शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीच्या शेतकºयांचा सिंचन विभागात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:09 IST

धरणातील पाणी गळतीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही नुकसान भरपाई तातडीने मिळावी,

ठळक मुद्देनुकसानभरपाईची मागणी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिदोरी आंदोलनाने वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धरणातील पाणी गळतीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही नुकसान भरपाई तातडीने मिळावी, या मागणीसाठी सोमवारी अमरावतीतील नुकसानग्रस्त शेतकºयांनी थेट नागपूर गाठले आणि विदर्भ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक सुर्वे यांच्या कॅबीनमध्येच ठिय्या मांडला. यावेळी या शेतकºयांनी सोबत आणलेली शिदोरी कार्यकारी संचालकांच्या कार्यालयातच उघडली आणि जेवणही उरकले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात या नुकसानग्रस्त शेतकºयांनी केलेल्या या शिदोरी आंदोलनाने अधिकाºयांसह सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तब्बल अडीच तास हे आंदोलन चालले. अखेर अधीक्षक अभियंता पवार यांनी आंदोलनकर्त्या शेतकºयांशी चर्चा करून लवकरच नुकसानभरपाईसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तेव्हा या शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले.मौजा सोनगाव, कळमगाव ता. चांदूर रेल्वे जि. अमरावती येथील मौजा सोनगाव शिवणी प्रकल्पाचे पाणी पाझरून शेतात साचल्याने तेथील १७ शेतकºयांच्या पिकांचे व संत्र्याचे प्रचंड नुकसान झाले. त्यांना १४ लाख रुपये नुकसानभरपाई मिळायची आहे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात या शेतकºयांनी गेल्या ३ एप्रिल रोजी अमरावती येथे बैलबंडी आंदोलन केले होते. त्यावेळी ऊर्ध्व वर्धा सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंता यांनी लवकरच निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले. परंतु चार महिने लोटूनही निधी मिळाला नाही. तेव्हा हे शेतकरी पुन्हा त्यांच्याकडे गेले, तेव्हा त्यांनी निधी नागपुरातील सिंचन कार्यालयात अडकून पडला असल्याचे सांगितले. अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ, नागपूर जिल्हाध्यक्ष दयाल राऊत यांच्या नेतृत्वात वाल्मिक लोखंडे व इतर शेतकºयांनी सोमवारी नागपुरातील सिंचन विभागात येऊन थेट कार्यकारी संचालकांच्या कार्यालयात ठिय्या दिला. कार्यकारी संचालक सुर्वे हे सध्या मुंबईला बैठकीसाठी गेले होते. त्यामुळे ते कार्यालयात हजर नव्हते. त्यामुळे शेतकºयांनी त्यांच्या कॅबीनमध्येच ठाण मांडले. येताना त्यांनी आपल्यासोबत आणलेली शिदोरी सोडली व जेवण केले. दरम्यान आमचा निधी कधीपर्यंत दिला जाईल, हे एखादा जबाबदार अधिकारी सांगत नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही, अशी भूमिका या शेतकºयांनी घेतली. यावेळी अधीक्षक अभियंता डॉ. पी.के. पवार यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे लेखी आश्वासनही दिले. यानंतर शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात अमित अढाऊ, दयाल राऊत, वाल्मिक लोखंडे, संकेत दुरुगकर, प्रशांत मोहोड, प्रवीण मोहोड, विलास आसोले, प्रशांत शिरभाते, दिनेश आमले आदी सहभागी होते.धरणाला तडे, चौकशी व्हावीसोनगाव शिवणी येथील धरण बांधून दोन वर्षे झाले. दोन वर्षातच धरणाला तडे गेले असून पाणी पाझरत आहेत. कंत्राटदारही पळून गेला आहे. या धरणाचे काम अतिशय निकृष्ट झाले असून याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ यांनी यावेळी केली.नियामक मंडळाची मंजुरी मिळताच निधीकालवा दुरुस्ती अंतर्गत २५ लाख रुपयापर्यंतचे अधिकार मंडळाला आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव शासनाला पाठविला असून मंजुरीही मिळालेली आहे. १४ लाख ९६ हजार रुपये नुकसानभरपाई निधी आहे. परंतु त्यासाठी नियामक मंडळाची मंजुरी आवश्यक असते. ही मंजुरी मिळताच हा निधी नुकसानग्रस्त शेतकºयांच्या स्वाधीन केला जाईल.- डॉ. पी.के. पवारअधीक्षक अभियंता, विदर्भ पाटबंधारे विभाग