शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो ‘अर्ज करा कर्ज घ्या’

By admin | Updated: June 6, 2015 02:16 IST

शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दरवर्षीच त्रास सहन करावा लागतो. परंतु यंदा हा त्रास होणार नाही. कारण खुद्द

नागपूर : शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दरवर्षीच त्रास सहन करावा लागतो. परंतु यंदा हा त्रास होणार नाही. कारण खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला असून प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून तालुकास्तरावर कर्ज सुविधा समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये कर्ज वितरणाशी संबधित सर्व घटक एकाच ठिकाणी उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे ‘अर्ज करा आणि कर्ज घ्या’, अशी सुविधा शेतकऱ्यांना प्राप्त होणार आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी स्वत: या योजनेविषयी शुक्रवारी पत्रपरिषदेत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: खरीप आढावा बैठक घेतली होती. तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज सुलभपणे मिळावे, असे निर्देश दिले होते. आता खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता पडेल. शेतकऱ्यांना सहजपणे कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर कर्ज सुविधा समिती स्थापन करण्यात आली आहे. तहसीलदार हे या समितीचे अध्यक्ष राहतील. तर तालुका कृषी अधिकारी, ब्लॉक लेवल बँकर्स कमिटीचे समन्वयक, सहायक निबंधक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निरीक्षक आणि राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी हे सदस्य राहतील. दर आठवड्यात सोमवार आणि शुक्रवार असे दोन दिवस दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळात या समितीची तालुकास्तरावरील तहसील कार्यालयात बैठक होईल. या बैठकीत ज्या शेतकऱ्यांना कर्ज हवे असेल त्यांनी अर्ज करावा. कर्ज वितरणाशी संबंधित सर्व घटक या समितीमध्ये असल्याने त्यांच्या अर्जावर लगेच निर्णय घेऊन त्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. जिल्हाधिकारी कुर्वे यांनी सांगितले की, शासनाने ८४० कोटी रुपये कर्ज वितरणाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ते आम्ही पूर्ण करूच परंतु कुठलाच गरजू शेतकरी कर्जापाून वंचित राहू नये. नवीन शेतकऱ्यांनाही कर्ज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कर्ज सुविधा समिती स्थापन केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)गेल्यावर्षीच्या थकीत कर्जदारांना विशेष सवलत ४गेल्यावर्षीची नैसर्गिक आपत्ती आणि पीक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने गेल्यावर्षी कर्ज घेणारे परंतु काही कारणास्तव कर्ज चुकते न करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदाच विशेष सवलत दिली आहे. या विशेष सवलती अंतर्गत गेल्यावर्षी कर्ज घेणारे थकीत कर्जदार शेतकरी सुद्धा यंदा कर्ज घेऊ शकतील. त्यांना थकीत कर्जाची रक्कम ही पाच वर्षात टप्प्याटप्प्याने फेडता येईल. परंतु ही सवलत केवळ गेल्यावर्षीच्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठीच आहे. अनेक वर्षांपासून कर्ज न फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ही सवलत मिळणार नाही, असेही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी स्पष्ट केले आहे.