शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

सलमानच्या शिक्षेत प्रत्यक्षदर्शींची साक्ष ठरली महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:10 IST

दोन काळविटांची शिकार केल्याप्रकरणात सलमान खानला जी शिक्षा झाली आहे, त्यात परिस्थितीजन्य पुराव्यांचे मोठे योगदान आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे प्रत्यक्षदर्शींची साक्ष होती व त्यांनी एकट्या सलमानलाच शिकार करताना पाहिले होते. या साक्षीच्या आधारावरच सलमान दोषी ठरला असेल, असे मत या प्रकरणाचे तत्कालीन वनअधिकारी ललित बोरा यांनी व्यक्त केले. सध्या खासगी कंपनीत कार्यरत असलेले ललित बोरा नागपुरात आले असता, त्यांनी या प्रकरणाबाबत पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या.

ठळक मुद्देतत्कालीन तपास अधिकारी ललित बोरा : परिस्थितीजन्य पुरावे केले होते गोळा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दोन काळविटांची शिकार केल्याप्रकरणात सलमान खानला जी शिक्षा झाली आहे, त्यात परिस्थितीजन्य पुराव्यांचे मोठे योगदान आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे प्रत्यक्षदर्शींची साक्ष होती व त्यांनी एकट्या सलमानलाच शिकार करताना पाहिले होते. या साक्षीच्या आधारावरच सलमान दोषी ठरला असेल, असे मत या प्रकरणाचे तत्कालीन वनअधिकारी ललित बोरा यांनी व्यक्त केले. सध्या खासगी कंपनीत कार्यरत असलेले ललित बोरा नागपुरात आले असता, त्यांनी या प्रकरणाबाबत पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या.काळवीट शिकारप्रकरणी पुरावे गोळा करण्यात त्यावेळच्या तपास चमूची मौलिक भूमिका होती. आम्ही प्रत्यक्षदर्शींची साक्ष नोंदविली होती. शिवाय शिकारीसाठी वापरण्यात आलेल्या गाडीचा ड्रायव्हर, त्याचा मालक यांची साक्षदेखील घेतली होती; सोबतच इतर परिस्थितीजन्य पुरावेदेखील गोळा करण्यात आले होते. या प्रकरणात रायफल, रिव्हॉल्व्हर, एअरगनदेखील जप्त करण्यात आले होते. या सर्व पुराव्यांच्या आधारावर न्यायालयात प्रकरण उभे झाले होते. आम्ही तपास करून तो न्यायालयात सादर केला होता. त्यानंतर सरकारी पक्षानेदेखील सक्षमपणे युक्तिवाद केला. सलमान खान व इतर अभिनेत्यांवर दोषारोप होते. परंतु प्रत्यक्षदर्शींनी केवळ सलमानलाच शिकार करताना पाहिले होते. इतरांनी केवळ त्याला उकसविले होते, असे ललित बोरा यांनी सांगितले.बिष्णोई समाज पर्यावरणप्रेमीकाळवीट शिकारीचे प्रकरण लावून धरण्यात बिष्णोई समाजाची मोठी भूमिका होती. याबाबत ललित बोरा यांना विचारणा केली असता हा समाज काळवीटसोबत भावनात्मक व सामाजिकदृष्ट्या जुळला असल्याचे त्यांनी सांगितले. जर बिष्णोई समाजाची परंपरा व इतिहास पाहिला तर ते २९ आदर्शांचे पालन करतात. यात झाडे न तोडणे तसेच जनावरांची हत्या न करणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. एखाद्या बछड्या काळविटाची आई मृत्यूमुखी पडली तर चक्क महिलांनी त्या बछड्याला स्तनपान केल्याचीदेखील उदाहरणे आहेत, असेदेखील त्यांनी सांगितले.

टॅग्स :Salman Khanसलमान खानCourtन्यायालय