शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिकतेसोबतच मानवी स्पर्श जपा

By admin | Updated: February 23, 2017 02:02 IST

संघ लोककल्याण समितीच्या नावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव आहे. रक्तपेढीचे काम तांत्रिक असले तरी त्याची गुणवत्ता वाढत राहिली पाहिजे.

मोहन भागवत यांचे प्रतिपादन : डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या नवीन वास्तूचे लोकार्पण नागपूर : संघ लोककल्याण समितीच्या नावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव आहे. रक्तपेढीचे काम तांत्रिक असले तरी त्याची गुणवत्ता वाढत राहिली पाहिजे. तांत्रिकबाजू जपताना त्याला मानवी स्पर्श झाला पाहिजे. त्यात आत्मीयता असली पाहिजे. ती जपली पाहिजे. ही संघाची कार्यशैली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोककल्याण समितीद्वारा संचालित डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या नवीन वास्तूचे लोकार्पण बुधवारी डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. यानिमित्त रामनगर मैदानात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोककल्याण समितीचे सचिव दत्ता टेकाडे, डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता, सचिव अशोक पत्की उपस्थित होते. डॉ. भागवत म्हणाले, सुरुवातीला अत्यंत लहान स्वरुपात संघाचे कार्य सुरू झाले. हळूहळू ते देशव्यापी झाले. आज या कार्याचा वटवृक्ष झाला आहे. सर्व समाजात चैतन्याचे झरे वाहावे यासाठी हे कार्य उभे करण्यात आले आहे. मैत्री, करुणा याचा साज घेऊन कार्य वाढवून घेण्याचा स्वयंसेवकाचा प्रयत्न असतो. यातून संघ प्रगट होत असतो. कार्यकर्त्यांनी स्वत:चे रक्त आटवून ही रक्तपेढी उभी केली आहे. या रक्तपेढीचा व लोककल्याण समितीच्या वाढत्या आवाक्यामुळेच नवीन वास्तूत हे स्थानांतरण झाले आहे. परिश्रमाच्या आधारे एक वैभव उभे राहते. आनंदाचा भरामध्ये ते विसरुन जायला नको. जे ब्रीद हाती घेतले आहे, ते तडीस नेले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. अशोक पत्की म्हणाले, गेल्या २४ वर्षात डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे कार्य आता समाजातील सर्व स्तरापर्यंत, तळागळापर्यंत पोहचले आहे. या क्षेत्रातील एक मानदंड म्हणून प्रस्थापित झाले आहे. आतापर्यंत लाखो रक्तपिशव्याचे रक्तसंकलन करून त्यापेक्षा कितीतरी जास्त रुग्णांना रक्त व रक्तघटकाचे वितरण केले आहे. गरीब, श्रीमंत, जाती, पंथ, पक्ष याकडे न बघता केवळ तो रुग्ण आहे याच विचारातून या रक्तपेढीचे कार्य सुरू आहे. मध्यभारतातील एक अत्यंत सुरक्षित व अत्याधुनिक रक्तपेढी म्हणून डॉ. हेडगेवार रक्तपेढी प्रसिद्ध आहे. आता ‘नॅट’मुळे रक्तपेढीवरील विश्वास द्विगुणित झाला आहे. नुकतेच २०१६ या वर्षात उत्कृष्ट काम केल्याबद्दल राज्यसरकारतर्फे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची उत्कृष्ट रक्तपेढी म्हणून बहुमान प्राप्त झाला आहे, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक डॉ. दिलीप गुप्ता यांनी केले. दरम्यान डॉ. हेडगेवार रक्तपेढीची ‘स्थलांतर स्मरणिका’चे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. रक्तपेढीच्या नव्या वास्तूसाठी ज्यांनी मदत केली त्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन मंजुषा कानडे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला ज्येष्ठ संघ विचारक मा. गो. वैद्य, प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. विलास डांगरे, खा. डॉ. विकास महात्मे, माझी खा. दत्ता मेघे, आ. सुधाकर देशमुख, आ. नागो गाणार, आ. परिणय फुके, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, डॉ. विनयकुमार गोवर्धन, डॉ. अशोक अरबट, डॉ. विरल कामदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.(प्रतिनिधी)