शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
4
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
5
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
6
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
7
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
8
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
9
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
10
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
12
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
13
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
14
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
15
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
16
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
17
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
18
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
19
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
20
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र

‘गाढव’ गेले रिकामे, ‘मेंढा’कडून अपेक्षा; आता भिस्त आर्द्रावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 22:04 IST

Nagpur News पावसाचा अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांच्या १० टक्के पेरण्या अडचणीत आल्या आहेत. मृग कोरडा गेला, निदान आर्द्रा तरी बरसतील, अशी शेतकऱ्यांची आशा असल्याने आताही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून काहींनी पेरणीची तयारी केली आहे.

नागपूर : दरवर्षीसारख्याच यंदाही मृगाने वाकुल्या दाखिवल्या आहेत. पावसाचा अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांच्या १० टक्के पेरण्या अडचणीत आल्या आहेत. मृग कोरडा गेला, निदान आर्द्रा तरी बरसतील, अशी शेतकऱ्यांची आशा असल्याने आताही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून काहींनी पेरणीची तयारी केली आहे. असे असले तरी नक्षत्रांचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांना पेरणीची तयारी करावी लागणार आहे.

जिल्ह्यात सरासरी १०२.९ मि.मी. पाऊस

यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत जिल्ह्यामध्ये सरासरी १०२.९ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या तुलनेत मागील वर्षी मात्र १८९.८ मि.मी. पाऊस पडलेला होता. हा फरक लक्षात घेता यंदा आजवरच्या पावसाची टक्केवारी कमी आहे. त्याचा परिणाम पेरणीवर झालेला दिसत आहे.

सर्वाधिक १५६.१ मि.मी. पाऊस नरखेडमध्ये

जिलह्यात सर्वाधिक पाऊस नरखेडमध्ये पडला असून १५६.१ मि.मी. पावसाची नोंद या तालुक्यात आहे. गतवर्षी जूनअखेर १७७.९ मि.मी. पाऊस या तालुक्यात पडला होता. यंदाही येथे पाऊस सरासरीच्या जवळपास पोहोचला असल्याने शेतकरी समाधानी आहेत.

सर्वांत कमी ४९.२ मि.मी. पाऊस मौदामध्ये

यंदा आतापर्यंत सर्वांत कमी पाऊस मौदा तालुक्यात पडला असून त्याची नोंद ४९.२ मि.मी. घेण्यात आली आहे. मागील वर्षी या तालुक्यात जूनअखेरपर्यंत १६५ मि.मी. पाऊस पडलेला होता. यंदा हे प्रमाण बरेच कमी आहे.

गतवर्षी आतापर्यंत १८६.८ मि.मी. पाऊस

मागील वर्षी आतापर्यंत १८६.८ मिमी पाऊस पडला होता. यंदा त्यात घट असून ८७ मि.मी.ने सरासरी पावसात घट आहे. याचा परिणाम पेरणीवर झालेला दिसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पेरण्या खोळंबल्या आहेत.

पेरणीसाठी थोडे थांबा

कृषी विभाग आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मते पेरणीचे दिवस अद्याप संपायचे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करण्याची गरज नाही. १५ जुलैपर्यंत पेरणीसाठी कालावधी आपल्या हातात आहे. सोयाबीनसारख्या पिकासाठी पेरणी करताना पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी केल्यास पीक वाया जाणार नाही.

ओलिताचे साधन असल्यास पेरणीसाठी त्वरा केल्यास हरकत नाही. मात्र, अन्य शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजानुसारच पेरणी करावी. कृषी विद्यापीठानेही १५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला आहे.

- मिलिंद शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर

...

टॅग्स :agricultureशेती