शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

मोदींकडून अपेक्षा, पण काळ हेच उत्तर

By admin | Updated: December 17, 2014 00:26 IST

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर परस्परविरोधी चर्चांना उत आला आहे. मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी असल्याचे मानले जात आहे. त्यात तथ्यही आहे पण तरीही मोदींकडून अपेक्षा आहेत

नागेश चौधरी : एस.सी. एस. व्याख्यानमाला नागपूर : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर परस्परविरोधी चर्चांना उत आला आहे. मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी असल्याचे मानले जात आहे. त्यात तथ्यही आहे पण तरीही मोदींकडून अपेक्षा आहेत कारण मोदींना ते ज्या पदावर आहेत, त्याची जाणीव आहे. पण मोदींनी केलेल्या घोषणा अद्यापही खऱ्या होताना दिसत नाही कारण मोदीना त्यांचे मंत्रीमंडळच सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे मोदी एकटे पडले आहेत. त्यामुळे मोदींकडून अपेक्षा आहेत पण त्यावर काळ हेच उत्तर असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नागेश चौधरी यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित एस. सी. एस. व्याख्यानमालेत नागेश चौधरी बोलत होते. ‘केंद्रातील सत्ता आणि आव्हाने’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. याप्रसंगी अध्यक्षस्थानी ताराचंद्र खांडेकर तर प्रमुख अतिथी म्हणून रणजित मेश्राम, डॉ. भाऊ लोखंडे, विजय चिकाटे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी नागेश चौधरी म्हणाले मोदींमुळे सारेच बदलणार असे नाही पण अपेक्षांना वाव आहे. मोदी संघाच्या वातावरणातून आले असले तरी त्यांना संविधानाचा आदर असल्याचे जाणविते. हीच मोठी गोष्ट आहे. मोदींना गोध्रा कांडासाठी दोषी ठरविण्यात येते पण शरद पवार असताना महाराष्ट्रातही असेच घडले. मुझफ्फर नगरच्या हत्याकांडाबाबतही कुणाला दोषी ठरविले जात नाही. प्रत्यक्षात मोदींना जो विरोध होतो आहे तो त्यांच्या पक्ष आणि रा. स्व. संघामुळे होतो आहे. पण आपण हे समजून घेतले पाहिजे की, मोदींनी संघाचा अंकुश मानलेला नाही. ते संघ म्हणेल तसे वागत नाहीत. त्यांनी संघाच्या विरोधातही वक्तव्य केले असून संघही त्यांच्या विरोधात बोलत असतो. मोदींना बहुजनांची जाण आहे पण काही वेळेला त्यांच्यावर विश्वास ठेवणे चूकीचे वाटते. देशाचा विकास हा त्यांचा मुद्दा पटणारा आहे. प्रत्येकचवेळी भांडवलवाद शोषण करणारा नसतो. भांडवलशाहीचा विकास झाला तर सामान्य माणसाचे जगणे उन्नत होते, हा इतिहास आहे. युरोप आणि अमेरिका त्याची उदाहरणेही आहेत. या भांडवलशाहिचा विकास करण्याचे स्वप्न मोदी पहात आहेत पण प्रशासन आणि त्यांचे मंत्रिमंडळ त्यांना सहकार्य करीत नाहीत, अशी स्थिती आहे. अशावेळी काळ हेच उत्तर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)