शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

ट्रान्सफार्मर बिघडल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : पावसाळा सुरू झाला असला तरी पाऊस कधी दडी मारेल आणि पिके पाण्याअभावी कधी कोमेजतील ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : पावसाळा सुरू झाला असला तरी पाऊस कधी दडी मारेल आणि पिके पाण्याअभावी कधी कोमेजतील याचा भरवसा नाही. अशावेळी पिके वाचविण्यासाठी विहीर व इलेक्ट्रिक माेटरपंप शेतकऱ्यांच्या कामी येते. मात्र, बाेरडा (ता. रामटेक) शिवारातील विजेचे ट्रान्सफार्मर काही महिन्यांपासून नादुरुस्त असल्याने ते तातडीने दुरुस्त करण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी वारंवार केली. परंतु, महावितरण कंपनीचेे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे.

बाेरडा येथील काही शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली असून, काहींनी राेवणी करण्यासाठी पऱ्हे टाकले आहे. पऱ्हे टाकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. खरं तर इतर पिकांच्या तुलनेत धानाच्या पिकाला सर्वाधिक पाण्याची गरज असते. पऱ्ह्यातील धानाची राेपटी जगवण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे. या शिवारातील विजेचे ट्रान्सफार्मर बिघडल्याने शेतकऱ्यांना पावसावर अवलंंबून राहावे लागत आहे. पावसाने तीन-चार दिवस दडी मारल्यास पऱ्ह्यातील राेपटी सुकायला सुरुवात हाेते. अशावेळी शेतकरी विहिरीतील पाण्याचा वापर करतात.

देवरी-बाेरडा शिवारातील ट्रान्सफार्मवर बाेरडा शिवारातील ५० शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी वीजपुरवठा दिला आहे. ट्रान्सफार्मरमध्ये पाच महिन्यापूर्वी बिघाड निर्माण झाल्याने विहिरीत पाणी असूनही शेतकऱ्यांना ओलित करणे शक्य हाेत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ट्रान्सफार्मरची दुरुस्ती करण्याची वारंवार मागणी केली. परंतु, महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या मागणीकडे अद्यापही लक्ष दिले नाही, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. ही समस्या तातडीने साेडविण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

...

बिलांची वसुली आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष

या भागातील विजेच्या बहुतांश तारा लाेंबकळलेल्या आहेत. त्या तारांचे आपसात घर्षण हाेत असल्याने शाॅर्ट सर्किट हाेऊन वीजपुरवठा खंडित हाेताे. प्रसंगी स्पार्किंगमुळे तारा तुटतात व धाेका उद्भवताे. बहुतांश शेतकऱ्यांनी पदरमाेड करून खासगी व्यक्तीकडून ही दुरुस्तीची कामे काही प्रमाणात केली. महावितरण कंपनी शेतकऱ्यांकडून विजेच्या अवाजवी बिलाची नियमित वसुली करते. मात्र, दुरुस्तीकडे दुर्लक्ष करते, असा आराेपही शेतकऱ्यांनी केला आहे.