शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची होळी खरेदी केंद्रावरच

By admin | Updated: March 12, 2017 02:47 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भारतीय खाद्य महामंडळ (फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया - एफसीआय)च्यावतीने तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले

तूर खरेदी संथगतीने : पाच दिवसांत ११६६ क्विंटल खरेदी सोनम कळंबे   नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भारतीय खाद्य महामंडळ (फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया - एफसीआय)च्यावतीने तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, या केंद्रावर शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाप्रमाणे शेतकऱ्यांकडून तुरीची खरेदी केली जात आहे. या केंद्राचा शुभारंभ २७ फेब्रुवारी रोजी करण्यात आला असला तरी केवळ पाच दिवस तुरीची खरेदी करण्यात आली. या पाच दिवसांत ७४ शेतकऱ्यांकडून केवळ ११६६.५० क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. केंद्रावरील तुरीची आवक आणि खरेदीची संथगती पाहता शेतकऱ्यांना होळी व धुलिवंदन केंद्रावरच साजरे करावे लागणार असल्याचे दिसून येते. दुसरीकडे, या प्रकारावरून शासनाची शेतकऱ्यांप्रती असलेली अनास्थाही स्पष्ट होते. नरखेड येथे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे नाईलाजास्तव एफसीआयने नरखेड बाजार समितीच्या आवारात तूर खरेदी केंद्र सुरू केले. केंद्रावरील तुरीची आवक आणि खरेदी न करण्याची मानसिकता विचारात घेता तूर खरेदीसाठी सोमवार, मंगळवार व बुधवार असे तीन दिवस निर्धारित करण्यात आले. एफसीआयच्या अधिकाऱ्यांच्या अडेल धोरणामुळे तूर खरेदीचा तिढा सोडविण्यासाठी सुरुवातीला तहसीलदार जयवंत पाटील व नंतर माजी मंत्री अनिल देशमुख यांनाही आग्रही भूमिका घेत मध्यस्थी करावी लागली. या केंद्रावर केवळ पाच दिवस तुरीची खरेदी करण्यात आली. त्यात शुक्रवारी (दि. ३) तीन शेतकऱ्यांकडील ४२.५० क्विंटल, सोमवारी (दि. ६) १० शेतकऱ्यांकडील २३२.६६ क्विंटल, मंगळवारी (दि. ७) १९ शेतकऱ्यांकडील ३०५ क्विंटल, बुधवारी (दि. ८) २२ शेतकऱ्यांकडील ३५०.१८ क्विंटल आणि गुरुवारी (दि. ९) २० शेतकऱ्यांकडील २३६.१६ क्विंटल तुरीचा समावेश आहे. यावर्षी तालुक्यात तुरीच्या उत्पादनात आमूलाग्र वाढ झाली आहे. त्यातच तुरीचे बाजारभाव पडले. कमी किमतीत का होईना व्यापारी तूर खरेदी करण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांनी तुरी विकायच्या कुणाला, असा प्रश्न निर्माण झाला. परिणामी, काटोल येथे नाफेडने तूर खरेदी केंद्र सुरू केले. या केंद्रावर सुरुवातीला शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून तुरीची खरेदी करण्यात आल्याने शेतकरी प्रतिनिधी आक्रमक झाले होते. त्यानंतर नरखेड येथे तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यासाठी शेतकऱ्यांना तीन दिवस आंदोलनही करावे लागले. या केंद्रावरील तुरीची आवक आणि खरेदी यातील तफावत पाहता शासनाची शेतकऱ्यांप्रतीची अनास्था स्पष्ट झाली आहे. पोती उघड्यावर नरखेड खरेदी केंद्रावर रोज किमान अडीच ते तीन हजार क्विंटल तुरीची आवक होत असून, केवळ ३०० क्विंटल तुरीची खरेदी केली जात आहे. परिणामी आजमितीस बाजार समितीच्या आवारात अंदाजे सात हजार क्विंटल तुरी मोजणीविना पडल्या आहेत. यातील काही पोती टिनाच्या शेडखाली ठेवण्यात आली असून, अंदाजे चार हजार क्विंटल तुरीची पोती उघड्यावर ठेवली आहे. वातावरणातील बदलामुळे अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाच्या सरी बरसल्यास किंवा गारपीट झाल्यास उघड्यावरील तुरीचे पर्यायाने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. या नुकसानीची जबाबदारी स्वीकारणार कोण, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.