शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

अजनी यार्डात पेट्रोलच्या वॅगनमध्ये स्फोट

By admin | Updated: September 26, 2015 02:57 IST

मंडवादेह ते वडोदरा डिव्हिजनकडे जाणाऱ्या पेट्रोलच्या एका रिकाम्या वॅगनमध्ये गॅस जमा झाल्यामुळे

मोठी घटना टळली : रेल्वेकडे नाही स्वत:चा अग्निशमन विभागनागपूर : मंडवादेह ते वडोदरा डिव्हिजनकडे जाणाऱ्या पेट्रोलच्या एका रिकाम्या वॅगनमध्ये गॅस जमा झाल्यामुळे ५८ टन क्षमतेच्या वॅगनचे २०० किलोचे झाकण उडून भयानक स्फोट झाला. ही घटना अजनी रेल्वेस्थानकाच्या सी कॅबिनजवळ सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. वॅगनमध्ये पेट्रोल नसल्यामुळे फार मोठी घटना टळली, अन्यथा अजनी परिसर जळून खाक झाला असता. अजनी रेल्वेस्थानकाच्या सी कॅबिनजवळून सकाळी १०.३० वाजता मंडवादेह येथून २५ वॅगन घेऊन आलेली गाडी वडोदरा डिव्हिजनकडे जात होती. दरम्यान या गाडीतील वॅगनमध्ये थोडेफार पेट्रोल असल्यामुळे इंजिनपासून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ५८ टन क्षमतेच्या एका वॅगनमध्ये उन्हामुळे गॅस तयार झाला. अजनीचा इंग्रजकालीन पूल १०० फूट अंतरावर असताना या वॅगनचे २०० किलोचे झाकण जोरदार स्फोट होऊन १०० फूट वर फेकले गेले. यामुळे जोरदार आवाज होऊन घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. परंतु वॅगन पेट्रोलने भरलेले नसल्यामुळे मोठी हानी टळली. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अपघातग्रस्त वॅगन बाजूला काढून ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना केली. अजनी परिसरात पेट्रोलने भरलेल्या गाडीला आग लागल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. (प्रतिनिधी)१९९६ साली विभागाचे विलिनीकरणभारतीय रेल्वेत इंग्रजांच्या काळापासून आगींवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वतंत्र अग्निशमन विभाग होता. हा विभाग सुरक्षा विभागांतर्गत कार्यरत होता. सुरक्षा आयुक्त दर्जाचा अधिकारी या विभागाचा प्रमुख होता. या विभागाचे कामकाजही स्वतंत्र असायचे. आगीची सूचना मिळताच या विभागाची गाडी पाण्याच्या बंबासह घटनास्थळी पोहोचायची. मात्र, १९९६ साली या अग्निशमन विभागाचे रेल्वे सुरक्षा दलात विलिनीकरण करण्यात आले. तेव्हापासून रेल्वेत स्वतंत्र अग्निशमन विभागच नाही. देशात सर्वाधिक प्रवासी रेल्वेच्या प्रवासाला पसंती देतात.नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज ५० ते ६० हजार प्रवासी ये-जा करतात. एखाद्या प्रसंगी मोठी आग लागल्यास पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता उरते. धावत्या रेल्वेगाडीतही आगीवर नियंत्रण मिळविण्याची कुठलीच यंत्रणा कार्यरत नाही. त्यामुळे आग लागल्यास नजीकच्या अग्निशमन विभागावर अवलंबून राहण्याची पाळी रेल्वेवर येते. एखाद्या वेळी मदत मिळण्यास उशीर झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण होते.