शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

आग कायद्याच्या वैधतेवर उत्तर सादर करण्यास मनपा अपयशी

By admin | Updated: July 3, 2015 03:15 IST

विदर्भ टॅक्सपेयर्स असोसिएशनचे सचिव तेजिंदरसिंग रेणू यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून

हायकोर्ट : १५ जुलैपर्यंत अतिरिक्त वेळ मंजूरनागपूर : विदर्भ टॅक्सपेयर्स असोसिएशनचे सचिव तेजिंदरसिंग रेणू यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून ‘महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवनसंरक्षक उपाययोजना कायदा-२००६’च्या घटनात्मक वैधतेला आव्हान दिले आहे. याप्रकरणात महानगरपालिका न्यायालयाच्या निर्देशान्वये निर्धारित वेळेत उत्तर सादर करण्यात अपयशी ठरली आहे. यामुळे न्यायालयाने याचिकेवर १५ जुलै रोजी पुढील सुनावणी निश्चित केली असून यादरम्यान उत्तर सादर न केल्यास आणखी वेळ देण्यात येणार नाही असे स्पष्ट केले आहे. ही याचिका २०१३ मध्ये दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवनसंरक्षक उपाययोजना कायदा राज्यघटनेतील अनुच्छेद १४ चे उल्लंघन करणारा आहे. या कायद्याची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येत आहे. २५ मीटरवर उंचीच्या इमारतींवर मनपाकडून ‘हाय राईज बिल्डिंग फंड’ वसुल करण्यात येत आहे. यासंदर्भात कायद्यात काहीच तरतूद नाही. तसेच, कायद्यात तरतूद असलेल्या आग शुल्कात चारपट वृद्धी करण्यात आली आहे. या वृद्धीला शासनाने मंजुरी दिलेली नसून वृद्धीचा निर्णय घेताना कायदेशीर प्रक्रियेचेही पालन करण्यात आलेले नाही असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. कायदा मागे घेण्यात यावा, याचिका प्रलंबित असताना कायद्याच्या अंमलबजावणीवर स्थगिती देण्यात यावी, कायद्यातील विविध अवैध तरतुदी काढून नवीन तरतुदी टाकण्यात याव्या, महानगरपालिकेतर्फे वसूल करण्यात येत असलेले वाढीव आग शुल्क अवैध घोषित करण्यात यावे अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. दीपेन जग्यासी यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)