शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

वन आणि वन्यजीव रक्षणात शेतकरी ठरला दुय्यम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:25 IST

नागपूर : वन आणि वन्यजीवांचे रक्षण करताना वन विभागाने अनेक योजना आखल्या. मात्र या योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करताना ...

नागपूर : वन आणि वन्यजीवांचे रक्षण करताना वन विभागाने अनेक योजना आखल्या. मात्र या योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करताना शेतकरी मात्र दुय्यम ठरला. परिणामत: मागील काळात शेतकऱ्यांवर बऱ्याच आपदा ओढावल्याचा अनुभव आहे. यामुळे वन विभागाने धोरण आखताना शेतकरी केंद्रबिंदू ठेवून योजनांची अंमलबजावणी व्हावी, अशी माफक अपेक्षा आता व्यक्त होत आहे.

राज्यात असलेल्या जंगलालगत मोठ्या प्रमाणावर शेती आहे. अनेक ठिकाणी तर अगदी जंगलामध्ये शेती आहे. अशा वेळी वन्यप्राण्यांकडून शेतीचे नुकसान होते. पीक फस्त केले जाते. मात्र वन विभागाकडून शेतीच्या संरक्षणासाठी म्हणावी, तशी तरतूद नाही. वन्य प्राण्यांकडून शेतीचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाईचे प्रावधान आहे.मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना करावा लागणारा पाठपुरावा व त्यानंतर पदरात पडणारी तुटपुंजी मदत नुकसान भरपाई करणारी नसल्याच्या शेतकऱ्यांची भावना आहे.

रानडुकर, रोही आदी प्राण्यांकडून शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होते.केवळ जंगलालगतच नव्हे, तर जंगलापासून लांब अंतरावरील शेतमालही हे प्राणी फस्त करतात. डुकरांना मारण्याची तरतूद वन विभागाने केली आहे. मात्र त्यासाठी कायदेशीर प्रक्रियाच अधिक आहे. त्यामुळे कायदेशीरपणे डुकरांना मारण्याऐवजी शेतकरी स्वत:हून त्यांची विल्हेवाट लावतात. परिणामत: बरेचदा शेतकरी गुन्हेगार ठरतात.

विदर्भात गायरानसाठी मोठ्या प्रमाणावर राखीव क्षेत्र आहे. त्यावर चारा निर्मितीची योजना वन आणि कृषी विभाग करू शकतो. मात्र शासकीय विभागांमध्ये समन्वय नसल्याने गायरान जमिनी पडीत आहेत. त्यावर अतिक्रमण वाढले असल्याने आता ही नवीनच समस्या उद्भवली आहे.

...

वाघांचे स्थलांतरण

जंगलांमध्ये वाघ, बिबटे या प्राण्यांची संख्या वाढल्यावर त्यांचे अन्य जंगलांमध्ये स्थलांतरण करण्याची योेजना वन विभागाकडून आखली जाते. वन्यजीवांचे पुनर्वसन करताना नव्या ठिकाणच्या गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना होणाऱ्या संभाव्य नुकसानीचा विचार होत नाही. परिणामत: गावांमध्ये वन्यजीव संघर्षाची प्रकरणे उद्भवतात.