शहरं
Join us  
Trending Stories
1
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
2
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
3
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
4
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
5
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
6
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
7
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
8
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
9
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
12
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
13
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
14
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
15
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
16
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
17
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
18
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
19
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
20
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं

शेतकरी समुपदेशन केंद्र उभारणार- रविप्रकाश दाणी

By admin | Updated: February 5, 2016 02:08 IST

शेतकरी समुपदेशन केंद्रासाठी कुलगूरू रविप्रकाश दाणी शासनाला प्रस्ताव पाठवणार.

अकोला: सातत्याने होणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्या बघता, त्यांना अप्रिय निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी योग्य समुपदेशनाची गरज असून, अकोल्याला असे शेतकरी समुपदेशन केंद्र (अँग्रो कौन्सेलिंग सेंटर) मिळावे, यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी शुक्रवारी दिली. शेतकरी आत्महत्येचे लोण संपूर्ण राज्यात पसरले आहे. त्यांना या टोकाच्या विचारांपासून परावृत्त करण्यासाठी विविध स्तरांवर उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्यांचे सूक्ष्म समुपदेशन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. नैराश्य आलेल्यांपैकी काही शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. त्यांच्या नैराश्येची पातळी शेतकर्‍यांच्या पत्नीच्या लक्षात आलेली असते. अशा शेतकर्‍यांचे समुपदेशन केंद्रातील तज्ज्ञाकरवी केल्यास त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणे निश्‍चितच सोपे होईल. त्यासाठी शेतकरी समुपदेशन केंद्र आवश्यक आहे. दीक्षांत समारंभाला येत असलेल्या मंत्रिमहोदयांकडे ही मागणी करणार असल्याचे डॉ. दाणी यांनी दीक्षांत समारंभाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. सेंद्रिय उत्पादनांना परदेशात चांगली बाजारपेठ आहे; परंतु या उत्पादनांची गुणवत्ता तपासून परदेशात पाठवण्यासाठी योग्य परीक्षणाची गरज असते. हे परीक्षण करण्यासाठी या कृषी विद्यापीठाला सर्टिफिकेशन एजंसी द्यावी, अशी मागणी करणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. येथे परीक्षण झाले तर विदर्भातील सेंद्रिय पदार्थ, उत्पादनाला वाव मिळेल. पारंपरिक पद्धतीने माती परीक्षणास वेळ लागत असल्याने झटपट माती परीक्षण करू न देणारे लेझर तंत्रज्ञान उपलब्ध आहे. यासाठीचा करार अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठाशी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केल्याचेही ते म्हणाले. कृषी विद्यापीठाच्या एके-५ व एके-७ या देशी कपाशीच्या जाती कोरडवाहू क्षेत्रात चांगले उत्पादन देत असल्याने, त्यांच्या बियाणे निर्मितीवर भर देण्यात येत असून, बुलडाणा जिल्ह्यातील आप्पासाहेब गुंजकर यांनी या देशी कापसाच्या बियाणे निर्मितीला सुरुवात केली आहे. विद्यापीठाला कायमस्वरू पी पाण्याचा स्रोत निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या गुडधी विभागांतर्गत येणारा नाला व वणी रंभापूर येथील मुख्य बिजोत्पादन केंद्रांतर्गत जलयुक्तशिवार कार्यक्रमाची कामे केली जाणार असल्याचे ते म्हणाले.