शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अपयश म्हणजे अंत नाही

By admin | Updated: June 1, 2017 02:17 IST

मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. हा निकाल तसा बारावीचा होता, आयुष्याचा नव्हता.

हे आहेत आयुष्याचे शिल्पकार : प्रतिकूलतेवर मात करून घडविला इतिहास लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. हा निकाल तसा बारावीचा होता, आयुष्याचा नव्हता. पण, मनासारखे यश न मिळाल्याने अंतर्बाह्य खचलेल्या वणीच्या कोमल चचाणे हिने गळफास घेतला, औरंगाबादच्या मनीषा गायकवाड हिने स्वत:ला रेल्वेसमोर झोकून दिले, नवी मुंबईतील पृथ्वी व्हावळ यानेही फास गळ्यात अडकवला. केवळ विद्यार्थीच नाहीत तर एका ठिकाणी पालकाने मुलाला अपेक्षित गुण मिळाले नाहीत म्हणून स्वत:लाच संपवून टाकले. किती टोकाचे नैराश्य? इतकी अशक्त झालीत आमची मने? परीक्षेतील अपयश हे आयुष्याच्या अंताचे कारण होऊ शकते का? पण, पालकांच्या तथाकथित प्रतिष्ठेपोटी निर्माण झालेले प्रचंड अपेक्षांचे ओझे मुलांना पेलवत नाही आणि ते अशा आत्मघाताकडे वळतात. प्रतिकूलतेचे असे प्रसंग राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, व्यावसायिक, प्रसिद्ध कलावंत, अशा सर्वांनीच पाहिले. परंतु ध्येयाप्रति प्रामाणिक निष्ठा आणि स्वत:वरचा आत्मविश्वास या बळावर यांनी खेचून आणला यशाचा मंगलकलश. सारांश... कुठलेही अपयश म्हणजे आयुष्याचा अंत नसतो, हे विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी लोकमतने पुढाकार घेतला असून आज आयकॉन ठरलेल्यांनी अपयशातूनच कसा यशाचा मार्ग शोधला त्याचीच ही काही प्रेरणादायी उदाहरणे... इंजिनिअरिंग की वकिली अशा द्वंद्वात मी सापडलो होतो. वकील व्हायची माझी इच्छा नव्हती. पण, वडिलांनी मला समजावले आणि शेवटी मी एल.एल.बी.ला प्रवेश घेतला. सुरुवातीला वाटायचे की आपण चुकीचे तर करत नाही ना? पण, इंजिनिअरिंग किंवा आयएएस झाल्यानंतर मिळाले नसते तो आनंद आज मला न्यायदानाच्या क्षेत्रात मिळत आहे. आज मला माझे करिअर घडविल्याचा अभिमान वाटतो. द्वंद्वांचे असे प्रसंग आयुष्यात येतच असतात. शेवटी आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. - न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालय. मुलाला इंजिनिअर बनवू शकत नाही याचे दु:ख आईवडिलांच्या चेहऱ्यावर दिसत होते. शेवटी पैशाअभावी प्रवेश घेऊ शकलो नाही. बीएस्सीला प्रवेश घेतला. पण मी नैराश्याच्या गर्तेत बुडालो होतो. तणावात मी बीएस्सी सेकंड इयर सोडले. गावात किराणा दुकान सुरू केले. दूध विकू लागलो. तेथे मन रमत नव्हते. शेवटी आॅटो चालवला.सोबतीला सामाजिक काम होते. याच सामाजिक आंदोलनातून राजकारणात आलो. नैराश्यावर मात करून मी माझ्या आयुष्याची नवी वाट निर्माण केली. - चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री, नागपूर आयआरएससाठी निवडल्या गेलो. पण, ते माझे ध्येयच नव्हते. पुन्हा नव्याने परीक्षा दिली आणि तिसऱ्या प्रयत्नात आयएएससाठी सिलेक्ट झालो. जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण केले. दहावीला ८०.१४ टक्के गुण पडले. मेरिट आलो नाही म्हणून निराश झालो नाही. आणखी अभ्यास केला. बारावीला ८८.५० टक्के गुण मिळाले. यूपीएससीची तयारी सुरुच होती. पहिल्या प्रयत्नात खूप कमी फरकाने संधी हुकली. वाईट वाटले परंतु निराश झालो नाही.आणखी जिद्दीने अभ्यास केला. सचिन कुर्वे , जिल्हाधिकारी, नागपूर