शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

अनुभवींच्या ज्ञानाचा उपयोग जंगल संरक्षणासाठी व्हावा

By admin | Updated: November 17, 2014 00:55 IST

गेली ४० वर्षे कुतूहलापोटी जंगलांचा अभ्यास केला. या अभ्यासातून अनेक गूढ वाटणाऱ्या बाबी समोर आल्या. यातूनच काही निष्कर्षही अभ्यासाअंती मांडले आणि हे निष्कर्ष सातत्याने तपासून सिद्ध केले.

नागपूर : गेली ४० वर्षे कुतूहलापोटी जंगलांचा अभ्यास केला. या अभ्यासातून अनेक गूढ वाटणाऱ्या बाबी समोर आल्या. यातूनच काही निष्कर्षही अभ्यासाअंती मांडले आणि हे निष्कर्ष सातत्याने तपासून सिद्ध केले. गेल्या ४० वर्षांच्या अनुभवातून अधिकाराने एक सांगावेसे वाटते, मानवी आयुष्यासाठी आणि पर्यावरणाच्या समृद्धतेसाठी जंगलांचे संरक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. पण औद्योगिकरणाच्या आणि विकासाच्या नावाखाली जंगले संपत चालली आहे. जंगलांचे संरक्षण करण्यासाठी जंगलांचा अभ्यास आणि अनुभव असणाऱ्या तज्ज्ञांच्या ज्ञानाचा उपयोग शासनाने केला पाहिजे. यासाठी आपण मदत करायला तयार आहोत, असे आवाहन ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ आणि अरण्यवाचक मारुती चितमपल्ली यांनी केले. स्वरसाधना व सरकारी आणि गैरसरकारी स्वयंसेवी संस्थांच्या वतीने श्रीमंत पूर्णचंद्र बुटी सभागृहात रविवारपासून त्रिदिवसीय ‘आपली वसुंधरा’ या पर्यावरण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे़ या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी स्वागताध्यक्ष महापौर प्रवीण दटके, अध्यक्ष डॉ़ पिनाक दंदे, स्वरसाधनेचे कार्याध्यक्ष आ़ अनिल सोले, अध्यक्ष श्याम देशपांडे, महाराष्ट्राचे प्रधान वनसंरक्षक अनिलकुमार सक्सेना, मार्डीकर, राष्ट्रीय मृदा, सर्वेक्षण व भूमी उपाययोजनेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ़ त्रिलोक हजारे, प्रदर्शनाचे संयोजक प्रा़ विजय घुगे व चैतन्य मोहाडीकर उपस्थित होते़ मारुती चितमपल्ली म्हणाले, लोकसंख्येचे प्रमाण वाढते आहे. त्याच प्रमाणात जंगलांचे प्रमाणही वाढणे गरजेचे आहे. लोकसंख्या वाढते आहे आणि जंगलांचे प्रमाण कमी होते आहे, ही मानवी आयुष्यासाठीच धोक्याची घंटा आहे. महाबळेश्वरला ३० वर्षापूर्वी ४०० इंच पाऊस पडायचा़ गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण २०० इंचावर आले आहे़ गेल्या ३०-४० वर्षात महाराष्ट्रातील ५० टक्के जंगलच नाहिसे झाले आहे. विदर्भातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया भागात ३० हजारावर तळी आहेत़ या तळ्यांवर घातक बेशरम गवताचे जंगल वाढल्याने पाण्याचा स्रोत कमी झाला आहे आणि डासांचे साम्राज्य वाढतेय़ वाघांच्या संरक्षणासाठी कॅरिडॉर असणे अत्यंत आवश्यक आहे पण त्याकडे दुर्लक्ष होते आहे. सरकारला सुचविलेल्या अनेक बाबींवर अजून काम झाले नाही.केवळ सरकारवर अवलंबून न राहता स्वयंसेवी संस्था व वन्यप्रेमींनी आता पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी चितमपल्ली यांनी केले. महापौर दटके म्हणाले, महानगरपालिकेची नसणारी कामेही आता पर्यावरणासाठी महापालिका करत आहे. निसर्ग आणि पर्यावरणाचे संतुलन राहावे म्हणून महापालिकेने पुढाकार घेतला आहे. महाविद्यालयानी जीवनात पर्यावरण राखणे किती महत्वाचे आहे, ते कळत नव्हते. पण आज ती किती मोठी गरज आहे, याची जाणीव होते. त्यामुळेच शहराबाहेरुन येणाऱ्या नागनदीला स्वच्छ करण्याचे अभियान मनपाने राबविले आहे. जनतेने या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. आ. अनिल सोले यांनी प्रदर्शनाच्या आयोजनाला शुभेच्छा देत सर्व नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक चैतन्य मोहाडीकर यांनी केले. संचालन डॉ़ कल्पना उपाध्याय यांनी तर आभार प्रा़ विजय घुगे यांनी मानले़ (प्रतिनिधी)