शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
5
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
6
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
7
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
8
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
9
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
10
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
12
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
13
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
14
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
15
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
16
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
17
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
18
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
19
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
20
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'

जनतेला कूटनीती नव्हे, निर्णयांची अपेक्षा

By admin | Updated: February 7, 2015 02:01 IST

लोकहिताचे निर्णय व्हावेत या अपेक्षेने जनता नेत्यांना निवडून देते. शासकीय पातळीवर सुरू असलेल्या निरनिराळ्या कूटनीतीमध्ये जनतेला अजिबात रस नसतो.

नागपूर : लोकहिताचे निर्णय व्हावेत या अपेक्षेने जनता नेत्यांना निवडून देते. शासकीय पातळीवर सुरू असलेल्या निरनिराळ्या कूटनीतीमध्ये जनतेला अजिबात रस नसतो. त्यांना हवे असतात विकासाच्या दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय. त्यामुळे लोकशाही पद्धतीत वेगाने निर्णय होणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ‘जी. एच.रायसोनी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट अ‍ॅन्ड रिसर्च’तर्फे आयोजित तिसऱ्या ‘नॅशनल एचआर कॉन्क्लेव्ह’चे शुक्रवारी सिव्हील लाईन्स येथील चिटणवीस सेंटर येथे उद्घाटन झाले. यावेळी गडकरी बोलत होते.‘द चेंजीग डायनामिक्स आॅफ एच आर’ या विषयावर केंद्रित असलेल्या या ‘कॉन्क्लेव्ह’च्या उद्घाटनप्रसंगी उद्योजक हर्ष चोप्रा, रायसोनी समूहाचे चेअरमन सुनील रायसोनी व संचालक डॉ.रवींद्र अहेर हे प्रामुख्याने उपस्थित होते. मनुष्यामध्ये आत्मविश्वास जरूर असावा परंतु अहंकार नको. त्यामुळे माणसे दुरावतात. विशेष म्हणजे प्रत्येकवेळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणे आवश्यक आहे. दृष्टिकोनातून मनुष्याचे व्यक्तिमत्त्व कळून येते. ‘एचआर‘चे काम म्हणजे संस्थेमध्ये समन्वय राखण्याची मोठी जबाबदारी असते. सहकार्य, संवाद आणि समन्वय जर योग्य असेल तर यश तर मिळतेच. शिवाय मनुष्यबळामध्ये उत्साहदेखील निर्माण करता येतो. तसेच संस्थेत खेळीमेळीचे वातावरण राहते, असे गडकरी म्हणाले.यावेळी हर्ष चोप्रा यांनी उपस्थितांना भारतातील उद्योगाला भरारी देण्यासाठी कसली आवश्यकता आहे यावर मार्गदर्शन केले. पंतप्रधानांची ‘मेक इन इंडिया’ ही संकल्पना उद्योगजगताच्या दृष्टीने चांगली आहे. जगातील अनेक देश उद्योगाच्या बाबतीत भारताच्या समोर आहेत. आपल्याकडे उद्योग स्थापन करण्यासाठी कायद्याची बंधने आहेत व येथे उद्योग स्थापन करणे ही किचकट प्रक्रिया आहे. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून विदेशातून येथे उद्योग येण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असे प्रतिपाद चोप्रा यांनी केले. ‘कॉन्क्लेव्ह’चे प्रास्ताविक सुनील रायसोनी यांनी केले. राजीव खुराणा, आर.एन.पटेल. डॉ.बी.आर.सिंह, संतोष पनिक्कर, गोपाल नायर, विजय देशपांडे, विहार राखुंडे, हर्षद पै, हिरेंद्र बढिये, राजेश जैन या तज्ज्ञांनी या ‘कॉन्क्लेव्ह’मध्ये विविध मुद्यांवर मार्गदर्शन केले. बंगळुरू येथील उद्योजक डॉ.उषा मोहनदास यांच्या व्याख्यानाने या ‘कॉन्क्लेव्ह’चा समारोप झाला. कार्यक्रमाचे संचालन संचालन शेफाली मनसाता यांनी केले. (प्रतिनिधी)