शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वडिलाला मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी टाळता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2021 12:41 IST

वडील या नात्याने मुलाच्या देखभालीची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. मुलाच्या शिक्षणाचा खर्च आई-वडिलाने समानरित्या उचलावा, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयामध्ये स्पष्ट केले.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचा निर्णय : खावटीची रक्कम वाढवून दिली

नागपूर : वडिलाला मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी टाळता येणार नाही. वडील या नात्याने मुलाच्या देखभालीची व्यवस्था करणे बंधनकारक आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयामध्ये स्पष्ट केले, तसेच आयआयटीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलाला खावटीची रक्कम वाढवून दिली.

न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला. प्रकरणातील आई-वडील दोघेही शिक्षक असून गंभीर मतभेदामुळे त्यांनी घटस्फोट घेतला आहे. ते विभक्त झाले त्यावेळी मुलगा आईच्या पोटात होता. त्यानंतर त्याचा जन्म झाला. आता तो सज्ञान झाला असून धनबाद येथील आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहे. त्याचा आतापर्यंतच्या शिक्षणाचा खर्च आईनेच उचलला. तिने काटकसर करून मुलाला वाढवले व शिकवले. दरम्यान, कुटुंब न्यायालयाने मुलाला २०१५ पासून मासिक पाच हजार रुपये खावटी अदा करण्याचे निर्देश वडीलास दिले होते. त्या निर्णयाविरुद्ध वडील व मुलगा या दोघांनीही उच्च न्यायालयात अपील दाखल केले. मासिक पाच हजार रुपये खावटी अवास्तव आहे, असे वडिलाचे म्हणणे होते, तर मुलाने वाढती महागाई लक्षात घेता खावटी वाढवून मागितली होती. उच्च न्यायालयाने मुलाची बाजू योग्य ठरवली.

मुलगा गुणवत्ताधारक विद्यार्थी असून तो आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहे. वर्तमान महागाईच्या काळात त्याला पाच हजार रुपयात सर्व खर्च भागविणे अशक्य आहे. करिता, तो पाेटगी वाढवून देण्यास पात्र आहे. वडील व्यवसायाने शिक्षक असून त्यांना सुमारे ४५ हजार रुपये वेतन आहे. त्यांनी वडील म्हणून मुलाच्या पालनपोषणाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यामुळे मासिक पाच हजार रुपये खावटी अवास्तव असल्याच्या दाव्यात अर्थ नाही, असे न्यायालयाने नमूद करून मुलाची खावटी वाढवून ७ हजार ५०० रुपये केली.

शिक्षणाचा खर्च आई-वडिलाने उचलावा

मुलाच्या शिक्षणाचा खर्च आई-वडिलाने समानरित्या उचलावा, असेही या निर्णयात स्पष्ट करण्यात आले. आई-वडील दोघेही शिक्षक आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत:च शिक्षणाच्या खर्चाचे नियोजन करावे, असे न्यायालय म्हणाले.

मुलगा सज्ञान, कधीही भेटा

मुलाला भेटू दिले जात नाही. त्यामुळे वाद आहे, अशी तक्रार वडिलाने केली होती. न्यायालयाने ही तक्रार निरर्थक ठरविली. मुलगा सज्ञान झाला आहे. त्यामुळे वडिलाने मुलाला भेटण्यास काहीच अडचण नाही. याशिवाय मुलगाही वडिलांना भेटू शकतो, असे न्यायालयाने नमूद केले.

टॅग्स :Courtन्यायालयDivorceघटस्फोट