शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

उपवास करा, पण आरोग्यही जपा; पचतील असेच पदार्थ घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2022 20:39 IST

Nagpur News उपवास करताना पोट बिघडू नये म्हणून उपवासाच्या काळात आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. पोटाला त्रास होणार नाही याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.

नागपूर : महादेवाचा मास म्हणून श्रावण महिना मानला जातो आणि म्हणूनच श्रावणात उपवास करणे हा श्रद्धेचा भाग ठरतो. तसे उपवास करणे चांगलेच आहे. परंतु, ज्याला शक्य असेल आणि ज्याच्या शरीराला परवडेल अशांनीच उपवास करणे महत्त्वाचे असते. या महिन्यात उपवास करताना अनेकदा आपल्या पोटावर अपाय होतात. उपवास करताना पोट बिघडू नये म्हणून उपवासाच्या काळात आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. पोटाला त्रास होणार नाही याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.

उपवासाला काय खाल?

उपवासाला साधारणतः आपण हलके पदार्थ खाऊ शकतो जसे राजगिरा शिरा, शिंगाडा, वरीचे तांदूळ यासारखे हलके पदार्थ तुम्ही खाऊ शकता. राजगिऱ्यात कॅल्शियम, लोह यासारखे पदार्थ चांगले असतात. १०० ग्रॅम शिंगाडामध्ये ‘क’ जीवनसत्व असतात. याऐवजी शिंगाड्याच्या पिठाचे लाडू बनवून सुद्धा खाऊ शकता. वरीचे तांदळात जीवनसत्वे खनिजे व तंतूमय पदार्थ आहेत.

१२ तास अंतर ठेवा

उपवासाला फराळ करताना आपण काय खात आहोत आणि ते किती प्रमाणात खात आहोत. यावर आपले पोटाचे तंत्र बसलेले असते जर या उपवासात तुम्ही साबुदाणा, भगर यासारखे पदार्थ खात असाल तर हे खाताना किमान १२ तासांचा अवधी ठेवा जेणे करुन हे पदार्थ पचनास सोपे जातील.

काय खाऊ नये?

उपवासाच्या दिवसात आपण साबुदाणा खिचडी, वडे, थालीपीठ यासारखे पदार्थ होईस्तोवर टाळावे कारण या पदार्थांमध्ये तेल मोठ्या प्रमाणात वापरले जाते. तसेच कोणतीही जीवनसत्वे यामध्ये नसतात. तसेच मोठ्या प्रमाणात आम्लपित्त असतात. ज्यामुळे हे पदार्थ पचायला जड जातात.

साबुदाणा न खाल्लेलाच बरा

साबुदाण्यात फक्त पिष्टमय पदार्थ असतात. तसेच साबुदाणा पचायला जड असतो. यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. याच्या अति सेवनाने शरीराचे वेगवेगळे आजार उद्भवू शकतात.

आहार तज्ज्ञ म्हणतात....

उपवासामुळे तब्येतीवर परिणाम होणार नाही. ज्यांना पित्त आहे त्यांनी साबुदाणा खिचडीसारखे पदार्थ खाऊ नये. ज्यांना शुगर किंवा बीपीचा त्रास आहे अशांनी शक्यतो उपवास करूच नये आणि उपवास करायचे असल्यास कोणतेही पदार्थ खाण्याऐवजी फळे खावी जेणेकरून त्यांच्या तब्येतीवर परिणाम होणार नाही.

- डॉ. हरिभाऊ मस्के, आयुर्वेदिक तज्ज्ञ

टॅग्स :foodअन्न