शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या आत्महत्या नक्की थांबणार

By admin | Updated: September 11, 2016 02:06 IST

पतंजली फूड आणि हर्बल पार्कमुळे शेतकऱ्यांना कृषी मालासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन : मिहानमध्ये पतंजली फूड व हर्बल पार्कचे भूमिपूजननागपूर : पतंजली फूड आणि हर्बल पार्कमुळे शेतकऱ्यांना कृषी मालासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्यांच्या कृषी मालाला चांगली किंमत मिळेल आणि मध्यस्थांद्वारे शेतकऱ्यांची लुबाडणूक होणार नाही. त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊन तो आत्महत्या करणार नाही, अशी ग्वाही महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना आणि मुलांना प्रशिक्षण व रोजगार मिळणार आहे. पतंजलीने गुणवत्तेची स्वदेशी उत्पादने लोकांना उपलब्ध करून देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. पतंजलीच्या मिहान-सेझमधील अविकसित २३० एकरावरील फूड आणि हर्बल पार्कचे भूमिपूजन मुख्यमंंत्र्यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी, योगगुरू बाबा रामदेव, आचार्य बालकृष्ण, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, रामदास तडस, डॉ. विकास महात्मे, अजय संचेती, महापौर प्रवीण दटके उपस्थित होते.(प्रतिनिधी) जवळपास ५० हजार रोजगारनिर्मितीमुख्यमंत्री म्हणाले, जगातील सर्वात मोठा फूड पार्क मिहानमध्ये साकार होणार आहे. या पार्कमध्ये कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योग असल्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती सुधारणार आहे. उसाप्रमाणेच विदर्भात मध्यस्थांची साखळी बंद होऊन शेतकऱ्यांच्या कृषी मालाला चांगली किंमत मिळणार आहे. त्यासाठी त्यांना तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची गरज आहे. या पार्कच्या माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या ५० हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. पतंजलीने शेतीचे क्लस्टर उभारावे, अशी मागणी त्यांनी केली. विदर्भात व मराठवाड्यातील उद्योगांना ४.४० रुपये प्रति युनिट दराने वीज उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनासुद्धा १२ तास वीज मिळणार आहे. नागपूर हे देशाचे मध्यवर्ती शहर असल्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे केंद्र असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.नियमांचे पालन करून जमीन दिलीसरकारने बाबा रामदेव यांच्या फूड पार्कला नियमांचे पालन करून जमीन दिल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. यासाठी सचिवस्तराच्या चार सदस्यांची समिती नेमली होती. २३० एकर जागेसाठी निविदा काढली तेव्हा फक्त पतंजलीने निविदा भरली होती. दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा काढली तेव्हासुद्धा एकमेव पतंजलीने निविदा भरली होती. एकच गुंतवणूकदार पुढे आल्याने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) तिसऱ्यांदा निविदा काढली. त्यावेळी पतंजलीव्यतिरिक्त कुणीही निविदा भरली नाही. त्यामुळे केंद्रीय दक्षतेच्या नियमानुसार पतंजलीला जागा देण्यात आली. कंपनीने जमिनीची किंमत निर्धारित रकमेपक्षा जास्त दिली. फूड पार्कमध्ये कुणीही जमीन घेऊ शकतोमिहानमधील फूडपार्कमध्ये ५०० एकर जागा आहे. त्यापैकी पतंजलीला २३० एकर जागा दिली आहे. आणखी २७० एकर जागा शिल्लक आहे. कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्याची कुण्या उद्योजकाची इच्छा असेल तर त्यांनी निविदा प्रक्रियेद्वारे जागा खरेदी करावी. जागेची विक्री पारदर्शकपणे करण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. कृषी आधारित प्रक्रिया उद्योग उभारून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले. पतंजलीने विदर्भात उद्योग सुरू करावेत- गडकरी गडकरी म्हणाले, विदर्भात ७५ टक्के जंगल आहे. या जंगलातील आदिवासींतर्फे उत्पादित आणि अमरावती मेळघाट येथील जडीबुटी पतंजली खरेदी करणार आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली येथे मुबलक प्रमाणात जडीबुटी आहेत. गडचिरोली येथे प्रकल्पासाठी जागा सुधीर मुनगंटीवार देणार आहेत. गडकरी म्हणाले, विदर्भात शेतीपूरक रोजगार नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. या उद्योगामुळे गावातील युवकांना रोजगार मिळेल. अमरावती नांदगावपेठ येथे १२ टेक्सटाईल उद्योग सुरू झाले असून तेथे ८ ते १० हजार युवकांना काम मिळाले आहे. याशिवाय मिहानमध्ये आयटी उद्योगात जवळपास १५ हजार युवकांना रोजगार मिळाला आहे. भद्रावती येथे कोळशावर आधारित युरिया निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. देशातील गरिबी दूर होण्यासाठी स्वदेशी मालाचा उपयोग करण्याचे आवाहन गडकरी यांनी केले. मीसुद्धा पतंजलीच्या उत्पादनांचा उपयोग करीत असल्याचे गडकरी म्हणाले. पतंजली विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी उद्योग सुरू करेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.तीनपाट नेत्यांचे नावही घेणार नाहीकाँग्रेसचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी रामदेव बाबा यांच्या पतंजली फूडला दिलेल्या जमिनीवरून केलेल्या आरोपांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रोखठोक उत्तर दिले. ते म्हणाले, रामदेव बाबा यांना दिलेली जमीन सेझच्या बाहेर आहे. सर्व जागा नियमाप्रमाणे निविदा काढून दिली आहे. आधीच्या सरकारने मिहानमध्ये रोजगार निर्मितीसाठी काय केले ? इथे काही विघ्नसंतोषी नेते आहेत. जे सत्तेत असताना स्वत: काही करू शकले नाहीत. त्यांनी आयुष्यभर फक्त स्वत:च्या मुलांच्या रोजगाराची काळजी घेतली. त्या तीनपाट नेत्यांचे मी नावही घेणार नाही. उगीच त्या विघ्नसंतोषी नेत्यांना यामुळे महत्व मिळते, असा हल्ला गडकरींनी चढवला. सहा महिन्यांत प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणारप्रास्ताविक करताना आचार्य बालकृष्ण म्हणाले, मिहानमधील प्रकल्प पतंजलीच्या हरिद्वार येथील प्रकल्पापेक्षा चारपट मोठा आहे. शासकीय नियम आणि दरानुसार पतंजलीने २३० एकर जमीन खरेदी केली आहे. प्रत्यक्ष गुंतवणूक १६०० कोटींची असून पहिल्या टप्प्यात १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. सर्व पैसा कर्जस्वरुपात उभारण्यात येणार आहे. या जमिनीवर प्रकल्प उभारून सहा महिन्यात प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणार आहे. पतंजलीचा नफा चॅरिटीला जाणार आहे. त्याद्वारे विकास आणि शैक्षणिक कामे करण्यात येणार आहे. प्रारंभी बाबा रामदेव यांनी जवळपास एक तास योग प्रात्यक्षिके करून दाखविली आणि साधकांना दरदिवशी करण्याचे आवाहन केले. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढून आरोग्य निरोगी राहते, असे बाबा रामदेव म्हणाले.