शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

शेतकरयांचे मृत्यू कीटकनाशकामुळे झालेच नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 20:20 IST

यवतमाळ जिल्ह्यात एकाही शेतकरयांचा मृत्यू कीटकनाशकामुळे झाला नाही, असा दावा नवी दिल्ली येथील क्रॉप केयर फेडरेशन आॅफ इंडियाने केला आहे.

ठळक मुद्देउत्पादकांचा दावा : हायकोर्टातील प्रकरणात मध्यस्थी अर्ज

आॅनलाईन लोकमतनागपूर : यवतमाळ जिल्ह्यात एकाही शेतकरयांचा मृत्यू कीटकनाशकामुळे झाला नाही, असा दावा नवी दिल्ली येथील क्रॉप केयर फेडरेशन आॅफ इंडियाने केला आहे. ही  संघटना कीटकनाशके उत्पादकांची आहे.यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका प्रलंबित असून त्यात स्वत:ला प्रतिवादी करून घेण्यासाठी संघटनेने अर्ज दाखल केला आहे. त्यात हा दावा करण्यात आला आहे. कीटकनाशके वापरामध्ये भारत जगात अकराव्या स्थानावर आहे. त्यावरून भारतात कीटकनाशकाचा अतिरिक्त उपयोग केला जात नसल्याचे स्पष्ट होते. बाजारात विकल्या जाणारया कीटकनाशकासोबत संबंधित कीटकनाशक कसे वापरायचे याची माहिती पुस्तिका दिली जाते. त्यामुळे कीटकनाशक उत्पादकांवर निष्काळजीपणाचा आरोप केला जाऊ शकत नाही. यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या शेतकरी मृत्यूस कीटकनाशक कारणीभूत असल्याचा एकही वैद्यकीय पुरावा अद्याप पुढे आलेला नाही. परिणामी शेतकरयांचे मृत्यू कीटकनाशकामुळे झाले , असे म्हणणे चुकीचे आहे. राज्यात कीटकनाशक कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचा दावाही निराधार आहे असे फेडरेशनने अर्जात म्हटले आहे.कापुस उत्पादनात यवतमाळ आघाडीवरराज्यामध्ये कापुस उत्पादनात यवतमाळ जिल्हा आघाडीवर आहे. राज्यात ४ मिलियन हेक्टर्समध्ये कापसाचे पिक घेतले जाते. त्यापैकी ०.५ मिलियन हेक्टर शेती एकट्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. जगातील कापुस उत्पादनात भारताचा वाटा २६ टक्के आहे. २००० ते २०१६ या काळात भारतातील कापसाचे उत्पादन २५० टक्क्यांनी वाढले आहे. जगात एकाही देशाला अशी प्रगती करता आलेली नाही  , अशी माहिती फेडरेशनच्या अर्जात देण्यात आली आहे.काय म्हटलेय जनहित याचिकेतयासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते जम्मू आनंद यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. शेतकºयांच्या मृत्यूंची न्यायिक आयोग किंवा विशेष तपास पथकाद्वारे सखोल चौकशी करण्यात यावी, दोषी अधिकारी व कंपन्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, मयत शेतकरयांच्या कुटुंबीयांना २० लाख तर, प्रभावित शेतकरयांना १० लाख रुपये भरपाई देण्यात यावी असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. ए. के. वाघमारे कामकाज पहात आहेत.