शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

जिल्ह्यातील शेतकरी वाऱ्यावर

By admin | Updated: September 22, 2016 03:09 IST

शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात सरकारने ४ सर्व्हे केले. ६३ कोटींचा नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला.

दोन वर्षांपासून मदतीपासून वंचितच : अधिकाऱ्यांवर वचक राहिलेला नाहीनागपूर : शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात सरकारने ४ सर्व्हे केले. ६३ कोटींचा नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. परंतु दोन वर्षानंतरही एक रुपयांची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट असून, आर्थिक चणचणीत सापडल्याने गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यातील १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जिल्हा परिषदेचा कृषी विभाग शेतकऱ्यांबाबत गंभीर नाही. समाधानकारक उत्तरे देऊ शकत नाही. नुकसानभरपाई कधी मिळणार, शेतकऱ्यांपर्यंत योजना कधी पोहचणार, असा सवाल विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे व चंद्रशेखर चिखले यांनी सभागृहात उपस्थित केला. मंगळवारी झालेल्या जि.प. च्या सर्वसाधरण सभेत विरोधकांसह सत्तापक्षाच्या सदस्यांनी कृषी विभागाला चांगलेच धारेवर धरले. जि. प. तर्फे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. कृषी समिती शेती साहित्याची खरेदी करीत नाही. खरेदीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप शिवकुमार यादव यांनी केला. शेतकरी विम्याची कागदपत्रे तीन महिन्यानंतर सभेच्या एक दिवसापूर्वी पाठविली जातात, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही. या प्रकाराकडेही विरोधी सदस्यांनी लक्ष वेधले. नंदा नारनवरे म्हणाल्या, शेतकऱ्यांना ताडपत्री, शेतीचे पाईप, फवारणीसाठी औषधे देऊ शकत नाही. औषधींचे १० लाख रुपये कुठे वळविले असा सवाल त्यांनी केला. विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मदतीवरून सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे अध्यक्षांनी प्रलंबित निधी मिळण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविणार असल्याचे सभागृहात सांगितले. जि. प. ची कृषी समिती चार हजार रुपयांचा पाईप शेतकऱ्यांना ७०० रुपयांत देत आहे. बिले मात्र चार हजार रुपयांचीच लावली जात असून, यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. जिल्ह्यातील जवळपास दोन लाख शेतकऱ्यांना स्पिंकलर, ठिबक सिंचनचे अनुदान अद्याप मिळाले नाही. कृषी अधिकारी अध्यक्ष किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचेही ऐकत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला.(प्रतिनिधी)