शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील शेतकरी आंदोलनातील सहभागासाठी शेतकरी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:07 IST

नागपूर : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांचा जत्था रविवारी नागपुरातून दिल्लीकडे रवाना झाला. तत्पूर्वी ...

नागपूर : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांचा जत्था रविवारी नागपुरातून दिल्लीकडे रवाना झाला. तत्पूर्वी संविधान चौकात सभा झाली, त्यानंतर वाहनांनी हे महिला-पुरुष शेतकरी सावनेरमार्गे रवाना झाले.

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्यावतीने सायंकाळी ५ वाजता शेतकरी नेते श्याम काळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. व्यासपीठावर सिटूचे शिवकुमार गणवीर, धारावी मुंबई येथील कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी, तुकाराम भस्मे, ढासाळा (जि. परभणी) येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला सविता जाधव, राष्ट्रीय सचिव नामदेव गावडे, परभणी येथील माणिक कदम, नागदेव ढवळे, प्रशांत पवार आदी उपस्थित होते. या नेत्यांनी सभेमध्ये मार्गदर्शन केले. प्रास्ताविक समन्वयक राजन क्षीरसागर यांनी तर संचालन अरुण बनकर यांनी केले.

...

राज्यभरातील शेतकरी दाखल

नियोजनानुसार, दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागातील शेतकरी दुपारपासून नागपुरात पोहचणे सुरू झाले होते. यात मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, अहमदनगर, नाशिक येथील शेतकऱ्यांचा समावेश आहे. सायंकाळी सभेनंतर ही किसान यात्रा रवाना झाली. सावनेरमध्ये रात्रीच्या मुक्कामानंतर ही शेतकरी यात्रा इंदोर, कोटा, जयपूर मार्गे शहजहापूर येथे पोहचल्यावर दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनात सहभागी होणार आहे.

...

केंद्र सरकारने केलेले कायदे अन्यायकारक असल्याने ते रद्द करावे यासाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू आहे. मात्र सरकार हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी रोज प्रयत्न करीत आहे. तिन्ही कायदे रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, त्या आंदोलनाला ताकद देण्यासाठीच महाराष्ट्रातील शेतकरी जात आहेत. या आंदोलनाची धार आम्ही मजबूत करू.

- श्याम काळे, शेतकरी नेते

...

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी जशी ताकद निर्माण केली होती, तीच ताकद किसान संघर्ष यात्रेच्या माध्यमातून दिल्लीत दाखवून देऊ. शेतकऱ्यांच्या दमनाविरूद्ध आम्ही सारे एकत्र आलो आहोत. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही अखेरपर्यंत दिल्लीत लढा देऊ.

- प्रकाश रेड्डी, कम्युनिस्ट नेते, धारावी, मुंबई

...

रविनगर चौकात स्वागत

गंगाखेड येथून निघालेली किसान संघर्ष यात्रा नागपुरात पोहचल्यावर नागपुरातील जय जवान जय किसान संघटनेच्यावतीने रविनगर चौकात स्वागत करण्यात आले. शेतकऱ्यांना चहापान देण्यात अले. त्यानंतर जत्था घोषणा देत सभास्थळी पोहचला. नाशिकमधील शेतकऱ्यांसोबत ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे कार्यकर्तेही डफासह दाखल झाले आहेत. परभणी येथील जत्थ्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील २६ महिलांचा समावेश आहे.

...

...