शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

शेतकऱ्यांचे शेत होणार हिरवेगार!

By admin | Updated: May 18, 2015 02:41 IST

सध्या कृषी विभागाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातर्गंत सिंचनाची विविध कामे सुरू आहेत.

नागपूर : सध्या कृषी विभागाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातर्गंत सिंचनाची विविध कामे सुरू आहेत. जुन्या नाल्यांचे खोलीकरण करणे, नवीन बंधारे बांधणे, पाणी अडविणे अशी विविध कामे केली जात आहेत. यातून भविष्यात शेतकऱ्यांचे शेत हिरवीगार दिसणार आहे. अशीच हिंगणा तालुक्यात झपाट्याने कामे सुरू आहेत. त्या कामांची स्वत: राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शनिवारी मुख्य सचिवांनी हिंगणा तालुक्यातील ऊखळी येथे भेट दिली. कृषी विभागाने या गावात सुमारे २० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या ९ सिमेंट बंधाऱ्यांची निवड करू न, जलयुक्त शिवार अभियानातर्गंत त्यांच्या खोलीकरणाची कामे केली आहेत. कृषी अधिकाऱ्यांच्या मते, मागील १९९४-९५ मध्ये हे सिमेंट बंधारे बांधण्यात आले होते. परंतु त्यात आता गाळ भरल्याने पाणी साठा होत नव्हता. या अभियानातर्गंत बंधाऱ्यातील तो गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आला. यामुळे बंधाऱ्याची खोली वाढली असून, गाळामुळे शेतकऱ्यांच्या शेतीची सुपिकताही वाढली आहे. बंधाऱ्याच्या खोलीकरणामुळे पावसाळ्यात किमान ४० टीसीएम पाणी जमिनीत मुरल्याने विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुख्य सचिवांनी कृषी विभागातर्फे करण्यात आलेल्या या कामांचे मुक्तकंठाने कौतूक करून, भविष्यात तालुक्यातील सर्व गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबवून सर्व गावे टॅँकर मुक्त करावे, असेही आवाहन केले. यावेळी क्षत्रिय यांच्यासह विभागीय आयुक्त अनूपकुमार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजीराव जोंधळे, विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू, उपविभागीय कृषी अधिकारी विजय निमजे, तहसिलदार राजू रणवीर, खंड विकास अधिकारी जुवारे, तालुका कृषी अधिकारी रत्नाकर येवले, मंडळ कृषी अधिकारी संजय भगत, कृषी पर्यवेक्षक शिंदे, कृषी सहाय्यक वंजारी, यांच्यासह सरपंच ममता बोंदाडे , उपसरपंच बाविस्कर, प्रगतिशील शेतकरी नितीन बंग उपस्थित होते. (प्रतिनिधी)