शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

वीज काेसळून शेतकरी महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क केळवद : शेतात काम करीत असताना पावसाला सुरुवात हाेताच शेतकरी महिलेसह महिला मजुरांनी शेतातील झाेपडीत आश्रय ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

केळवद : शेतात काम करीत असताना पावसाला सुरुवात हाेताच शेतकरी महिलेसह महिला मजुरांनी शेतातील झाेपडीत आश्रय घेतला. त्यातच जाेरात कडाडलेली वीज थेट झाेपडीवर काेसळल्याने शेतकरी महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दाेन महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना केळवद (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रायबासा शिवारात शनिवारी (दि. ५) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.

अंजना जंगलू मरस्कोल्हे (६५) असे मृत तर गीता सुनील कुंभरे (३५) व मंजू दौलत मरकाम (४०, तिघीही रा. रायबासा, ता. सावनेर) अशी जखमी महिलांची नावे आहेत. गीता व मंजू अंजना मरस्काेल्हे हिच्या रायबासा शिवारातील शेतात कचरा वेचणीची कामे करीत हाेत्या. अंजनादेखील त्यांना मदत करीत हाेती. मध्येच पावसाला सुरुवात झाल्याने या तिघींनीही लगेच शेतातील झाडाखाली आश्रय घेतला. विजा जाेरात कडाडत असल्याने तसेच पावसाचा जाेर वाढल्याने या तिघीही घाबरल्या आणि त्यांनी लगेच शेतातील झाेपडीत आश्रय घेतला.

दरम्यान, जाेरात कडाडलेली वीज थेट झाेपडीवर काेसळली. त्यात झाेपडीतील तिघीही हाेरपळल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यातच अंजना मरस्काेल्हे या शेतकरी महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच सरपंच सोनू रावसाहब, सतीश राव व नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी दाेन्ही जखमी महिलांना उपचारासाठी सावनेर येथे पाठविण्याची व्यवस्था केली.

पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. केळवद प्राथमिक आराेग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. किशाेर गजभिये, तलाठी नीता पाटील यांच्या उपस्थितीत ठाणेदार दिलीप ठाकूर, देवराव पंचबुद्धे व रवींद्र चटप यांनी पंचनामा केला. या प्रकरणी केळवद पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला.

...

पाळीव कुत्र्याचाही मृत्यू

अंजना मरस्काेल्हे यांच्यासाेबत त्यांचा पाळीव कुत्राही शेतात हाेता. पाऊस सुरू झाल्याने कुत्रादेखील त्यांच्या मागे आधी झाडाखाली आणि नंतर झाेपडीत गेला. वीज काेसळल्याने अंजना यांच्यासाेबत त्यांचा कुत्राही हाेरपळला आणि त्याचा काही वेळात झाेपडीतच मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेल्या दाेन्ही महिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. दुसरीकडे, मृत व जखमींच्या कुटुंबीयांना शासनाने याेग्य आर्थिक मदत करावी, अशी मागणीही केली जात आहे.