शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

काटोल-नरखेड तालुक्यातील शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:10 IST

काटोल : राज्य सरकारने २०१७ मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली होती. परंतु ती कर्जमाफी सरसकट नसल्याने त्यावेळी फक्त ६० ...

काटोल : राज्य सरकारने २०१७ मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली होती. परंतु ती कर्जमाफी सरसकट नसल्याने त्यावेळी फक्त ६० ते ६५ टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा फायदा झाला. नागपूर जिल्ह्यातील ९,५६६ तर काटोल व नरखेड तालुक्यातील ३,५१८ शेतकरी त्या कर्जमाफीपासून वंचित आहेत. आता सात वर्षानंतर बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत. २०१७ मध्ये तत्कालीन सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली होती. त्यामध्ये ३० जून २०१३ पर्यंत शेतकऱ्याकडे असलेल्या कर्जापैकी दीड लाखाच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु त्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या कर्जमाफी पोर्टलवर जाऊन शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावे लागतील, असे स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले. आधारकार्डप्रमाणे अंगठा (थम्ब इम्प्रेशन) लावून दिले. संबंधित बँकांनी थकीत कर्जमाफीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले होते. त्याप्रमाणे ६० ते ६५ टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. परंतु आजही त्या कर्जमाफी योजनेतील काही शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत. एकट्या नागपूर जिल्ह्यात ९,५६६ तर काटोल व नरखेड तालूक्यातील ३,५१९ शेतकऱ्यांचा यात समावेश असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांनी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर कर्जमाफीची प्रक्रिया २०१८ पर्यत सुरू होती. त्या काळात शासनाकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेल्या प्रकरणातील याद्या बँकेत लावल्या गेल्या. ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत नव्हती ते शेतकरी पुढील यादीत नाव येईल, या आशेवर होते. आता शेतकऱ्यांना बँकांकडून वसुलीच्या नोटीस येत आहेत. या नोटीसमध्ये संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले होते. मात्र प्रस्ताव नाकारण्यात आल्याने कर्जाचा भरणा करण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही त्यांना संबंधित योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी काटोल सिटीझन फोरमच्या वतीने जिल्हा आणि तालुका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.