शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

भर पावसात शेतकऱ्यांचे उपोषण

By admin | Updated: March 1, 2016 02:45 IST

संघ मुख्यालयासमोर आत्मदहन करण्यापूर्वीच शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊ न आदोलन उधळल्यानंतर वर्धा ...

पालकमंत्र्यांशी चर्चा :धनादेश मिळाल्यानंतरच माघारनागपूर : संघ मुख्यालयासमोर आत्मदहन करण्यापूर्वीच शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊ न आदोलन उधळल्यानंतर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रविवारी रात्रीपासून संविधान चौकात उपोषणाला सुरुवात केली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तोडगा न निघाल्याने सोमवारी भर पावसात आंदोलन सुरूच होते.२०१४-१५ च्या कापूस हंगामात सेलू (जि.वर्धा) तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी श्रीकृष्ण जिनिंग व प्रेसिंगचे संचालक सुनील टालाटुले यांना २० हजार क्विंटल कापूस विकला. मात्र टालाटुले यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले नाही. त्यांनी शेतकऱ्यांचे आठ कोटी हडपल्याचा आरोप आहे. या संदर्भात गुन्हा दाखल केला परंतु सेलू पोलिसांनी त्यांच्याविरोधात अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. टालाटुले यांचे सरसंघचालक आणि सरकारमधील बड्या नेत्यांशी जवळचे संबंध आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. प्रशासन तसेच सरकारक डे वारंवार मागणी करूनही टालाटुले यांच्याविरोधात कोणतीच कारवाई होत नसल्याने शेकडो शेतकरी भारतीय किसान खेतमजूर काँग्रेसच्या नेतृत्वात संविधान चौकात उपोषण सुरू केले आहे. यात भारतीय किसान खेतमजूर काँग्रेसचे प्रभारी अविनाश काकडे, किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे(वर्धा), रामू पाठक, मंगेश ढोणे, गोविंद पेठकर, प्रमोद तडस, प्रशांत बोरीकर, सुदाम पवार, विठ्ठल झाडे, बाबाराव ठाकरे आदींच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. कापसाच्या पैशाचे धनादेश मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. (प्रतिनिधी)