शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

शेतकऱ्यांनी जैविक शेतीकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : शेतकरी रासायनिक खतांचा माेठ्या प्रमाणात वापर करतात. यामुळे जमिनीची सुपीकता कमी हाेत असून, उत्पादन ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : शेतकरी रासायनिक खतांचा माेठ्या प्रमाणात वापर करतात. यामुळे जमिनीची सुपीकता कमी हाेत असून, उत्पादन खर्चही वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीही पडत नाही. अनेकदा खतांची टंचाईसुद्धा जाणवते. यामुळे शेतकऱ्यांनी जैविक शेतीकडे वळावे, असा सल्ला कृषी अधिकारी देत आहेत.

रासायनिक खताचा वापर कमी करणे व संतुलित वापर हाेण्याच्या दृष्टीने खरीप हंगाम २०२१ मध्ये रासायनिक खत बचतीची विशेष माेहीम हाती घेण्यात आली आहे. १० टक्के रासायनिक खताचा वापर कमी करणे, हे उद्दिष्ट समाेर ठेवून रामटेक तालुक्यात ही माेहीम राबविली जात आहे.

धान, साेयाबीन, कपाशी, ऊस पीक वापरावर विविध फायदेशीर पर्याय उपलब्ध करून देणे, ग्रामपंचायत स्तरावर जमीन सुपीकता निर्देशांक दाखविणारा फलक लावणे व त्याचे सामूहिक वाचन करणे, जमीन आराेग्य पत्रिकेनुसार खताचा वापर करणे, जैविक खताची बीजप्रक्रिया करणे, हिरवळीच्या खतांच्या बियाण्यांचे अनुदानावर वितरण करणे, धान पिकावर युरिया ब्रिकेटचा वापर वाढविण्यासाठी त्याचे उत्पादन व वितरण करणे, कृषी सेवा केंद्र संचालक, चालकांना प्रशिक्षण देणे, जमिनीत सेंद्रिय कर्बाची वाढ हाेण्यासाठी, उसाची पाचट जागेवर कुजविणे, व्हर्मीकंपाेस्ट, गांडूळ खत, कंपाेस्ट खत, आदींचा वापर वाढवून रासायनिक खताची मागणी कमी करणे, विविव पीक याेजनेंतर्गत प्रशिक्षण वर्ग व प्रात्यक्षिकाचे आयाेजन करणे, आदी बाबींचा प्रसार-प्रचार करण्याचे नियाेजन कृषी विभागाने केले आहे. या माेहिमेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी स्वप्निल माने यांनी केले आहे.