शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे बजेट ‘गड’बडले!

By admin | Updated: March 1, 2016 02:34 IST

वित्तमंत्री अरुण जेटली यांचा अर्थसंकल्प ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलासा देणारा असला तरी दोन दिवसांपासून सुरु असलेल्या गारांच्या मारामुळे शेतकऱ्यांचे बजेट यंदा निश्चितच गडबडणार आहे.

गारपिटीचा तडाखा रबी पिके जमीनदोस्त गहू काळवंडणार नागपूर : वित्तमंत्री अरुण जेटली यांचा अर्थसंकल्प ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलासा देणारा असला तरी दोन दिवसांपासून सुरु असलेल्या गारांच्या मारामुळे शेतकऱ्यांचे बजेट यंदा निश्चितच गडबडणार आहे. जिल्ह्यातील काटोल, भिवापूर, उमरेड, नरखेड, कळमेश्वर, सावनेर, पारशिवनी, हिंगणा तालुक्यातील बहुतांश भागाला रविवारी मध्यरात्रीनंतर अवकाळी पावसाचा तडाखा बसला. बहुतांश गावांमध्ये गारपीट झाल्याने रबी पिकांसह भाजीपाल्याचे नुकसान झाले. सोमवारी दुपारच्या सुमारास पुन्हा जिल्ह्यात सर्वत्र गारपिटीचा तडाखा बसला. सोसाट्याचा वारा आणि लिंबू व आवळ्याच्या आकारातील गारपिटीमुळे रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे कपाशी, हरभरा व गव्हाला सर्वाधिक फटका बसला असून गहू काळवंडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातही वादळामुळे होर्डिंग्जची पडझड झाली. काटोल, भिवापूर, नरखेड, कुही, उमरेड, हिंगणा शहरासह परिसरात सोमवारी पहाटेच्या वादळासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर दुपारपर्यंत सर्वत्र ढगाळी वातावरण होते. दरम्यान, दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गाराही पडायला सुरुवात झाली. हा पाऊस अंदाजे अर्धा ते पाऊण तास सुरू होता. त्यामुळे शहरांसह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. काटोल तालुक्यातील रिधोरा, येनवा, डोंगरगाव, खानगाव, कारला, वाढोणा, गोन्ही, खुटांबा, लाडगाव, खंडाळा आदी गावांमध्ये गारपिटीचा प्रचंड फटका बसला. लिंबू व आवळ्याच्या आकाराच्या गारांमुळे गहू, हरभरा, संत्रा, मोसंबी व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कुही शहरासह तालुक्यातील साळवा, चापेगडी, मांढळ व इतर भागात जोरदार वादळासह अवकाळी पाऊस पडला. कळमेश्वर, सावनेर परिसरात दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास जोरदार वादळी पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा प्रकार एक तास सुरू होता. गुमगाव, धामणा, टाकळी भन्साळी, नांदागोमुख, रिधोरा परिसरात पावसासह गारपीट झाली. तसेच भिवापूर तालुक्यातील नांद, भगवानपूर, महालगाव, बेसूर परिसरात वादळी पावसासह गारा बरसल्या. कोंढाळी परिसरात सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे प्रवाशांसह इतर नागरिकांची तारांबळ उडाली होती. अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला आहे.(प्रतिनिधी)