शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

अंतिम स्वरूप प्राप्त आदेशाची अंमलबजावणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2022 19:19 IST

Nagpur News न्यायालयाच्या एखाद्या आदेशाला अंतिम स्वरूप प्राप्त झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणे संबंधित पक्षकारांसाठी बंधनकारक आहे असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले.

ठळक मुद्देसुधारित कायदे बाधा ठरत नाहीत

नागपूर : न्यायालयाच्या एखाद्या आदेशाला अंतिम स्वरूप प्राप्त झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणे संबंधित पक्षकारांसाठी बंधनकारक आहे. पुढच्या काळात आलेले सुधारित कायदे अशा आदेशाच्या अंमलबजावणीमध्ये बाधा निर्माण करू शकत नाहीत, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले.

न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व अनिल पानसरे यांनी हा निर्णय दिला. हे प्रकरण यवतमाळ जिल्हा परिषदेचे सहायक शिक्षक राजेश चंदन यांच्याशी संबंधित आहे. त्यांची २९ जून १९९५ रोजी अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने २३ ऑगस्ट २०१६ रोजी त्यांचा धोबा-अनुसूचित जमातीचा दावा नामंजूर केला. त्याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

२० डिसेंबर २०१६ रोजी उच्च न्यायालयाने पडताळणी समितीचा निर्णय कायम ठेवला. सोबतच चंदन यांच्या सेवेला काही अटींसह संरक्षणही प्रदान केले. त्याविरुद्ध जिल्हा परिषदेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली नाही. परिणामी, त्या आदेशाला अंतिम स्वरूप प्राप्त झाले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे राज्य सरकारने २१ डिसेंबर २०१९ रोजी जारी केलेल्या जीआरनुसार चंदन यांना ३१ डिसेंबर २०१९ रोजी अकरा महिने कालावधीच्या अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले. त्यानंतर त्यांची सेवा आपोआप समाप्त होणार होती. त्याकरिता, चंदन यांनी पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. उच्च न्यायालयाने त्यावरील निर्णयात वरील बाब स्पष्ट करून चंदन यांना सेवेत कायम ठेवण्याचे निर्देश दिले. चंदन यांच्यातर्फे ॲड. शैलेश नारनवरे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय