शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

ट्रान्सफार्मर बिघडल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : पावसाळा सुरू झाला असला तरी पाऊस कधी दडी मारेल आणि पिके पाण्याअभावी कधी कोमेजतील ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : पावसाळा सुरू झाला असला तरी पाऊस कधी दडी मारेल आणि पिके पाण्याअभावी कधी कोमेजतील याचा भरवसा नाही. अशावेळी पिके वाचविण्यासाठी विहीर व इलेक्ट्रिक माेटरपंप शेतकऱ्यांच्या कामी येते. मात्र, बाेरडा (ता. रामटेक) शिवारातील विजेचे ट्रान्सफार्मर काही महिन्यांपासून नादुरुस्त असल्याने ते तातडीने दुरुस्त करण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी वारंवार केली. परंतु, महावितरण कंपनीचेे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे.

बाेरडा येथील काही शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली असून, काहींनी राेवणी करण्यासाठी पऱ्हे टाकले आहे. पऱ्हे टाकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. खरं तर इतर पिकांच्या तुलनेत धानाच्या पिकाला सर्वाधिक पाण्याची गरज असते. पऱ्ह्यातील धानाची राेपटी जगवण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे. या शिवारातील विजेचे ट्रान्सफार्मर बिघडल्याने शेतकऱ्यांना पावसावर अवलंंबून राहावे लागत आहे. पावसाने तीन-चार दिवस दडी मारल्यास पऱ्ह्यातील राेपटी सुकायला सुरुवात हाेते. अशावेळी शेतकरी विहिरीतील पाण्याचा वापर करतात.

देवरी-बाेरडा शिवारातील ट्रान्सफार्मवर बाेरडा शिवारातील ५० शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी वीजपुरवठा दिला आहे. ट्रान्सफार्मरमध्ये पाच महिन्यापूर्वी बिघाड निर्माण झाल्याने विहिरीत पाणी असूनही शेतकऱ्यांना ओलित करणे शक्य हाेत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ट्रान्सफार्मरची दुरुस्ती करण्याची वारंवार मागणी केली. परंतु, महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या मागणीकडे अद्यापही लक्ष दिले नाही, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. ही समस्या तातडीने साेडविण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

...

बिलांची वसुली आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष

या भागातील विजेच्या बहुतांश तारा लाेंबकळलेल्या आहेत. त्या तारांचे आपसात घर्षण हाेत असल्याने शाॅर्ट सर्किट हाेऊन वीजपुरवठा खंडित हाेताे. प्रसंगी स्पार्किंगमुळे तारा तुटतात व धाेका उद्भवताे. बहुतांश शेतकऱ्यांनी पदरमाेड करून खासगी व्यक्तीकडून ही दुरुस्तीची कामे काही प्रमाणात केली. महावितरण कंपनी शेतकऱ्यांकडून विजेच्या अवाजवी बिलाची नियमित वसुली करते. मात्र, दुरुस्तीकडे दुर्लक्ष करते, असा आराेपही शेतकऱ्यांनी केला आहे.