक शक्ती योग्यरितीने वापरू शकणार नाही. त्यामुळे करोनाची भीती मनातून काढून टाकणे हा पहिला मोठा उपाय आहे.त्याचसोबत आपला आहार विहार हा योग्य असावा. कडुलिंब, तुळस, हळद, ओवा, सुंठ, अश्वगंधा, शतावरी, निलगिरी, गुळवेल, लसूण, दालचिनी, कोरफड अशा व अन्य काही गोष्टी आहेत ज्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवीत असतात. त्यांचे नित्य सेवन व्हायला हवे. निसर्ग हा आपल्या चक्रानुसार चालत असतो. मानवाने त्याच्या चक्रात निर्माण केलेले अडथळे प्रयत्नपूर्वक कमी करायला हवेत. आपण व निसर्गामध्ये आपण भिंत उभी केली आहे. ही भिंत संपायला हवी.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस