शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पूलावरील पाण्यामुळे शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

भिवापूर : कारगाव-वासी नदी पात्रावरील पुलाच्या पायल्यांमध्ये काटेरी झुडूपे आणि कचरा अडकल्याने पाण्याचा वाहता प्रवाह थांबला आहे. त्यामुळे नदीला ...

भिवापूर : कारगाव-वासी नदी पात्रावरील पुलाच्या पायल्यांमध्ये काटेरी झुडूपे आणि कचरा अडकल्याने पाण्याचा वाहता प्रवाह थांबला आहे. त्यामुळे नदीला पूर येत असून वाहतूक ठप्प होत आहे. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येची दखल घेऊन प्रशासनाने पुलाच्या पायल्या तात्काळ स्वच्छ कराव्यात, अशी मागणी दोन्ही गावातील नागरिकांनी केली आहे.

तालुक्यातील कारगाव व वासी या दोन गावांना जोडणाऱ्या मार्गावर मरू नदी आहे. शिवाय खैरगावकडून वाहत येणाऱ्या अन्य एका नदीचा संगमही याच ठिकाणी होतो. त्यामुळे या नदीचे पात्र विस्तीर्ण असून त्यावर अंदाजे १० ते १२ पायल्यांचा पूल उभा आहे. गतवर्षी पासून नदीपात्राची व पुलाच्या पायल्यांची स्वच्छता करण्यात आलेली नाही. अशातच आठवडाभरापासून पाऊस सुरू असल्यामुळे नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत आलेली काटेरी झुडूपे व कचरा मोठ्या प्रमाणात पुलाच्या पायल्यांमध्ये अडकला आहे. पाणी वाहून जाण्यासाठी जागाच नसल्याने नदीपात्रातील पाणी पुलाच्या वरून वाहत असून त्यामुळे वाहतूकही ठप्प आहे.

शेतीचा हंगाम सुरू आहे. अशात शेतकऱ्यांना शेतात कामासाठी, खते व बियाणे खरेदीसाठी तालुकास्थळी जावे लागते. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे पायल्यांमध्ये अडकलेली काटेरी झुडूपे काढून नदीपात्र स्वच्छ करण्याची मागणी वासी येथील सोनबा मेश्राम, शेषराव भोयर, प्रभाकर मानकर, आशिष राऊत, अविनाश राऊत, अधिकरण तिडके, दिगांबर वानखेडे, चेतन मेश्राम, गोकुळ भोयर, रवींद्र इंगळे आदींनी केली आहे.