शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

उपवास करा, पण आरोग्यही जपा; पचतील असेच पदार्थ घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2022 20:39 IST

Nagpur News उपवास करताना पोट बिघडू नये म्हणून उपवासाच्या काळात आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. पोटाला त्रास होणार नाही याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.

नागपूर : महादेवाचा मास म्हणून श्रावण महिना मानला जातो आणि म्हणूनच श्रावणात उपवास करणे हा श्रद्धेचा भाग ठरतो. तसे उपवास करणे चांगलेच आहे. परंतु, ज्याला शक्य असेल आणि ज्याच्या शरीराला परवडेल अशांनीच उपवास करणे महत्त्वाचे असते. या महिन्यात उपवास करताना अनेकदा आपल्या पोटावर अपाय होतात. उपवास करताना पोट बिघडू नये म्हणून उपवासाच्या काळात आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. पोटाला त्रास होणार नाही याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.

उपवासाला काय खाल?

उपवासाला साधारणतः आपण हलके पदार्थ खाऊ शकतो जसे राजगिरा शिरा, शिंगाडा, वरीचे तांदूळ यासारखे हलके पदार्थ तुम्ही खाऊ शकता. राजगिऱ्यात कॅल्शियम, लोह यासारखे पदार्थ चांगले असतात. १०० ग्रॅम शिंगाडामध्ये ‘क’ जीवनसत्व असतात. याऐवजी शिंगाड्याच्या पिठाचे लाडू बनवून सुद्धा खाऊ शकता. वरीचे तांदळात जीवनसत्वे खनिजे व तंतूमय पदार्थ आहेत.

१२ तास अंतर ठेवा

उपवासाला फराळ करताना आपण काय खात आहोत आणि ते किती प्रमाणात खात आहोत. यावर आपले पोटाचे तंत्र बसलेले असते जर या उपवासात तुम्ही साबुदाणा, भगर यासारखे पदार्थ खात असाल तर हे खाताना किमान १२ तासांचा अवधी ठेवा जेणे करुन हे पदार्थ पचनास सोपे जातील.

काय खाऊ नये?

उपवासाच्या दिवसात आपण साबुदाणा खिचडी, वडे, थालीपीठ यासारखे पदार्थ होईस्तोवर टाळावे कारण या पदार्थांमध्ये तेल मोठ्या प्रमाणात वापरले जाते. तसेच कोणतीही जीवनसत्वे यामध्ये नसतात. तसेच मोठ्या प्रमाणात आम्लपित्त असतात. ज्यामुळे हे पदार्थ पचायला जड जातात.

साबुदाणा न खाल्लेलाच बरा

साबुदाण्यात फक्त पिष्टमय पदार्थ असतात. तसेच साबुदाणा पचायला जड असतो. यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. याच्या अति सेवनाने शरीराचे वेगवेगळे आजार उद्भवू शकतात.

आहार तज्ज्ञ म्हणतात....

उपवासामुळे तब्येतीवर परिणाम होणार नाही. ज्यांना पित्त आहे त्यांनी साबुदाणा खिचडीसारखे पदार्थ खाऊ नये. ज्यांना शुगर किंवा बीपीचा त्रास आहे अशांनी शक्यतो उपवास करूच नये आणि उपवास करायचे असल्यास कोणतेही पदार्थ खाण्याऐवजी फळे खावी जेणेकरून त्यांच्या तब्येतीवर परिणाम होणार नाही.

- डॉ. हरिभाऊ मस्के, आयुर्वेदिक तज्ज्ञ

टॅग्स :foodअन्न