शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेतकऱ्यांनी शेतमाल प्रक्रिया उद्याेगाकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : बदलत्या काळानुरूप शेतकऱ्यांनी बदलायला हवे. परंपरागत पद्धतीने शेती करण्याऐवजी सेंद्रिय खतांच्या वापरावर भर द्यावा. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : बदलत्या काळानुरूप शेतकऱ्यांनी बदलायला हवे. परंपरागत पद्धतीने शेती करण्याऐवजी सेंद्रिय खतांच्या वापरावर भर द्यावा. उत्पादित शेतमालावर प्रक्रिया करून ताे बाजारात विकावा. यासाठी शेतकऱ्यांनी शेतमाल प्रक्रिया उद्याेगाकडे वळायला पाहिजे, असे प्रतिपादन नागपूर ऑरगॅनिक ॲग्रो प्रोड्युसरचे संचालक गजानन गिराेलकर यांनी रामटेक तालुक्यातील किरणापूर (काचूरवाही) येथे आयाेजित शेतीची औद्योगिकतेकडे वाटचाल या विषयावरील कार्यशाळेत केले.

या कार्यशाळेचे आयाेजन नागपूर येथील कृषी भारत वृत्त संस्था व रामटेक येथील आकाशझेप फाऊंडेशनच्यावतीने आम्ही भारतीय अभियानांतर्गत करण्यात आले हाेते. शेतकऱ्यांनी शेतमाल प्रक्रिया उद्याेगाकडे वळणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शेतकऱ्यांना ऑरगॅनिक तुरीचे बियाणे मोफत वाटण्यात आले. शेतकऱ्यांच्यावतीने कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल गजानन गिरोलकर यांचा गाैरवही करण्यात आला.

प्रफुल्ल राऊत यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेची रूपरेषा स्पष्ट केली. संचालन साक्षोधन कडबे यांनी केले तर श्याम कडू यांनी आभार मानले. याप्रसंगी आकाशझेपचे संचालक वैभव तुरक, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कुथे, उदाराम हूड, शेषराज कुथे, भोजराज वानखेडे, दुतियोधन कडबे, कपिल देवगडे, कीर्तीकुमार कुथे, कुणाल हूड, वसंता कुथे, घनश्याम ठाकरे, विशाल हूड, गोपाल हूड, अविनाश कुथे, नारायण चौधरी, हरीश हूड, विठ्ठल कडू, बारीक मेश्राम, राहुल ठाकरे, परमेश्वर ठाकरे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित हाेते.