शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
2
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
3
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
4
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
5
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
6
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
7
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
8
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
9
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
10
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
11
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
12
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
13
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
14
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
15
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
16
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
17
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
18
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
19
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
20
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...

कुटुंब न्यायालयाला वैवाहिक दर्जा ठरविण्याचा अधिकार

By admin | Updated: January 23, 2017 02:18 IST

कुटुंब न्यायालयाला कोणत्याही व्यक्तीचा वैवाहिक दर्जा ठरविण्याचा अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा : ‘लिव्ह इन’ प्रकरणात खुलासा राकेश घानोडे   नागपूर कुटुंब न्यायालयाला कोणत्याही व्यक्तीचा वैवाहिक दर्जा ठरविण्याचा अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. कुटुंब न्यायालय कायदा-१९८४ मधील कलम ७(१)(स्पष्टीकरण ‘बी’) यात ही तरतूद असल्याचा खुलासा निर्णयात करण्यात आला आहे. २१ मार्च २०१२ रोजी नागपूर कुटुंब न्यायालयाने त्यांना व्यक्तीचा वैवाहिक दर्जा ठरविण्याचा अधिकार नसल्याचे कारण नमूद करून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधील प्राध्यापकाची याचिका खारीज केली होती. या निर्णयाविरुद्ध प्राध्यापकाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व विनय देशपांडे यांनी हे अपील अंशत: मंजूर करून वरीलप्रमाणे निर्णय दिला. तसेच, कुटुंब न्यायालयाला संबंधित प्रकरण गुणवत्तेवर निकाली काढण्यास सांगितले. प्रकरणातील वादग्रस्त जोडपे शार्दुल व कविता नागपूर येथील रहिवासी आहेत. शार्दुल ही कविताच्या आयुष्यात आलेली दुसरी व्यक्ती होय. कविताच्या लेखी बयानानुसार, ती पहिल्या पतीपासून १९९४ मध्ये विभक्त झाली आहे. परंतु, त्यांचा घटस्फोट झालेला नाही. शार्दुल व कविता एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर विवाह न करताच सोबत रहायला लागले. दरम्यान, शार्दुलपासून कविताला मुलगी झाली. काही महिन्यांनी त्यांच्यात खटके उडायला लागले. शार्दुल कवितापासून दूर राहायला लागला. शार्दुलला पती मानणाऱ्या कविताला हे खपले नाही. त्यामुळे ती शार्दुलच्या घरात बळजबरीने राहायला लागली. परिणामी शार्दुलने कुटुंब न्यायालयात याचिका दाखल करून कविता ही त्याची पत्नी नसल्याचे घोषित करण्याची विनंती केली होती तर, कविताने ती शार्दुलची अधिकृत पत्नी असल्याचे घोषित करण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे कुटुंब न्यायालयाला हे प्रकरण आता गुणवत्तेवर निकाली काढावे लागणार आहे.(प्रतिनिधी) दावे-प्रतिदावे शार्दुल व कविताने आपापली बाजू योग्य ठरविण्यासाठी विविध दावे केले आहेत. कविताचा पहिला पती जिवंत आहे. त्यामुळे ती कायद्यानुसार दुसऱ्या व्यक्तीची अधिकृत पत्नी होऊ शकत नाही असे शार्दुलचे म्हणणे आहे. कवितानुसार, ती पहिल्या पतीपासून १९९४ मध्ये विभक्त झाली आहे. तेव्हापासून तिचा पतीशी एकदाही संपर्क आला नाही. परिणामी कायद्यानुसार पहिले लग्न रद्द ठरते असा दावा तिने केला आहे.