शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

शेतकरी संकटात, अधिकारी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:07 IST

रामटेक : पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले, पण तालुक्यात अद्यापही दमदार पावसाची नोंद नाही. केवळ एकदाच ६५ मिमी ...

रामटेक : पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले, पण तालुक्यात अद्यापही दमदार पावसाची नोंद नाही. केवळ एकदाच ६५ मिमी पाऊस झाला. तेव्हापासून पावसाने पाठ फिरविली. रात्री ओस पडत आहे. दिवसा ऊन पडणे सुरू आहे. दमट हवामानाने नागरिक त्रस्त आहेत. एकीकडे नैसर्गिक संकट आहे, तर दुसरीकडे वीजपुरवठा करायला वितरण विभागही असमर्थ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट उभे ठाकले आहे. तालुक्यात एकदाच दमदार पाऊस झाला. त्यामुळे धानाची रोवणी करायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली. रोवणीसाठी पाणी भरपूर लागते, पण सध्या पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे धानाच्या रोवणी काही ठिकाणी खोळंबल्या आहेत. ज्यांच्या रोवणी झाल्या आहेत, त्या जगवायचे कशा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक शेतकऱ्यांकडे विद्युत पंप आहे, पण तीन फेज लाइन बंद असल्याने पंप चालू शकत नाही. वितरण विभागाने तीन फेज लाइन द्यावी, आम्ही वीजबिल भरायला तयार आहोत, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. यास वीज वितरण विभागाचे उपअभियंता हतबलता दाखवित आहे. शेतकऱ्यांनी उपअभियंता रामटेक यांची भेट घेऊन निवेदन दिले, पण अधिकारी वितरण विभागाकडे डीपी दुरुस्त करण्यासाठी पैसे नाही. अगोदर बिल भरा, तरच काही करता येईल, असे सांगतात. शेतकऱ्यांचे कर्ज शासनाने माफ केले आहे. मग शेतकरी बिल का भरत नाही, असा सवाल अधिकारी करतात. शेतकऱ्यांनी मात्र बिल रीडिंगनुसार देण्यात येत नसल्याचा आरोप केला आहे. सध्या वितरण विभागाने सिंगल फेज सुरू ठेवला आहे. त्यामुळे सिंचन करणे शक्य नाही. खुमारी परिसरात डीपीतून सिंगल फेज लाईन सुरु आहे. धानाच्या रोवणी सुरु आहे. पण पावसाने पाठ फिरविल्याने रोवणी थांबविण्याचे संकट निर्माण झाले आहे.