शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

अजनी यार्डात पेट्रोलच्या वॅगनमध्ये स्फोट

By admin | Updated: September 26, 2015 02:57 IST

मंडवादेह ते वडोदरा डिव्हिजनकडे जाणाऱ्या पेट्रोलच्या एका रिकाम्या वॅगनमध्ये गॅस जमा झाल्यामुळे

मोठी घटना टळली : रेल्वेकडे नाही स्वत:चा अग्निशमन विभागनागपूर : मंडवादेह ते वडोदरा डिव्हिजनकडे जाणाऱ्या पेट्रोलच्या एका रिकाम्या वॅगनमध्ये गॅस जमा झाल्यामुळे ५८ टन क्षमतेच्या वॅगनचे २०० किलोचे झाकण उडून भयानक स्फोट झाला. ही घटना अजनी रेल्वेस्थानकाच्या सी कॅबिनजवळ सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. वॅगनमध्ये पेट्रोल नसल्यामुळे फार मोठी घटना टळली, अन्यथा अजनी परिसर जळून खाक झाला असता. अजनी रेल्वेस्थानकाच्या सी कॅबिनजवळून सकाळी १०.३० वाजता मंडवादेह येथून २५ वॅगन घेऊन आलेली गाडी वडोदरा डिव्हिजनकडे जात होती. दरम्यान या गाडीतील वॅगनमध्ये थोडेफार पेट्रोल असल्यामुळे इंजिनपासून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ५८ टन क्षमतेच्या एका वॅगनमध्ये उन्हामुळे गॅस तयार झाला. अजनीचा इंग्रजकालीन पूल १०० फूट अंतरावर असताना या वॅगनचे २०० किलोचे झाकण जोरदार स्फोट होऊन १०० फूट वर फेकले गेले. यामुळे जोरदार आवाज होऊन घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. परंतु वॅगन पेट्रोलने भरलेले नसल्यामुळे मोठी हानी टळली. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अपघातग्रस्त वॅगन बाजूला काढून ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना केली. अजनी परिसरात पेट्रोलने भरलेल्या गाडीला आग लागल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. (प्रतिनिधी)१९९६ साली विभागाचे विलिनीकरणभारतीय रेल्वेत इंग्रजांच्या काळापासून आगींवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वतंत्र अग्निशमन विभाग होता. हा विभाग सुरक्षा विभागांतर्गत कार्यरत होता. सुरक्षा आयुक्त दर्जाचा अधिकारी या विभागाचा प्रमुख होता. या विभागाचे कामकाजही स्वतंत्र असायचे. आगीची सूचना मिळताच या विभागाची गाडी पाण्याच्या बंबासह घटनास्थळी पोहोचायची. मात्र, १९९६ साली या अग्निशमन विभागाचे रेल्वे सुरक्षा दलात विलिनीकरण करण्यात आले. तेव्हापासून रेल्वेत स्वतंत्र अग्निशमन विभागच नाही. देशात सर्वाधिक प्रवासी रेल्वेच्या प्रवासाला पसंती देतात.नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज ५० ते ६० हजार प्रवासी ये-जा करतात. एखाद्या प्रसंगी मोठी आग लागल्यास पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता उरते. धावत्या रेल्वेगाडीतही आगीवर नियंत्रण मिळविण्याची कुठलीच यंत्रणा कार्यरत नाही. त्यामुळे आग लागल्यास नजीकच्या अग्निशमन विभागावर अवलंबून राहण्याची पाळी रेल्वेवर येते. एखाद्या वेळी मदत मिळण्यास उशीर झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण होते.