शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

साेयाबीन बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिचाळा : भिवापूर तालुक्यातील चिचाळा परिसरात शेतकऱ्यांनी ८ जूनपासून पेरणीला सुरुवात केली. तीन दिवसात ५० टक्के ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिचाळा : भिवापूर तालुक्यातील चिचाळा परिसरात शेतकऱ्यांनी ८ जूनपासून पेरणीला सुरुवात केली. तीन दिवसात ५० टक्के पेरणी पूर्ण झाली हाेती. त्यातच साेयाबीनच्या पेरणीनंतर मुसळधार पाऊस काेसळल्याने तसेच पावसाचे पाणी पेरणीच्या चऱ्यांमध्ये साचून राहिल्याने बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. बाजारात साेयाबीन बियाण्यांचा तुटवडा असल्याने पुन्हा पेरणी करण्यासाठी बियाणे आणायचे कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून बियाण्यांसाठी त्यांची भटकंती सुरू झाली आहे.

चिचाळा (ता. भिवापूर) परिसरातील चिचाळा, पाहमी, बोटेझरी, गरडापार, मालेवाडा, उखळी, सरांडी, मांडवा, शिवापूर या शिवारात साेयाबीनची माेठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली असून, बहुतांश पेरणी १२ जूनपर्यंत आटाेपली हाेती. परंतु, पेरणी केलेले साेयाबीन न उगवल्याने शेतकऱ्यांच्या ताेंडचे पाणी पळाले आणि चिंतेत भर पडली. बियाणे नेमके मुसळधार पावसामुळे उगवले नाही की त्याची उगवणक्षमताच कमी हाेती, हे कळायला मार्ग नाही.

कृषी सेवा केंद्रांमध्ये साेयाबीन बियाणे मिळत नसल्याने काहींनी शेतकऱ्यांकडे घरगुती साेयाबीन बियाणे खरेदी केले. घरगुती बियाणेही ८ ते ९ हजार रुपये प्रति क्विंटल रुपये दराने खरेदी करावे लागत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. कंपनीच्या बियाण्यांचा दर ११ ते १३ हजार रुपये प्रति क्विंटल असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. एकीकडे पीक कर्ज मिळत नाही, दुसरीकडे बियाणे मिळत नसून खरेदीसाठी पैसेही नाही, अशा तिहेरी संकटात सापडलाे असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

...

वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात शाेध

दुबार पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी साेयाबीनच्या पिकाची निवड केली असून, साेयाबीन बियाण्यांच्या शाेधात शेतकऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, गिरड, काेरा व समुद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील तसेच तालुक्यातील गावांमधील कृषी सेवा केंद्रांचे उंबरठे झिजवायला सुरुवात केली आहे.

...

उगणवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह

मागील हंगामात खाेडकीड, मूळकुज व येल्लाे माेझॅकमुळे साेयाबीनच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यातून वाचलेले साेयाबीनचे पीक कापणीच्या वेळी परतीच्या पावसामुळे भिजले. त्यामुळे त्या बियाण्यांची उगवण क्षमता जेमतेम असतानाही कृषी विभागाने शेतकऱ्यांना घरगुती बियाणे त्याच्या उगवण क्षमतेप्रमाणे पेरण्याबाबत जनजागृती केली. मात्र, संपूर्ण राज्यभर साेयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा असून, साेयाबीला पर्याय म्हणून दुसरे प्रभावी पीक घेण्याबाबत कुणीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या भरीस पडले नाही.