शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

शेतकरी आंदोलनाची धग नागपुरातही

By admin | Updated: June 3, 2017 01:41 IST

संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी संपावर आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने : भाजीपाला फेकला, दूध ओतले, राम नेवले, अरुण केदार, नंदा परातेंसह अनेक कार्यकर्ते ताब्यात लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी संपावर आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त भाग घेत आपला भाजीपाला व दूध रस्त्यावर टाकून शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदवित आहेत. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आज शुक्रवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत भाजीपाला व दूध रस्त्यावर टाकून शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य शासनाच्या विरोधी नारेबाजी करण्यात आली. संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, अशी मागणी लावून धरली. यानंतर राम नेवले यांनी आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीहल्ला होत असल्याच्या घटनेचा निषेध नोंदवित हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला. या आंदोलनात राम नेवले, अरुण केदार, अ‍ॅड. नंदा पराते आदींसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते. अन् पोलिसांची उडाली तारांबळ शेतकऱ्यांच्या आंदोलनाची पोलिसांनी चांगलीच धसकी घेतली आहे. नागपुरात या आंदोलनाची फार तीव्रता नसली तरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन असल्याने पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारे मुख्य गेट बंद करण्यात आले होते. दुपारी २ वाजता कार्यकर्ते एकत्र आले. निदर्शने सुरू असतानाच एक कार्यकर्ता भिंतीवरून उडी घेऊन दुधाच्या कॅनसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने पळत सुटला, पोलीसही त्याच्या मागे धावले व त्याला पकडले. पोलिसांनी पकडल्यावरही त्याने कॅनमधील दूध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओतले आणि शासनाचा निषेध व्यक्त केला. भाजीपाला उचलून पोलिसांनीच केला रस्ता स्वच्छ आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर भाजीपाला, कांदे, मिरची, कोबी आदी टाकून आपला निषेध व्यक्त केला. आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी आपल्यासोबत नेले. त्यानंतर भाजीपाला तसाच रस्त्यावर पडून होता. तेव्हा बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनीच पोत्यामध्ये हा कचरा भरला व रस्ता स्वच्छ केला. आम आदमी पार्टी शेतकऱ्यांच्या पाठिशी भारतातील शेती आणि शेतकरी सरकारी धोरणांमुळे गंभीर संकटात आले आहेत. गेली अनेक वर्षे त्यावर नुसतीच चर्चा होत आहे. कर्जमाफी हा जरी कायमस्वरूपी उपाय नसला तरी आत्यहत्या त्वरित थांबवायच्या असतील तर कर्जमाफी शिवाय पर्याय नाही, हे सरकारने समजून घ्यावे, असे आम आदमी पार्टीचे देवेंद्र वानखेडे यांनी स्पष्ट करीत शेतकऱ्यांच्या संपाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे शेतमालाला हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जपुरवठा करावा, शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने अखंडित वीजपुरवठा करावा, शेतीसाठी हक्काचे पाणी उपलब्ध व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली. आजची शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवून या प्रश्नावर चर्चा करून तोडगा काढावा. जर सरकार सकारात्मक दिसत नसेल तर कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे शेतमालाला भाव देण्यासाठी ठराव आणून सेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पार्टीने एकत्रित येऊन ठराव पारित करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.