शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वाघांच्या कृत्रिम स्थलांतरणासाठी करावा लागणार व्यापक विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 23:41 IST

Artificial migration, tigers, Nagpur News ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील वाढलेल्या वाघांच्या कृत्रिम स्थलांतरणावरून सध्या वनविभागात हालचाली सुरू आहेत. मात्र या संदर्भात घाई गडबडीत निर्णय न होता अभ्यासपूर्वक आणि व्यापक निर्णय व्हावा, अशी अपेक्षा या पार्श्वभूमीवर व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देयापूर्वीही झाले प्रयोग : अभ्यासासाठी समितीला वेळ अपुरा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील वाढलेल्या वाघांच्या कृत्रिम स्थलांतरणावरून सध्या वनविभागात हालचाली सुरू आहेत. मात्र या संदर्भात घाई गडबडीत निर्णय न होता अभ्यासपूर्वक आणि व्यापक निर्णय व्हावा, अशी अपेक्षा या पार्श्वभूमीवर व्यक्त होत आहे.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून वनमंत्र्यांनी वाघांच्यास्थलांतरणासंदर्भात अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट स्थापन केला आहे. डिसेंबरअखेर त्याचा अहवाल मागविण्यात आला आहे. राज्यात वाघांसदर्भात अनेक विषय अद्यापही मार्गी लागलेले नाहीत. वाघांच्या स्थलांतरणाच्या अभ्यासासाठी समितीला हा अडीच महिन्याचा काळ अपुरा पडणार आहे. यामुळे आतापासूनच या विषयावरून क्रिया-प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनसोबतच बफर झोनमध्येही वाघांची संख्या वाढली आहे. ही संख्या आता २५० च्या वर असल्याचे सांगण्यात येत आहे. वाघांच्या वाढत्या संख्येमुळे अधिवास कमी पडायला लागल्याने येथील वाघ नव्या अधिवासाच्या शोधात आहेत. या काळात वाढलेल्या वन्यजीव संघर्षांच्या घटनांमुळे येथील वाघांचे स्थानांतरण करण्याची मागणी व्हायला लागली.प्रत्यक्षात वाघांचे कृत्रिम स्थलांंतरण ही निसर्गनियमाविरूद्धची प्रक्रिया आहे. त्यामळे अनेकांकडून यासंदर्भात आतापासूनच नाराजीचा सूर उमटायला लागला आहे. हे कृत्रिम स्थलांतरण निसर्गनियमासोबत सुसंगत कसे ठरू शकते, असा मुद्दा आता उपस्थित होत आहे. वाघांचा भ्रमणमार्ग मोठा असल्याने ते हजार किलोमीटरच्या वर फिरतात. मात्र अधिवास निवडताना पसंतीचा निवडतात. स्थलांतरणामध्ये वाघांची स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्याची मानसिकता कशी तपासणार, असा मुद्दा आता पुढे येत आहे. येथील वाघांना अन्य क्षेत्रामध्ये स्थलांतरित केल्यावर तेथील समस्या वाढण्याची शक्यता आहे. या वाघांना महाराष्ट्रातच स्थलांतरित करणार की अन्य राज्यांचे जंगल निवडणार यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.वाघांच्या स्थलांतरणाचा हा प्रयोग नवा नसून यापूर्वीही असे प्रयोग झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात बिबटांचे स्थलांतरण करण्याचा प्रयोग झाला. मात्र तो यशस्वी ठरला नाही. मध्य प्रदेशात आणि राजस्थानातील सारिस्कामध्येही असा प्रयोग झाला. मात्र त्याला यात यश आले नाही. आता ताडोबातील वाघांच्या बाबतीही असा प्रयोग होण्याची शक्यता असल्याने वनविभागाने यापूर्वीचे प्रयत्न तपासावे, अशी अपेक्षा व्याघ्रप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :TigerवाघMigrationस्थलांतरण