शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
3
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
4
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
5
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
6
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
7
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
8
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
9
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
10
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
11
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
12
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
13
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
14
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
15
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
16
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
17
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
18
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
19
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
20
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत

जिल्ह्यातील शेतकरी वाऱ्यावर

By admin | Updated: September 22, 2016 03:09 IST

शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात सरकारने ४ सर्व्हे केले. ६३ कोटींचा नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला.

दोन वर्षांपासून मदतीपासून वंचितच : अधिकाऱ्यांवर वचक राहिलेला नाहीनागपूर : शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात सरकारने ४ सर्व्हे केले. ६३ कोटींचा नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. परंतु दोन वर्षानंतरही एक रुपयांची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट असून, आर्थिक चणचणीत सापडल्याने गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यातील १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जिल्हा परिषदेचा कृषी विभाग शेतकऱ्यांबाबत गंभीर नाही. समाधानकारक उत्तरे देऊ शकत नाही. नुकसानभरपाई कधी मिळणार, शेतकऱ्यांपर्यंत योजना कधी पोहचणार, असा सवाल विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे व चंद्रशेखर चिखले यांनी सभागृहात उपस्थित केला. मंगळवारी झालेल्या जि.प. च्या सर्वसाधरण सभेत विरोधकांसह सत्तापक्षाच्या सदस्यांनी कृषी विभागाला चांगलेच धारेवर धरले. जि. प. तर्फे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. कृषी समिती शेती साहित्याची खरेदी करीत नाही. खरेदीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप शिवकुमार यादव यांनी केला. शेतकरी विम्याची कागदपत्रे तीन महिन्यानंतर सभेच्या एक दिवसापूर्वी पाठविली जातात, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही. या प्रकाराकडेही विरोधी सदस्यांनी लक्ष वेधले. नंदा नारनवरे म्हणाल्या, शेतकऱ्यांना ताडपत्री, शेतीचे पाईप, फवारणीसाठी औषधे देऊ शकत नाही. औषधींचे १० लाख रुपये कुठे वळविले असा सवाल त्यांनी केला. विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मदतीवरून सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे अध्यक्षांनी प्रलंबित निधी मिळण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविणार असल्याचे सभागृहात सांगितले. जि. प. ची कृषी समिती चार हजार रुपयांचा पाईप शेतकऱ्यांना ७०० रुपयांत देत आहे. बिले मात्र चार हजार रुपयांचीच लावली जात असून, यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. जिल्ह्यातील जवळपास दोन लाख शेतकऱ्यांना स्पिंकलर, ठिबक सिंचनचे अनुदान अद्याप मिळाले नाही. कृषी अधिकारी अध्यक्ष किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचेही ऐकत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला.(प्रतिनिधी)