शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

अर्धवट जवाहर विहिरींना मुदतवाढ द्या

By admin | Updated: November 11, 2014 00:59 IST

शेतकऱ्यांना सिंचनाचे साधन उपलब्ध व्हावे, या हेतूने २००७ ते २००९ या कालावधीत राज्यात जवाहर विहिरींचा धडक कार्यक्र म राबविण्यात आला. यातील अर्धवट २२४ विहिरींची कामे महात्मा गांधी

नागपूर : शेतकऱ्यांना सिंचनाचे साधन उपलब्ध व्हावे, या हेतूने २००७ ते २००९ या कालावधीत राज्यात जवाहर विहिरींचा धडक कार्यक्र म राबविण्यात आला. यातील अर्धवट २२४ विहिरींची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) माध्यमातून पूर्ण करण्याला ३१ जुलै २०१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु त्यानंतरही जिल्ह्यात १५७ विहिरींची कामे अपूर्ण आहेत. या विहिरींची कामे पूर्ण करण्याला मार्च २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी जिल्हा परिषदेने राज्य शासनाकडे केली आहे. जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत या आशयाचा ठराव घेण्यात आला होता. त्यानुसार जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती अध्यक्ष निशा सावरकर यांनी सोमवारी दिली. जवाहर विहिरींसाठी शासनाकडून एक लाखाचे अनुदान मिळत होते. परंतु मजुरीचे दर व साहित्याच्या किमती वाढल्याने या रकमेत विहिरीचे खोदकाम शक्य नाही. दुसरीकडे याच कामासाठी मनरेगातून तीन लाखांचे अनुदान दिले जाते. ही बाब विचारात घेता अर्धवट विहिरी पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना प्रत्येकी १.५० लाखांचा निधी शासनाने उपलब्ध करावा, अशी मागणी प्रस्तावातून केली आहे. २००७ ते २००९ या कालावधीत जिल्ह्यातील ३७५३ जवाहर विहिरींना शासनाने मंजुरी दिली होती. यातील १४८० विहिरींची कामे २०१३ पर्यंत पूर्ण करण्यात आली तर २२७३ विहिरी अपूर्ण होत्या. यातील ३५० विहिरी २०१२-१३ या वर्षात मनरेगातून पूर्ण करण्यात आल्या. उर्वरित विहिरींची अर्धवट कामे पूर्ण करण्याला जुलै २०१४ पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतरही १५७ विहिरींची कामे अपूर्ण आहेत. या विहिरींच्या कामाला पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी केल्याची माहिती सावरकर यांनी दिली. (प्रतिनिधी)