शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

अमरावतीच्या शेतकºयांचा सिंचन विभागात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:09 IST

धरणातील पाणी गळतीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही नुकसान भरपाई तातडीने मिळावी,

ठळक मुद्देनुकसानभरपाईची मागणी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिदोरी आंदोलनाने वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धरणातील पाणी गळतीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही नुकसान भरपाई तातडीने मिळावी, या मागणीसाठी सोमवारी अमरावतीतील नुकसानग्रस्त शेतकºयांनी थेट नागपूर गाठले आणि विदर्भ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक सुर्वे यांच्या कॅबीनमध्येच ठिय्या मांडला. यावेळी या शेतकºयांनी सोबत आणलेली शिदोरी कार्यकारी संचालकांच्या कार्यालयातच उघडली आणि जेवणही उरकले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात या नुकसानग्रस्त शेतकºयांनी केलेल्या या शिदोरी आंदोलनाने अधिकाºयांसह सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तब्बल अडीच तास हे आंदोलन चालले. अखेर अधीक्षक अभियंता पवार यांनी आंदोलनकर्त्या शेतकºयांशी चर्चा करून लवकरच नुकसानभरपाईसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तेव्हा या शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले.मौजा सोनगाव, कळमगाव ता. चांदूर रेल्वे जि. अमरावती येथील मौजा सोनगाव शिवणी प्रकल्पाचे पाणी पाझरून शेतात साचल्याने तेथील १७ शेतकºयांच्या पिकांचे व संत्र्याचे प्रचंड नुकसान झाले. त्यांना १४ लाख रुपये नुकसानभरपाई मिळायची आहे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात या शेतकºयांनी गेल्या ३ एप्रिल रोजी अमरावती येथे बैलबंडी आंदोलन केले होते. त्यावेळी ऊर्ध्व वर्धा सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंता यांनी लवकरच निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले. परंतु चार महिने लोटूनही निधी मिळाला नाही. तेव्हा हे शेतकरी पुन्हा त्यांच्याकडे गेले, तेव्हा त्यांनी निधी नागपुरातील सिंचन कार्यालयात अडकून पडला असल्याचे सांगितले. अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ, नागपूर जिल्हाध्यक्ष दयाल राऊत यांच्या नेतृत्वात वाल्मिक लोखंडे व इतर शेतकºयांनी सोमवारी नागपुरातील सिंचन विभागात येऊन थेट कार्यकारी संचालकांच्या कार्यालयात ठिय्या दिला. कार्यकारी संचालक सुर्वे हे सध्या मुंबईला बैठकीसाठी गेले होते. त्यामुळे ते कार्यालयात हजर नव्हते. त्यामुळे शेतकºयांनी त्यांच्या कॅबीनमध्येच ठाण मांडले. येताना त्यांनी आपल्यासोबत आणलेली शिदोरी सोडली व जेवण केले. दरम्यान आमचा निधी कधीपर्यंत दिला जाईल, हे एखादा जबाबदार अधिकारी सांगत नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही, अशी भूमिका या शेतकºयांनी घेतली. यावेळी अधीक्षक अभियंता डॉ. पी.के. पवार यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे लेखी आश्वासनही दिले. यानंतर शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात अमित अढाऊ, दयाल राऊत, वाल्मिक लोखंडे, संकेत दुरुगकर, प्रशांत मोहोड, प्रवीण मोहोड, विलास आसोले, प्रशांत शिरभाते, दिनेश आमले आदी सहभागी होते.धरणाला तडे, चौकशी व्हावीसोनगाव शिवणी येथील धरण बांधून दोन वर्षे झाले. दोन वर्षातच धरणाला तडे गेले असून पाणी पाझरत आहेत. कंत्राटदारही पळून गेला आहे. या धरणाचे काम अतिशय निकृष्ट झाले असून याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ यांनी यावेळी केली.नियामक मंडळाची मंजुरी मिळताच निधीकालवा दुरुस्ती अंतर्गत २५ लाख रुपयापर्यंतचे अधिकार मंडळाला आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव शासनाला पाठविला असून मंजुरीही मिळालेली आहे. १४ लाख ९६ हजार रुपये नुकसानभरपाई निधी आहे. परंतु त्यासाठी नियामक मंडळाची मंजुरी आवश्यक असते. ही मंजुरी मिळताच हा निधी नुकसानग्रस्त शेतकºयांच्या स्वाधीन केला जाईल.- डॉ. पी.के. पवारअधीक्षक अभियंता, विदर्भ पाटबंधारे विभाग