शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

उपवास करा, पण आरोग्यही जपा; पचतील असेच पदार्थ घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2022 20:39 IST

Nagpur News उपवास करताना पोट बिघडू नये म्हणून उपवासाच्या काळात आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. पोटाला त्रास होणार नाही याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.

नागपूर : महादेवाचा मास म्हणून श्रावण महिना मानला जातो आणि म्हणूनच श्रावणात उपवास करणे हा श्रद्धेचा भाग ठरतो. तसे उपवास करणे चांगलेच आहे. परंतु, ज्याला शक्य असेल आणि ज्याच्या शरीराला परवडेल अशांनीच उपवास करणे महत्त्वाचे असते. या महिन्यात उपवास करताना अनेकदा आपल्या पोटावर अपाय होतात. उपवास करताना पोट बिघडू नये म्हणून उपवासाच्या काळात आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. पोटाला त्रास होणार नाही याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.

उपवासाला काय खाल?

उपवासाला साधारणतः आपण हलके पदार्थ खाऊ शकतो जसे राजगिरा शिरा, शिंगाडा, वरीचे तांदूळ यासारखे हलके पदार्थ तुम्ही खाऊ शकता. राजगिऱ्यात कॅल्शियम, लोह यासारखे पदार्थ चांगले असतात. १०० ग्रॅम शिंगाडामध्ये ‘क’ जीवनसत्व असतात. याऐवजी शिंगाड्याच्या पिठाचे लाडू बनवून सुद्धा खाऊ शकता. वरीचे तांदळात जीवनसत्वे खनिजे व तंतूमय पदार्थ आहेत.

१२ तास अंतर ठेवा

उपवासाला फराळ करताना आपण काय खात आहोत आणि ते किती प्रमाणात खात आहोत. यावर आपले पोटाचे तंत्र बसलेले असते जर या उपवासात तुम्ही साबुदाणा, भगर यासारखे पदार्थ खात असाल तर हे खाताना किमान १२ तासांचा अवधी ठेवा जेणे करुन हे पदार्थ पचनास सोपे जातील.

काय खाऊ नये?

उपवासाच्या दिवसात आपण साबुदाणा खिचडी, वडे, थालीपीठ यासारखे पदार्थ होईस्तोवर टाळावे कारण या पदार्थांमध्ये तेल मोठ्या प्रमाणात वापरले जाते. तसेच कोणतीही जीवनसत्वे यामध्ये नसतात. तसेच मोठ्या प्रमाणात आम्लपित्त असतात. ज्यामुळे हे पदार्थ पचायला जड जातात.

साबुदाणा न खाल्लेलाच बरा

साबुदाण्यात फक्त पिष्टमय पदार्थ असतात. तसेच साबुदाणा पचायला जड असतो. यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. याच्या अति सेवनाने शरीराचे वेगवेगळे आजार उद्भवू शकतात.

आहार तज्ज्ञ म्हणतात....

उपवासामुळे तब्येतीवर परिणाम होणार नाही. ज्यांना पित्त आहे त्यांनी साबुदाणा खिचडीसारखे पदार्थ खाऊ नये. ज्यांना शुगर किंवा बीपीचा त्रास आहे अशांनी शक्यतो उपवास करूच नये आणि उपवास करायचे असल्यास कोणतेही पदार्थ खाण्याऐवजी फळे खावी जेणेकरून त्यांच्या तब्येतीवर परिणाम होणार नाही.

- डॉ. हरिभाऊ मस्के, आयुर्वेदिक तज्ज्ञ

टॅग्स :foodअन्न