शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

जिल्ह्यातील शेतकरी वाऱ्यावर

By admin | Updated: September 22, 2016 03:09 IST

शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात सरकारने ४ सर्व्हे केले. ६३ कोटींचा नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला.

दोन वर्षांपासून मदतीपासून वंचितच : अधिकाऱ्यांवर वचक राहिलेला नाहीनागपूर : शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात सरकारने ४ सर्व्हे केले. ६३ कोटींचा नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. परंतु दोन वर्षानंतरही एक रुपयांची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट असून, आर्थिक चणचणीत सापडल्याने गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यातील १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जिल्हा परिषदेचा कृषी विभाग शेतकऱ्यांबाबत गंभीर नाही. समाधानकारक उत्तरे देऊ शकत नाही. नुकसानभरपाई कधी मिळणार, शेतकऱ्यांपर्यंत योजना कधी पोहचणार, असा सवाल विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे व चंद्रशेखर चिखले यांनी सभागृहात उपस्थित केला. मंगळवारी झालेल्या जि.प. च्या सर्वसाधरण सभेत विरोधकांसह सत्तापक्षाच्या सदस्यांनी कृषी विभागाला चांगलेच धारेवर धरले. जि. प. तर्फे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. कृषी समिती शेती साहित्याची खरेदी करीत नाही. खरेदीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप शिवकुमार यादव यांनी केला. शेतकरी विम्याची कागदपत्रे तीन महिन्यानंतर सभेच्या एक दिवसापूर्वी पाठविली जातात, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही. या प्रकाराकडेही विरोधी सदस्यांनी लक्ष वेधले. नंदा नारनवरे म्हणाल्या, शेतकऱ्यांना ताडपत्री, शेतीचे पाईप, फवारणीसाठी औषधे देऊ शकत नाही. औषधींचे १० लाख रुपये कुठे वळविले असा सवाल त्यांनी केला. विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मदतीवरून सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे अध्यक्षांनी प्रलंबित निधी मिळण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविणार असल्याचे सभागृहात सांगितले. जि. प. ची कृषी समिती चार हजार रुपयांचा पाईप शेतकऱ्यांना ७०० रुपयांत देत आहे. बिले मात्र चार हजार रुपयांचीच लावली जात असून, यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. जिल्ह्यातील जवळपास दोन लाख शेतकऱ्यांना स्पिंकलर, ठिबक सिंचनचे अनुदान अद्याप मिळाले नाही. कृषी अधिकारी अध्यक्ष किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचेही ऐकत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला.(प्रतिनिधी)