शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

साेयाबीन बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिचाळा : भिवापूर तालुक्यातील चिचाळा परिसरात शेतकऱ्यांनी ८ जूनपासून पेरणीला सुरुवात केली. तीन दिवसात ५० टक्के ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिचाळा : भिवापूर तालुक्यातील चिचाळा परिसरात शेतकऱ्यांनी ८ जूनपासून पेरणीला सुरुवात केली. तीन दिवसात ५० टक्के पेरणी पूर्ण झाली हाेती. त्यातच साेयाबीनच्या पेरणीनंतर मुसळधार पाऊस काेसळल्याने तसेच पावसाचे पाणी पेरणीच्या चऱ्यांमध्ये साचून राहिल्याने बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. बाजारात साेयाबीन बियाण्यांचा तुटवडा असल्याने पुन्हा पेरणी करण्यासाठी बियाणे आणायचे कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून बियाण्यांसाठी त्यांची भटकंती सुरू झाली आहे.

चिचाळा (ता. भिवापूर) परिसरातील चिचाळा, पाहमी, बोटेझरी, गरडापार, मालेवाडा, उखळी, सरांडी, मांडवा, शिवापूर या शिवारात साेयाबीनची माेठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली असून, बहुतांश पेरणी १२ जूनपर्यंत आटाेपली हाेती. परंतु, पेरणी केलेले साेयाबीन न उगवल्याने शेतकऱ्यांच्या ताेंडचे पाणी पळाले आणि चिंतेत भर पडली. बियाणे नेमके मुसळधार पावसामुळे उगवले नाही की त्याची उगवणक्षमताच कमी हाेती, हे कळायला मार्ग नाही.

कृषी सेवा केंद्रांमध्ये साेयाबीन बियाणे मिळत नसल्याने काहींनी शेतकऱ्यांकडे घरगुती साेयाबीन बियाणे खरेदी केले. घरगुती बियाणेही ८ ते ९ हजार रुपये प्रति क्विंटल रुपये दराने खरेदी करावे लागत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. कंपनीच्या बियाण्यांचा दर ११ ते १३ हजार रुपये प्रति क्विंटल असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. एकीकडे पीक कर्ज मिळत नाही, दुसरीकडे बियाणे मिळत नसून खरेदीसाठी पैसेही नाही, अशा तिहेरी संकटात सापडलाे असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

...

वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात शाेध

दुबार पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी साेयाबीनच्या पिकाची निवड केली असून, साेयाबीन बियाण्यांच्या शाेधात शेतकऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, गिरड, काेरा व समुद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील तसेच तालुक्यातील गावांमधील कृषी सेवा केंद्रांचे उंबरठे झिजवायला सुरुवात केली आहे.

...

उगणवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह

मागील हंगामात खाेडकीड, मूळकुज व येल्लाे माेझॅकमुळे साेयाबीनच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यातून वाचलेले साेयाबीनचे पीक कापणीच्या वेळी परतीच्या पावसामुळे भिजले. त्यामुळे त्या बियाण्यांची उगवण क्षमता जेमतेम असतानाही कृषी विभागाने शेतकऱ्यांना घरगुती बियाणे त्याच्या उगवण क्षमतेप्रमाणे पेरण्याबाबत जनजागृती केली. मात्र, संपूर्ण राज्यभर साेयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा असून, साेयाबीला पर्याय म्हणून दुसरे प्रभावी पीक घेण्याबाबत कुणीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या भरीस पडले नाही.