शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

पीक कर्जापासून शेतकरी वंचित राहू नये

By admin | Updated: June 18, 2017 02:30 IST

शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज पुरवठा करताना सर्व बँकांनी पीक कर्जापासून कुणीही वंचित राहणार नाही

चंद्र्रशेखर बावनकुळे : सुलभ पीक कर्ज वाटप अभियानाचा आढावा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज पुरवठा करताना सर्व बँकांनी पीक कर्जापासून कुणीही वंचित राहणार नाही याची खबरादारी घेतानाच सहज व सुलभपणे कर्ज पुरवठा होईल याची खबरदारी घेण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सुलभ पीक कर्ज अभियानासंदर्भात अग्रणी बँक, राष्ट्रीयीकृत बँक तसेच जिल्हा सहकारी बँकेच्या बैठकीत पालकमंत्री बावनकुळे यांनी खरीप पीक कर्जाचा आढावा घेतला त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा उपनिबंधक भोसले, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अयुब खान, तसेच महसूल विभागाचे सर्व उपविभागीय अधिकारी व बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते. शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज वाटपासाठी जिल्ह्याला ८३० कोटी ९९ लक्ष रुपयाचे उद्दिष्ट देण्यात आले असून १५ जूनपर्यंत ३०६७८ शेतकरी सभासदांना ३२३ लाख रुपयाचे कर्ज वाटप पूर्ण झाले आहे. आतापर्यंत ३९ टक्के कर्ज वाटप झाले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मागील वर्षी राबविण्यात आलेल्या महापीक कर्ज वाटप मेळावे आयोजित करून राज्यात सर्वात उत्कृष्ट कार्य करून जिल्हा प्रशासनाने राज्यस्तरावर नावलौकिक कायम ठेवावा, अशा सूचना पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. प्रारंभी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी खरीप पीक कर्ज वाटपासाठी दर शुक्रवारी तालुकास्तरावर पीक कर्ज वाटपासाठी मोहीम घेण्यात येत असून तालुक्यात एकाच दिवशी पीक कर्ज मेळावे करण्यात येत आहे. आतापर्यंत दोन पीक कर्ज मेळावे पार पडले असून त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दीड हजार सोलरपंप ७५ टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोलरपंप देण्याच्या योजनेंतर्गत जिल्ह्यातील दीड हजार शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर सोलरपंपाचे वाटप करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी केवळ २५ हजार रुपये देऊन या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी केले. शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोलरपंप उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्यात राबविण्यात येत असून सुमारे चार लक्ष रुपये किमतीचा सोलरपंप शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर म्हणजेच केवळ २५ हजार रुपये भरून वाटप करण्यात येणार आहेत. सोलरपंपामुळे पुढील २५ वर्षे शेतकऱ्यांना वीज बिल देण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोलरपंप योजनेत सहभाग वाढवावा, असेही बावनकुळे यांनी सांगितले. या योजनेसाठी यापूर्वी पाच एकर शेतीची असलेली मर्यादा आता दहा एकरपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. मान्सूनपूर्व तयारीचा आढावा अतिवृष्टी व पावसामुळे बाधित होणारी गावे तसेच नदीकाठावरील पुराचा धोका असलेल्या गावामध्ये जिल्हा प्रशासनातर्फे खबरदारीच्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.