शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

अजनी वनाचे अस्तित्व आता राज्य शासनाच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:07 IST

निशांत वानखेडे नागपूर : वृक्ष संवर्धन अधिनियम १९७५ मध्ये राज्य शासनाने केलेल्या सुधारणांना कायदेशीर मान्यता देण्यात आली असून त्याची ...

निशांत वानखेडे

नागपूर : वृक्ष संवर्धन अधिनियम १९७५ मध्ये राज्य शासनाने केलेल्या सुधारणांना कायदेशीर मान्यता देण्यात आली असून त्याची अंमलबजावणी वेगाने केली जात आहे. त्यामुळे एनएचएआयच्या आयएमएस प्रकल्पासाठी ताेडण्यात येणाऱ्या हजाराे झाडांचे अस्तित्व आता महापालिका नाही तर राज्य शासनावर अवलंबून राहणार आहे. शासनातर्फे स्थापन हाेणारे राज्य वृक्ष प्राधिकरणाकडे हा विषय वळविला जाईल. या निर्णयाने आठ-दहा महिन्यापासून झाडे वाचविण्यासाठी लढणाऱ्या पर्यावरण कार्यकर्त्यांना माेठा दिलासा मिळाला आहे.

राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाचे वृक्ष संवर्धन कायद्याबाबतचे परिपत्रक गुरुवारी सर्व जिल्हाधिकारी, महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदेला निर्गमित करण्यात आले आहे. जीआरनुसार कायद्यातील सुधारणा तात्काळ प्रभावाने लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कायद्यातील सुधारणानुसार ५० पेक्षा अधिक वय असलेल्या हेरिटेज वृक्षांचे संवर्धन करणे आणि ५ पेक्षा अधिक वय असलेले २०० पेक्षा अधिक झाडे कापायचे असल्यास ते प्रकरण राज्य वृक्ष प्राधिकरणाकडे वर्ग करणे, हे दाेन मुद्दे महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या इंटर माॅडेल स्टेशन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी महापालिकेने ४९३० झाडे ताेडण्याबाबत आक्षेप मागितले आहेत. विशेष म्हणजे असंख्य झाडे हेरिटेज गटात माेडत असल्याने अजनी आयएमएसचे प्रकरण आता राज्याकडे गेले आहे. महापालिका प्रशासनाने याबाबत दुजाेरा दिला आहे. जीआरनुसार हे प्रकरण राज्य शासनाच्या अखत्यारित गेल्याने राज्याच्या निर्देशानुसार पुढची कारवाई करण्यात येईल, असे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

यापुढे काय हाेईल?

- सर्वात आधी शासन राज्य वृक्ष प्राधिकरण व स्थानिक वृक्ष प्राधिकरणाची स्थापना करेल. या दाेन्ही संवैधानिक प्राधिकरणात तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती बंधनकारक राहणार आहे.

- स्थानिक प्राधिकरणाला तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात अजनी वन परिसरातील हेरिटेज वृक्षांची गणना करावी लागेल व त्यांच्या संवर्धनाचा आराखडा तयार करून राज्याकडे सादर करावा लागेल.

- हेरिटेज वृक्षांची विनापरवानगी किंवा अवैध कटाई केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कापण्यापेक्षा आहे त्या ठिकाणी संवर्धन करण्यावर भर देण्यात येईल.

- आयएमएससाठी ऑफिशियली ५००० झाडे ताेडण्याची परवानगी मागितल्याने राज्य प्राधिकरणच यावर निर्णय घेईल.

- राज्य प्राधिकरणाचा निर्णय अमान्य असल्यास स्थानिक प्राधिकरण पुन्हा आक्षेप घेऊ शकेल.

राज्याने त्वरित कारवाई करावी

पर्यावरणवाद्यांनी शासनाच्या या परिपत्रकाचे स्वागत केले आहे. राज्य शासनाने त्वरित अजनीवनाचे प्रकरण आपल्या हाती घ्यावे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हस्तक्षेप करून हजाराे झाडांचा बळी जाण्यापासून वाचवावे, अशी मागणी करणारे निवेदन अनसूया काळे-छाबरानी, कुणाल माैर्य यांनी केले आहे.

- ४५०० वर आक्षेप, सुनावणी हाेणार

दरम्यान अजनी वनातील ४९३० झाडे कापण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने आक्षेप मागविले हाेते व आक्षेप नाेंदविण्याची तारीख ३० जूनपर्यंत वाढविली हाेती. मनपाचे उद्यान अधिक्षक अमाेल चाैरपगार यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ४५०० च्यावर आक्षेप नाेंदविण्यात आले आहेत. प्रकरण राज्याकडे असले तरी जनसुनावणी मात्र हाेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.