शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

साेयाबीन बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिचाळा : भिवापूर तालुक्यातील चिचाळा परिसरात शेतकऱ्यांनी ८ जूनपासून पेरणीला सुरुवात केली. तीन दिवसात ५० टक्के ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिचाळा : भिवापूर तालुक्यातील चिचाळा परिसरात शेतकऱ्यांनी ८ जूनपासून पेरणीला सुरुवात केली. तीन दिवसात ५० टक्के पेरणी पूर्ण झाली हाेती. त्यातच साेयाबीनच्या पेरणीनंतर मुसळधार पाऊस काेसळल्याने तसेच पावसाचे पाणी पेरणीच्या चऱ्यांमध्ये साचून राहिल्याने बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. बाजारात साेयाबीन बियाण्यांचा तुटवडा असल्याने पुन्हा पेरणी करण्यासाठी बियाणे आणायचे कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून बियाण्यांसाठी त्यांची भटकंती सुरू झाली आहे.

चिचाळा (ता. भिवापूर) परिसरातील चिचाळा, पाहमी, बोटेझरी, गरडापार, मालेवाडा, उखळी, सरांडी, मांडवा, शिवापूर या शिवारात साेयाबीनची माेठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली असून, बहुतांश पेरणी १२ जूनपर्यंत आटाेपली हाेती. परंतु, पेरणी केलेले साेयाबीन न उगवल्याने शेतकऱ्यांच्या ताेंडचे पाणी पळाले आणि चिंतेत भर पडली. बियाणे नेमके मुसळधार पावसामुळे उगवले नाही की त्याची उगवणक्षमताच कमी हाेती, हे कळायला मार्ग नाही.

कृषी सेवा केंद्रांमध्ये साेयाबीन बियाणे मिळत नसल्याने काहींनी शेतकऱ्यांकडे घरगुती साेयाबीन बियाणे खरेदी केले. घरगुती बियाणेही ८ ते ९ हजार रुपये प्रति क्विंटल रुपये दराने खरेदी करावे लागत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. कंपनीच्या बियाण्यांचा दर ११ ते १३ हजार रुपये प्रति क्विंटल असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. एकीकडे पीक कर्ज मिळत नाही, दुसरीकडे बियाणे मिळत नसून खरेदीसाठी पैसेही नाही, अशा तिहेरी संकटात सापडलाे असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

...

वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात शाेध

दुबार पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी साेयाबीनच्या पिकाची निवड केली असून, साेयाबीन बियाण्यांच्या शाेधात शेतकऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, गिरड, काेरा व समुद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील तसेच तालुक्यातील गावांमधील कृषी सेवा केंद्रांचे उंबरठे झिजवायला सुरुवात केली आहे.

...

उगणवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह

मागील हंगामात खाेडकीड, मूळकुज व येल्लाे माेझॅकमुळे साेयाबीनच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यातून वाचलेले साेयाबीनचे पीक कापणीच्या वेळी परतीच्या पावसामुळे भिजले. त्यामुळे त्या बियाण्यांची उगवण क्षमता जेमतेम असतानाही कृषी विभागाने शेतकऱ्यांना घरगुती बियाणे त्याच्या उगवण क्षमतेप्रमाणे पेरण्याबाबत जनजागृती केली. मात्र, संपूर्ण राज्यभर साेयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा असून, साेयाबीला पर्याय म्हणून दुसरे प्रभावी पीक घेण्याबाबत कुणीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या भरीस पडले नाही.