शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

‘गाढव’ गेले रिकामे, ‘मेंढा’कडून अपेक्षा; आता भिस्त आर्द्रावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 22:04 IST

Nagpur News पावसाचा अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांच्या १० टक्के पेरण्या अडचणीत आल्या आहेत. मृग कोरडा गेला, निदान आर्द्रा तरी बरसतील, अशी शेतकऱ्यांची आशा असल्याने आताही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून काहींनी पेरणीची तयारी केली आहे.

नागपूर : दरवर्षीसारख्याच यंदाही मृगाने वाकुल्या दाखिवल्या आहेत. पावसाचा अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांच्या १० टक्के पेरण्या अडचणीत आल्या आहेत. मृग कोरडा गेला, निदान आर्द्रा तरी बरसतील, अशी शेतकऱ्यांची आशा असल्याने आताही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून काहींनी पेरणीची तयारी केली आहे. असे असले तरी नक्षत्रांचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांना पेरणीची तयारी करावी लागणार आहे.

जिल्ह्यात सरासरी १०२.९ मि.मी. पाऊस

यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत जिल्ह्यामध्ये सरासरी १०२.९ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या तुलनेत मागील वर्षी मात्र १८९.८ मि.मी. पाऊस पडलेला होता. हा फरक लक्षात घेता यंदा आजवरच्या पावसाची टक्केवारी कमी आहे. त्याचा परिणाम पेरणीवर झालेला दिसत आहे.

सर्वाधिक १५६.१ मि.मी. पाऊस नरखेडमध्ये

जिलह्यात सर्वाधिक पाऊस नरखेडमध्ये पडला असून १५६.१ मि.मी. पावसाची नोंद या तालुक्यात आहे. गतवर्षी जूनअखेर १७७.९ मि.मी. पाऊस या तालुक्यात पडला होता. यंदाही येथे पाऊस सरासरीच्या जवळपास पोहोचला असल्याने शेतकरी समाधानी आहेत.

सर्वांत कमी ४९.२ मि.मी. पाऊस मौदामध्ये

यंदा आतापर्यंत सर्वांत कमी पाऊस मौदा तालुक्यात पडला असून त्याची नोंद ४९.२ मि.मी. घेण्यात आली आहे. मागील वर्षी या तालुक्यात जूनअखेरपर्यंत १६५ मि.मी. पाऊस पडलेला होता. यंदा हे प्रमाण बरेच कमी आहे.

गतवर्षी आतापर्यंत १८६.८ मि.मी. पाऊस

मागील वर्षी आतापर्यंत १८६.८ मिमी पाऊस पडला होता. यंदा त्यात घट असून ८७ मि.मी.ने सरासरी पावसात घट आहे. याचा परिणाम पेरणीवर झालेला दिसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पेरण्या खोळंबल्या आहेत.

पेरणीसाठी थोडे थांबा

कृषी विभाग आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मते पेरणीचे दिवस अद्याप संपायचे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करण्याची गरज नाही. १५ जुलैपर्यंत पेरणीसाठी कालावधी आपल्या हातात आहे. सोयाबीनसारख्या पिकासाठी पेरणी करताना पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी केल्यास पीक वाया जाणार नाही.

ओलिताचे साधन असल्यास पेरणीसाठी त्वरा केल्यास हरकत नाही. मात्र, अन्य शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजानुसारच पेरणी करावी. कृषी विद्यापीठानेही १५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला आहे.

- मिलिंद शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर

...

टॅग्स :agricultureशेती