शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पूलावरील पाण्यामुळे शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

भिवापूर : कारगाव-वासी नदी पात्रावरील पुलाच्या पायल्यांमध्ये काटेरी झुडूपे आणि कचरा अडकल्याने पाण्याचा वाहता प्रवाह थांबला आहे. त्यामुळे नदीला ...

भिवापूर : कारगाव-वासी नदी पात्रावरील पुलाच्या पायल्यांमध्ये काटेरी झुडूपे आणि कचरा अडकल्याने पाण्याचा वाहता प्रवाह थांबला आहे. त्यामुळे नदीला पूर येत असून वाहतूक ठप्प होत आहे. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येची दखल घेऊन प्रशासनाने पुलाच्या पायल्या तात्काळ स्वच्छ कराव्यात, अशी मागणी दोन्ही गावातील नागरिकांनी केली आहे.

तालुक्यातील कारगाव व वासी या दोन गावांना जोडणाऱ्या मार्गावर मरू नदी आहे. शिवाय खैरगावकडून वाहत येणाऱ्या अन्य एका नदीचा संगमही याच ठिकाणी होतो. त्यामुळे या नदीचे पात्र विस्तीर्ण असून त्यावर अंदाजे १० ते १२ पायल्यांचा पूल उभा आहे. गतवर्षी पासून नदीपात्राची व पुलाच्या पायल्यांची स्वच्छता करण्यात आलेली नाही. अशातच आठवडाभरापासून पाऊस सुरू असल्यामुळे नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत आलेली काटेरी झुडूपे व कचरा मोठ्या प्रमाणात पुलाच्या पायल्यांमध्ये अडकला आहे. पाणी वाहून जाण्यासाठी जागाच नसल्याने नदीपात्रातील पाणी पुलाच्या वरून वाहत असून त्यामुळे वाहतूकही ठप्प आहे.

शेतीचा हंगाम सुरू आहे. अशात शेतकऱ्यांना शेतात कामासाठी, खते व बियाणे खरेदीसाठी तालुकास्थळी जावे लागते. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे पायल्यांमध्ये अडकलेली काटेरी झुडूपे काढून नदीपात्र स्वच्छ करण्याची मागणी वासी येथील सोनबा मेश्राम, शेषराव भोयर, प्रभाकर मानकर, आशिष राऊत, अविनाश राऊत, अधिकरण तिडके, दिगांबर वानखेडे, चेतन मेश्राम, गोकुळ भोयर, रवींद्र इंगळे आदींनी केली आहे.