शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

फरार न होणे निर्दोषत्वाचा पुरावा नाही

By admin | Updated: October 17, 2014 01:02 IST

गुन्हा घडल्यानंतर एखादा आरोपी फरार झाला नसेल, तर तो निर्दोष आहे किंवा त्याचा गुन्ह्यात सहभाग नव्हता हे सिद्ध होत नाही असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका अपीलावरील

हायकोर्टाचा निष्कर्ष : जन्मठेपविरुद्धचे अपील फेटाळलेराकेश घानोडे - नागपूर गुन्हा घडल्यानंतर एखादा आरोपी फरार झाला नसेल, तर तो निर्दोष आहे किंवा त्याचा गुन्ह्यात सहभाग नव्हता हे सिद्ध होत नाही असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका अपीलावरील निर्णयात नोंदविला आहे. एकसमान परिस्थितीत वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळी प्रतिक्रिया असते असेही न्यायालयाने म्हटले आहे.यवतमाळ जिल्ह्यातील हत्याप्रकरणात तीनपैकी दोन आरोपी घटनेनंतर फरार झाले होते, तर एक आरोपी गावातच हजर राहिला होता. यावरून त्या आरोपीचे बेगुन्हेगारीत्व स्पष्ट होत असल्याचा युक्तिवाद संबंधित वकिलाने (आरोपीच्या) केला होता. या मुद्यावर न्यायालयाने वरीलप्रमाणे खुलासा केला. नारायण रायसिंग चव्हाण (५६) असे आरोपीचे नाव असून तो वाई हातोला येथील रहिवासी आहे. नारायण, त्याची दोन मुले रमेश व गजानन यांनी २ जुलै २००९ रोजी श्यामराव चव्हाणचा काठ्यांनी बेदम मारून खून केला होता. यानंतर रमेश व गजानन फरार झाले, तर नारायण गावातच हजर राहिला होता. श्यामराव हा आरोपी नारायणचा सख्खा भाऊ होता. घटनेच्या दिवशी श्यामरावने नारायणच्या कुत्र्याला धक्का दिला होता. या कारणावरून आरोपींनी श्यामरावची हत्या केली. आरोपींनी श्यामरावची मुले मोहिनी व सूरज यांनाही मध्ये पडल्यामुळे मारहाण केली होती. यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी फरार आरोपींना अटक करण्यात अपयश आल्यामुळे तपास पूर्ण झाल्यानंतर एकट्या नारायणविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यवतमाळ सत्र न्यायालयाने १४ डिसेंबर २०११ रोजी आरोपीला भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेप व १००० रुपये दंड, कलम ४५० (गुन्हा करण्याच्या उद्देशाने घरात प्रवेश) अंतर्गत पाच वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड, तर कलम ३२४ (घातक शस्त्राने जखमी करणे) अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी सरकारी पक्षाने संशयाशिवाय गुन्हा सिद्ध केल्याचे मत नोंदवून आरोपीचे अपील फेटाळून लावले व सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. (प्रतिनिधी)