शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

साेयाबीन बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिचाळा : भिवापूर तालुक्यातील चिचाळा परिसरात शेतकऱ्यांनी ८ जूनपासून पेरणीला सुरुवात केली. तीन दिवसात ५० टक्के ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिचाळा : भिवापूर तालुक्यातील चिचाळा परिसरात शेतकऱ्यांनी ८ जूनपासून पेरणीला सुरुवात केली. तीन दिवसात ५० टक्के पेरणी पूर्ण झाली हाेती. त्यातच साेयाबीनच्या पेरणीनंतर मुसळधार पाऊस काेसळल्याने तसेच पावसाचे पाणी पेरणीच्या चऱ्यांमध्ये साचून राहिल्याने बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. बाजारात साेयाबीन बियाण्यांचा तुटवडा असल्याने पुन्हा पेरणी करण्यासाठी बियाणे आणायचे कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून बियाण्यांसाठी त्यांची भटकंती सुरू झाली आहे.

चिचाळा (ता. भिवापूर) परिसरातील चिचाळा, पाहमी, बोटेझरी, गरडापार, मालेवाडा, उखळी, सरांडी, मांडवा, शिवापूर या शिवारात साेयाबीनची माेठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली असून, बहुतांश पेरणी १२ जूनपर्यंत आटाेपली हाेती. परंतु, पेरणी केलेले साेयाबीन न उगवल्याने शेतकऱ्यांच्या ताेंडचे पाणी पळाले आणि चिंतेत भर पडली. बियाणे नेमके मुसळधार पावसामुळे उगवले नाही की त्याची उगवणक्षमताच कमी हाेती, हे कळायला मार्ग नाही.

कृषी सेवा केंद्रांमध्ये साेयाबीन बियाणे मिळत नसल्याने काहींनी शेतकऱ्यांकडे घरगुती साेयाबीन बियाणे खरेदी केले. घरगुती बियाणेही ८ ते ९ हजार रुपये प्रति क्विंटल रुपये दराने खरेदी करावे लागत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. कंपनीच्या बियाण्यांचा दर ११ ते १३ हजार रुपये प्रति क्विंटल असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. एकीकडे पीक कर्ज मिळत नाही, दुसरीकडे बियाणे मिळत नसून खरेदीसाठी पैसेही नाही, अशा तिहेरी संकटात सापडलाे असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

...

वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात शाेध

दुबार पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी साेयाबीनच्या पिकाची निवड केली असून, साेयाबीन बियाण्यांच्या शाेधात शेतकऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, गिरड, काेरा व समुद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील तसेच तालुक्यातील गावांमधील कृषी सेवा केंद्रांचे उंबरठे झिजवायला सुरुवात केली आहे.

...

उगणवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह

मागील हंगामात खाेडकीड, मूळकुज व येल्लाे माेझॅकमुळे साेयाबीनच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यातून वाचलेले साेयाबीनचे पीक कापणीच्या वेळी परतीच्या पावसामुळे भिजले. त्यामुळे त्या बियाण्यांची उगवण क्षमता जेमतेम असतानाही कृषी विभागाने शेतकऱ्यांना घरगुती बियाणे त्याच्या उगवण क्षमतेप्रमाणे पेरण्याबाबत जनजागृती केली. मात्र, संपूर्ण राज्यभर साेयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा असून, साेयाबीला पर्याय म्हणून दुसरे प्रभावी पीक घेण्याबाबत कुणीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या भरीस पडले नाही.