शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

कुटुंब न्यायालयाला वैवाहिक दर्जा ठरविण्याचा अधिकार

By admin | Updated: January 23, 2017 02:18 IST

कुटुंब न्यायालयाला कोणत्याही व्यक्तीचा वैवाहिक दर्जा ठरविण्याचा अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा : ‘लिव्ह इन’ प्रकरणात खुलासा राकेश घानोडे   नागपूर कुटुंब न्यायालयाला कोणत्याही व्यक्तीचा वैवाहिक दर्जा ठरविण्याचा अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. कुटुंब न्यायालय कायदा-१९८४ मधील कलम ७(१)(स्पष्टीकरण ‘बी’) यात ही तरतूद असल्याचा खुलासा निर्णयात करण्यात आला आहे. २१ मार्च २०१२ रोजी नागपूर कुटुंब न्यायालयाने त्यांना व्यक्तीचा वैवाहिक दर्जा ठरविण्याचा अधिकार नसल्याचे कारण नमूद करून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधील प्राध्यापकाची याचिका खारीज केली होती. या निर्णयाविरुद्ध प्राध्यापकाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व विनय देशपांडे यांनी हे अपील अंशत: मंजूर करून वरीलप्रमाणे निर्णय दिला. तसेच, कुटुंब न्यायालयाला संबंधित प्रकरण गुणवत्तेवर निकाली काढण्यास सांगितले. प्रकरणातील वादग्रस्त जोडपे शार्दुल व कविता नागपूर येथील रहिवासी आहेत. शार्दुल ही कविताच्या आयुष्यात आलेली दुसरी व्यक्ती होय. कविताच्या लेखी बयानानुसार, ती पहिल्या पतीपासून १९९४ मध्ये विभक्त झाली आहे. परंतु, त्यांचा घटस्फोट झालेला नाही. शार्दुल व कविता एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर विवाह न करताच सोबत रहायला लागले. दरम्यान, शार्दुलपासून कविताला मुलगी झाली. काही महिन्यांनी त्यांच्यात खटके उडायला लागले. शार्दुल कवितापासून दूर राहायला लागला. शार्दुलला पती मानणाऱ्या कविताला हे खपले नाही. त्यामुळे ती शार्दुलच्या घरात बळजबरीने राहायला लागली. परिणामी शार्दुलने कुटुंब न्यायालयात याचिका दाखल करून कविता ही त्याची पत्नी नसल्याचे घोषित करण्याची विनंती केली होती तर, कविताने ती शार्दुलची अधिकृत पत्नी असल्याचे घोषित करण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे कुटुंब न्यायालयाला हे प्रकरण आता गुणवत्तेवर निकाली काढावे लागणार आहे.(प्रतिनिधी) दावे-प्रतिदावे शार्दुल व कविताने आपापली बाजू योग्य ठरविण्यासाठी विविध दावे केले आहेत. कविताचा पहिला पती जिवंत आहे. त्यामुळे ती कायद्यानुसार दुसऱ्या व्यक्तीची अधिकृत पत्नी होऊ शकत नाही असे शार्दुलचे म्हणणे आहे. कवितानुसार, ती पहिल्या पतीपासून १९९४ मध्ये विभक्त झाली आहे. तेव्हापासून तिचा पतीशी एकदाही संपर्क आला नाही. परिणामी कायद्यानुसार पहिले लग्न रद्द ठरते असा दावा तिने केला आहे.