शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जापासून शेतकरी वंचित राहू नये

By admin | Updated: June 18, 2017 02:30 IST

शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज पुरवठा करताना सर्व बँकांनी पीक कर्जापासून कुणीही वंचित राहणार नाही

चंद्र्रशेखर बावनकुळे : सुलभ पीक कर्ज वाटप अभियानाचा आढावा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज पुरवठा करताना सर्व बँकांनी पीक कर्जापासून कुणीही वंचित राहणार नाही याची खबरादारी घेतानाच सहज व सुलभपणे कर्ज पुरवठा होईल याची खबरदारी घेण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सुलभ पीक कर्ज अभियानासंदर्भात अग्रणी बँक, राष्ट्रीयीकृत बँक तसेच जिल्हा सहकारी बँकेच्या बैठकीत पालकमंत्री बावनकुळे यांनी खरीप पीक कर्जाचा आढावा घेतला त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा उपनिबंधक भोसले, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अयुब खान, तसेच महसूल विभागाचे सर्व उपविभागीय अधिकारी व बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते. शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज वाटपासाठी जिल्ह्याला ८३० कोटी ९९ लक्ष रुपयाचे उद्दिष्ट देण्यात आले असून १५ जूनपर्यंत ३०६७८ शेतकरी सभासदांना ३२३ लाख रुपयाचे कर्ज वाटप पूर्ण झाले आहे. आतापर्यंत ३९ टक्के कर्ज वाटप झाले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मागील वर्षी राबविण्यात आलेल्या महापीक कर्ज वाटप मेळावे आयोजित करून राज्यात सर्वात उत्कृष्ट कार्य करून जिल्हा प्रशासनाने राज्यस्तरावर नावलौकिक कायम ठेवावा, अशा सूचना पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. प्रारंभी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी खरीप पीक कर्ज वाटपासाठी दर शुक्रवारी तालुकास्तरावर पीक कर्ज वाटपासाठी मोहीम घेण्यात येत असून तालुक्यात एकाच दिवशी पीक कर्ज मेळावे करण्यात येत आहे. आतापर्यंत दोन पीक कर्ज मेळावे पार पडले असून त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दीड हजार सोलरपंप ७५ टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोलरपंप देण्याच्या योजनेंतर्गत जिल्ह्यातील दीड हजार शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर सोलरपंपाचे वाटप करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी केवळ २५ हजार रुपये देऊन या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी केले. शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोलरपंप उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्यात राबविण्यात येत असून सुमारे चार लक्ष रुपये किमतीचा सोलरपंप शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर म्हणजेच केवळ २५ हजार रुपये भरून वाटप करण्यात येणार आहेत. सोलरपंपामुळे पुढील २५ वर्षे शेतकऱ्यांना वीज बिल देण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोलरपंप योजनेत सहभाग वाढवावा, असेही बावनकुळे यांनी सांगितले. या योजनेसाठी यापूर्वी पाच एकर शेतीची असलेली मर्यादा आता दहा एकरपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. मान्सूनपूर्व तयारीचा आढावा अतिवृष्टी व पावसामुळे बाधित होणारी गावे तसेच नदीकाठावरील पुराचा धोका असलेल्या गावामध्ये जिल्हा प्रशासनातर्फे खबरदारीच्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.