शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

वन आणि वन्यजीव रक्षणात शेतकरी ठरला दुय्यम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:25 IST

नागपूर : वन आणि वन्यजीवांचे रक्षण करताना वन विभागाने अनेक योजना आखल्या. मात्र या योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करताना ...

नागपूर : वन आणि वन्यजीवांचे रक्षण करताना वन विभागाने अनेक योजना आखल्या. मात्र या योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करताना शेतकरी मात्र दुय्यम ठरला. परिणामत: मागील काळात शेतकऱ्यांवर बऱ्याच आपदा ओढावल्याचा अनुभव आहे. यामुळे वन विभागाने धोरण आखताना शेतकरी केंद्रबिंदू ठेवून योजनांची अंमलबजावणी व्हावी, अशी माफक अपेक्षा आता व्यक्त होत आहे.

राज्यात असलेल्या जंगलालगत मोठ्या प्रमाणावर शेती आहे. अनेक ठिकाणी तर अगदी जंगलामध्ये शेती आहे. अशा वेळी वन्यप्राण्यांकडून शेतीचे नुकसान होते. पीक फस्त केले जाते. मात्र वन विभागाकडून शेतीच्या संरक्षणासाठी म्हणावी, तशी तरतूद नाही. वन्य प्राण्यांकडून शेतीचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाईचे प्रावधान आहे.मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना करावा लागणारा पाठपुरावा व त्यानंतर पदरात पडणारी तुटपुंजी मदत नुकसान भरपाई करणारी नसल्याच्या शेतकऱ्यांची भावना आहे.

रानडुकर, रोही आदी प्राण्यांकडून शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होते.केवळ जंगलालगतच नव्हे, तर जंगलापासून लांब अंतरावरील शेतमालही हे प्राणी फस्त करतात. डुकरांना मारण्याची तरतूद वन विभागाने केली आहे. मात्र त्यासाठी कायदेशीर प्रक्रियाच अधिक आहे. त्यामुळे कायदेशीरपणे डुकरांना मारण्याऐवजी शेतकरी स्वत:हून त्यांची विल्हेवाट लावतात. परिणामत: बरेचदा शेतकरी गुन्हेगार ठरतात.

विदर्भात गायरानसाठी मोठ्या प्रमाणावर राखीव क्षेत्र आहे. त्यावर चारा निर्मितीची योजना वन आणि कृषी विभाग करू शकतो. मात्र शासकीय विभागांमध्ये समन्वय नसल्याने गायरान जमिनी पडीत आहेत. त्यावर अतिक्रमण वाढले असल्याने आता ही नवीनच समस्या उद्भवली आहे.

...

वाघांचे स्थलांतरण

जंगलांमध्ये वाघ, बिबटे या प्राण्यांची संख्या वाढल्यावर त्यांचे अन्य जंगलांमध्ये स्थलांतरण करण्याची योेजना वन विभागाकडून आखली जाते. वन्यजीवांचे पुनर्वसन करताना नव्या ठिकाणच्या गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना होणाऱ्या संभाव्य नुकसानीचा विचार होत नाही. परिणामत: गावांमध्ये वन्यजीव संघर्षाची प्रकरणे उद्भवतात.