शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

मोदींकडून अपेक्षा, पण काळ हेच उत्तर

By admin | Updated: December 17, 2014 00:26 IST

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर परस्परविरोधी चर्चांना उत आला आहे. मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी असल्याचे मानले जात आहे. त्यात तथ्यही आहे पण तरीही मोदींकडून अपेक्षा आहेत

नागेश चौधरी : एस.सी. एस. व्याख्यानमाला नागपूर : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर परस्परविरोधी चर्चांना उत आला आहे. मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी असल्याचे मानले जात आहे. त्यात तथ्यही आहे पण तरीही मोदींकडून अपेक्षा आहेत कारण मोदींना ते ज्या पदावर आहेत, त्याची जाणीव आहे. पण मोदींनी केलेल्या घोषणा अद्यापही खऱ्या होताना दिसत नाही कारण मोदीना त्यांचे मंत्रीमंडळच सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे मोदी एकटे पडले आहेत. त्यामुळे मोदींकडून अपेक्षा आहेत पण त्यावर काळ हेच उत्तर असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नागेश चौधरी यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित एस. सी. एस. व्याख्यानमालेत नागेश चौधरी बोलत होते. ‘केंद्रातील सत्ता आणि आव्हाने’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. याप्रसंगी अध्यक्षस्थानी ताराचंद्र खांडेकर तर प्रमुख अतिथी म्हणून रणजित मेश्राम, डॉ. भाऊ लोखंडे, विजय चिकाटे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी नागेश चौधरी म्हणाले मोदींमुळे सारेच बदलणार असे नाही पण अपेक्षांना वाव आहे. मोदी संघाच्या वातावरणातून आले असले तरी त्यांना संविधानाचा आदर असल्याचे जाणविते. हीच मोठी गोष्ट आहे. मोदींना गोध्रा कांडासाठी दोषी ठरविण्यात येते पण शरद पवार असताना महाराष्ट्रातही असेच घडले. मुझफ्फर नगरच्या हत्याकांडाबाबतही कुणाला दोषी ठरविले जात नाही. प्रत्यक्षात मोदींना जो विरोध होतो आहे तो त्यांच्या पक्ष आणि रा. स्व. संघामुळे होतो आहे. पण आपण हे समजून घेतले पाहिजे की, मोदींनी संघाचा अंकुश मानलेला नाही. ते संघ म्हणेल तसे वागत नाहीत. त्यांनी संघाच्या विरोधातही वक्तव्य केले असून संघही त्यांच्या विरोधात बोलत असतो. मोदींना बहुजनांची जाण आहे पण काही वेळेला त्यांच्यावर विश्वास ठेवणे चूकीचे वाटते. देशाचा विकास हा त्यांचा मुद्दा पटणारा आहे. प्रत्येकचवेळी भांडवलवाद शोषण करणारा नसतो. भांडवलशाहीचा विकास झाला तर सामान्य माणसाचे जगणे उन्नत होते, हा इतिहास आहे. युरोप आणि अमेरिका त्याची उदाहरणेही आहेत. या भांडवलशाहिचा विकास करण्याचे स्वप्न मोदी पहात आहेत पण प्रशासन आणि त्यांचे मंत्रिमंडळ त्यांना सहकार्य करीत नाहीत, अशी स्थिती आहे. अशावेळी काळ हेच उत्तर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)