शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कार्यविस्तारासाठी बोलीभाषेच्या संवर्धनावर संघाचा राहणार भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 14:08 IST

देशातील सर्वच भागांमध्ये कार्यविस्तार करण्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भर असून यासाठी आता विविध प्रांतांमधील बोली-भाषेचीदेखील मदत घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देअ.भा.प्रतिनिधी सभेत प्रस्तावभाषेच्या माध्यमातून होणार संघविस्तारदेशातील ९५ टक्के जिल्ह्यांत संघकार्य यावेळी डॉ.कृष्णगोपाल यांनी देशातील ९५ टक्के जिल्ह्यांमध्ये संघकार्य पोहोचल्याचे सांगितले. नागालँड, मिझोरम व काश्मीरचा काही भाग सोडला तर सगळीकडे संघाचे काम सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील सर्वच भागांमध्ये कार्यविस्तार करण्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भर असून यासाठी आता विविध प्रांतांमधील बोली-भाषेचीदेखील मदत घेण्यात येणार आहे. लुप्त होत चाललेल्या बोली भाषांच्या संवर्धनासाठी संघ पुढाकार घेणार असून यासंदर्भात देशपातळीवर उपक्रम राबविण्यात येणार आहे. शुक्रवारपासून नागपुरातील रेशीमबाग स्मृतिमंदीर परिसरात संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात होणार झाली. या सभेत यासंदर्भातील प्रस्तावावर मंथन होणार आहे.सभा सुरु होण्याअगोदर संघाचे सहसरकार्यवाह डॉ.कृष्णगोपाल यांनी पत्रपरिषदेत सभेबाबत माहिती दिली. यंदा सभेत केवळ एकच प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. गेल्या ३ वर्षांपासून संघ सामाजिक समरसतेवर कार्य करत आहे. त्याहून पुढे जात आता बोली-भाषा संवर्धनावर काम करण्यात येणार आहे. देशात वेगवेगळ््या बोलीभाषा प्रचलित आहेत. आदिवासी, दुर्गम भागातील तर अनेक बोली लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. स्थानिकांकडूनदेखील या भाषांचा उपयोग कमी प्रमाणात होत आहे. परंतु या बोली व भाषांमध्ये आपल्या देशातील मोठी परंपरा व संस्कृती सामावलेली आहे. जर या भाषा टिकल्या तरच परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत प्रभावी पद्धतीने पोहोचेल. त्यामुळे या प्रस्तावावर सभेत चर्चा होणार आहे. हा प्रस्ताव संमत झाल्यानंतर स्वयंसेवक समाजात जाऊन बोलीभाषेच्या संवर्ध़नासाठी कार्य करतील, असे डॉ.कृष्णगोपाल यांनी सांगितले. यावेळी मंचावर अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य व अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख नरेंद्र कुमार ठाकूर उपस्थित होते.प्रतिनिधी सभेत २५ महिलासंघाकडून महिलांना स्थान देण्यात येत नाही, अशी टीका कॉंग्रेसकडून करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत महिलादेखील उपस्थित आहेत. या सभेत संघ परिवारातील ३५ संघटनांचे १ हजार ५३८ प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यात २४ महिलांचादेखील समावेश आहे. सभेदरम्यान विविघ संघटनांचे प्रतिनिधी त्यांच्या कामाचा लेखाजोगा संक्षिप्तपणे मांडणार आहेत.वर्षभरात संघशाखांत १८०० ने वाढमार्च २०१८ मध्ये संघाच्या देशभरात ३७, १९० स्थानांवर ५८ हजार ९६७ शाखा आहेत. मार्च २०१७ मध्ये हीच संख्या ५७ हजार १६५ इतकी होती. गेल्या वर्षभरात संघशाखांमध्ये १ हजार ८०२ ने वाढ झाली आहे. याशिवाय देशात १६ हजार ४०५ ठिकाणी संघाचे साप्ताहिक मिलन व ७ हजार ९७९ ठिकाणी संघ मंडळी चालतात.नाशिक शेतकऱ्यांचा मोर्चा हा राजकीय मुद्दायावेळी डॉ.कृष्णगोपाल यांना नाशिकच्या शेतकऱ्यांनी मुंबई मंत्रालयावर काढलेल्या मोर्चासंदर्भात विचारणा करण्यात आली. नाशिक येथील शेतकऱ्यांचा मोर्चा हा राजकीय मुद्दा आहे. परंतु शेतकरी समृद्ध झाले पाहिजेत व विचारांनी मजबूत झाले पाहिजेत, ही संघाची भूमिका आहे. त्यादृष्टीने कार्यदेखील सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ