शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

जनतेला कूटनीती नव्हे, निर्णयांची अपेक्षा

By admin | Updated: February 7, 2015 02:01 IST

लोकहिताचे निर्णय व्हावेत या अपेक्षेने जनता नेत्यांना निवडून देते. शासकीय पातळीवर सुरू असलेल्या निरनिराळ्या कूटनीतीमध्ये जनतेला अजिबात रस नसतो.

नागपूर : लोकहिताचे निर्णय व्हावेत या अपेक्षेने जनता नेत्यांना निवडून देते. शासकीय पातळीवर सुरू असलेल्या निरनिराळ्या कूटनीतीमध्ये जनतेला अजिबात रस नसतो. त्यांना हवे असतात विकासाच्या दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय. त्यामुळे लोकशाही पद्धतीत वेगाने निर्णय होणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ‘जी. एच.रायसोनी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट अ‍ॅन्ड रिसर्च’तर्फे आयोजित तिसऱ्या ‘नॅशनल एचआर कॉन्क्लेव्ह’चे शुक्रवारी सिव्हील लाईन्स येथील चिटणवीस सेंटर येथे उद्घाटन झाले. यावेळी गडकरी बोलत होते.‘द चेंजीग डायनामिक्स आॅफ एच आर’ या विषयावर केंद्रित असलेल्या या ‘कॉन्क्लेव्ह’च्या उद्घाटनप्रसंगी उद्योजक हर्ष चोप्रा, रायसोनी समूहाचे चेअरमन सुनील रायसोनी व संचालक डॉ.रवींद्र अहेर हे प्रामुख्याने उपस्थित होते. मनुष्यामध्ये आत्मविश्वास जरूर असावा परंतु अहंकार नको. त्यामुळे माणसे दुरावतात. विशेष म्हणजे प्रत्येकवेळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणे आवश्यक आहे. दृष्टिकोनातून मनुष्याचे व्यक्तिमत्त्व कळून येते. ‘एचआर‘चे काम म्हणजे संस्थेमध्ये समन्वय राखण्याची मोठी जबाबदारी असते. सहकार्य, संवाद आणि समन्वय जर योग्य असेल तर यश तर मिळतेच. शिवाय मनुष्यबळामध्ये उत्साहदेखील निर्माण करता येतो. तसेच संस्थेत खेळीमेळीचे वातावरण राहते, असे गडकरी म्हणाले.यावेळी हर्ष चोप्रा यांनी उपस्थितांना भारतातील उद्योगाला भरारी देण्यासाठी कसली आवश्यकता आहे यावर मार्गदर्शन केले. पंतप्रधानांची ‘मेक इन इंडिया’ ही संकल्पना उद्योगजगताच्या दृष्टीने चांगली आहे. जगातील अनेक देश उद्योगाच्या बाबतीत भारताच्या समोर आहेत. आपल्याकडे उद्योग स्थापन करण्यासाठी कायद्याची बंधने आहेत व येथे उद्योग स्थापन करणे ही किचकट प्रक्रिया आहे. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून विदेशातून येथे उद्योग येण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असे प्रतिपाद चोप्रा यांनी केले. ‘कॉन्क्लेव्ह’चे प्रास्ताविक सुनील रायसोनी यांनी केले. राजीव खुराणा, आर.एन.पटेल. डॉ.बी.आर.सिंह, संतोष पनिक्कर, गोपाल नायर, विजय देशपांडे, विहार राखुंडे, हर्षद पै, हिरेंद्र बढिये, राजेश जैन या तज्ज्ञांनी या ‘कॉन्क्लेव्ह’मध्ये विविध मुद्यांवर मार्गदर्शन केले. बंगळुरू येथील उद्योजक डॉ.उषा मोहनदास यांच्या व्याख्यानाने या ‘कॉन्क्लेव्ह’चा समारोप झाला. कार्यक्रमाचे संचालन संचालन शेफाली मनसाता यांनी केले. (प्रतिनिधी)