शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
2
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
3
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
4
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
5
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
6
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
7
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
8
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
9
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
10
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
11
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
12
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
13
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
14
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
15
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!
16
Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
17
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
18
PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट
19
ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज
20
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली

खतांच्या भाववाढीने शेतकरी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:08 IST

रेवराल : शेतकरी निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे. वातावरणातील बदल. अवकाळी पाऊस, मजुरांची कमतरता, जलसिंचन सुविधांचा अभाव, अपुरा वीजपुरवठा ...

रेवराल : शेतकरी निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे. वातावरणातील बदल. अवकाळी पाऊस, मजुरांची कमतरता, जलसिंचन सुविधांचा अभाव, अपुरा वीजपुरवठा यातच अल्पप्रमाणात मिळणारे पीककर्जामुळे शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. अशात दरवर्षी शेतोपयोगी वस्तूची होणारी दरवाढ शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे. यंदा खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या किमतीत ५० किलोच्या बॅगमागे १७.३४ टक्के दरवाढ केली आहे. यामुळे शेती करावी, असा प्रश्न मौदा तालुक्यातील शेतकऱ्यापुढे पडला आहे. खरिपात तूर, कापूस, मिरची, सोयाबीन, तर रब्बीत गहू, भाजीपाला आदी पिके घेतात. मात्र दिवसेंदिवस शेतीवरील मनुष्यबळ कमी होत आहे. पिकांची लागवड आणि काढणीचा हंगाम सारखाच येतो. त्यामुळे मजुरांची कमतरता निर्माण होते. अशावेळी पिके काढण्यासाठी बाहेरगावावरून मजूर स्वखर्चाने आणावे लागतात. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. दरवर्षी शेतीची अवजारे, बी-बियाणे आणि रासायनिक खतांच्या किमतीत वाढ आहे. डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने ट्रॅक्टर खर्च परवडेनासा झाला आहे.

व्यवस्थेच्या दुष्टचक्रात शेतकरी पिळला जात आहे. यावर्षी तुडतुड्यामुळे शेतकऱ्यांचे अतिनुकसान झाले. नदी किनाऱ्यालगत असलेल्या शेतकऱ्यांना पुराचा फटका बसला. विमा कंपन्यांनी हात वर केले. अशात शेतकऱ्यांनी जगायचे कसे?

- इस्तारू गिरेपुंजे, शेतकरी, खात, ता.मौदा