शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

खतांच्या भाववाढीने शेतकरी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:08 IST

रेवराल : शेतकरी निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे. वातावरणातील बदल. अवकाळी पाऊस, मजुरांची कमतरता, जलसिंचन सुविधांचा अभाव, अपुरा वीजपुरवठा ...

रेवराल : शेतकरी निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे. वातावरणातील बदल. अवकाळी पाऊस, मजुरांची कमतरता, जलसिंचन सुविधांचा अभाव, अपुरा वीजपुरवठा यातच अल्पप्रमाणात मिळणारे पीककर्जामुळे शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. अशात दरवर्षी शेतोपयोगी वस्तूची होणारी दरवाढ शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे. यंदा खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या किमतीत ५० किलोच्या बॅगमागे १७.३४ टक्के दरवाढ केली आहे. यामुळे शेती करावी, असा प्रश्न मौदा तालुक्यातील शेतकऱ्यापुढे पडला आहे. खरिपात तूर, कापूस, मिरची, सोयाबीन, तर रब्बीत गहू, भाजीपाला आदी पिके घेतात. मात्र दिवसेंदिवस शेतीवरील मनुष्यबळ कमी होत आहे. पिकांची लागवड आणि काढणीचा हंगाम सारखाच येतो. त्यामुळे मजुरांची कमतरता निर्माण होते. अशावेळी पिके काढण्यासाठी बाहेरगावावरून मजूर स्वखर्चाने आणावे लागतात. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. दरवर्षी शेतीची अवजारे, बी-बियाणे आणि रासायनिक खतांच्या किमतीत वाढ आहे. डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने ट्रॅक्टर खर्च परवडेनासा झाला आहे.

व्यवस्थेच्या दुष्टचक्रात शेतकरी पिळला जात आहे. यावर्षी तुडतुड्यामुळे शेतकऱ्यांचे अतिनुकसान झाले. नदी किनाऱ्यालगत असलेल्या शेतकऱ्यांना पुराचा फटका बसला. विमा कंपन्यांनी हात वर केले. अशात शेतकऱ्यांनी जगायचे कसे?

- इस्तारू गिरेपुंजे, शेतकरी, खात, ता.मौदा