शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

अपयश म्हणजे अंत नाही

By admin | Updated: June 1, 2017 02:17 IST

मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. हा निकाल तसा बारावीचा होता, आयुष्याचा नव्हता.

हे आहेत आयुष्याचे शिल्पकार : प्रतिकूलतेवर मात करून घडविला इतिहास लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. हा निकाल तसा बारावीचा होता, आयुष्याचा नव्हता. पण, मनासारखे यश न मिळाल्याने अंतर्बाह्य खचलेल्या वणीच्या कोमल चचाणे हिने गळफास घेतला, औरंगाबादच्या मनीषा गायकवाड हिने स्वत:ला रेल्वेसमोर झोकून दिले, नवी मुंबईतील पृथ्वी व्हावळ यानेही फास गळ्यात अडकवला. केवळ विद्यार्थीच नाहीत तर एका ठिकाणी पालकाने मुलाला अपेक्षित गुण मिळाले नाहीत म्हणून स्वत:लाच संपवून टाकले. किती टोकाचे नैराश्य? इतकी अशक्त झालीत आमची मने? परीक्षेतील अपयश हे आयुष्याच्या अंताचे कारण होऊ शकते का? पण, पालकांच्या तथाकथित प्रतिष्ठेपोटी निर्माण झालेले प्रचंड अपेक्षांचे ओझे मुलांना पेलवत नाही आणि ते अशा आत्मघाताकडे वळतात. प्रतिकूलतेचे असे प्रसंग राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, व्यावसायिक, प्रसिद्ध कलावंत, अशा सर्वांनीच पाहिले. परंतु ध्येयाप्रति प्रामाणिक निष्ठा आणि स्वत:वरचा आत्मविश्वास या बळावर यांनी खेचून आणला यशाचा मंगलकलश. सारांश... कुठलेही अपयश म्हणजे आयुष्याचा अंत नसतो, हे विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी लोकमतने पुढाकार घेतला असून आज आयकॉन ठरलेल्यांनी अपयशातूनच कसा यशाचा मार्ग शोधला त्याचीच ही काही प्रेरणादायी उदाहरणे... इंजिनिअरिंग की वकिली अशा द्वंद्वात मी सापडलो होतो. वकील व्हायची माझी इच्छा नव्हती. पण, वडिलांनी मला समजावले आणि शेवटी मी एल.एल.बी.ला प्रवेश घेतला. सुरुवातीला वाटायचे की आपण चुकीचे तर करत नाही ना? पण, इंजिनिअरिंग किंवा आयएएस झाल्यानंतर मिळाले नसते तो आनंद आज मला न्यायदानाच्या क्षेत्रात मिळत आहे. आज मला माझे करिअर घडविल्याचा अभिमान वाटतो. द्वंद्वांचे असे प्रसंग आयुष्यात येतच असतात. शेवटी आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. - न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालय. मुलाला इंजिनिअर बनवू शकत नाही याचे दु:ख आईवडिलांच्या चेहऱ्यावर दिसत होते. शेवटी पैशाअभावी प्रवेश घेऊ शकलो नाही. बीएस्सीला प्रवेश घेतला. पण मी नैराश्याच्या गर्तेत बुडालो होतो. तणावात मी बीएस्सी सेकंड इयर सोडले. गावात किराणा दुकान सुरू केले. दूध विकू लागलो. तेथे मन रमत नव्हते. शेवटी आॅटो चालवला.सोबतीला सामाजिक काम होते. याच सामाजिक आंदोलनातून राजकारणात आलो. नैराश्यावर मात करून मी माझ्या आयुष्याची नवी वाट निर्माण केली. - चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री, नागपूर आयआरएससाठी निवडल्या गेलो. पण, ते माझे ध्येयच नव्हते. पुन्हा नव्याने परीक्षा दिली आणि तिसऱ्या प्रयत्नात आयएएससाठी सिलेक्ट झालो. जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण केले. दहावीला ८०.१४ टक्के गुण पडले. मेरिट आलो नाही म्हणून निराश झालो नाही. आणखी अभ्यास केला. बारावीला ८८.५० टक्के गुण मिळाले. यूपीएससीची तयारी सुरुच होती. पहिल्या प्रयत्नात खूप कमी फरकाने संधी हुकली. वाईट वाटले परंतु निराश झालो नाही.आणखी जिद्दीने अभ्यास केला. सचिन कुर्वे , जिल्हाधिकारी, नागपूर