शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

अंतिम स्वरूप प्राप्त आदेशाची अंमलबजावणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2022 19:19 IST

Nagpur News न्यायालयाच्या एखाद्या आदेशाला अंतिम स्वरूप प्राप्त झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणे संबंधित पक्षकारांसाठी बंधनकारक आहे असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले.

ठळक मुद्देसुधारित कायदे बाधा ठरत नाहीत

नागपूर : न्यायालयाच्या एखाद्या आदेशाला अंतिम स्वरूप प्राप्त झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणे संबंधित पक्षकारांसाठी बंधनकारक आहे. पुढच्या काळात आलेले सुधारित कायदे अशा आदेशाच्या अंमलबजावणीमध्ये बाधा निर्माण करू शकत नाहीत, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले.

न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व अनिल पानसरे यांनी हा निर्णय दिला. हे प्रकरण यवतमाळ जिल्हा परिषदेचे सहायक शिक्षक राजेश चंदन यांच्याशी संबंधित आहे. त्यांची २९ जून १९९५ रोजी अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने २३ ऑगस्ट २०१६ रोजी त्यांचा धोबा-अनुसूचित जमातीचा दावा नामंजूर केला. त्याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

२० डिसेंबर २०१६ रोजी उच्च न्यायालयाने पडताळणी समितीचा निर्णय कायम ठेवला. सोबतच चंदन यांच्या सेवेला काही अटींसह संरक्षणही प्रदान केले. त्याविरुद्ध जिल्हा परिषदेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली नाही. परिणामी, त्या आदेशाला अंतिम स्वरूप प्राप्त झाले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे राज्य सरकारने २१ डिसेंबर २०१९ रोजी जारी केलेल्या जीआरनुसार चंदन यांना ३१ डिसेंबर २०१९ रोजी अकरा महिने कालावधीच्या अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले. त्यानंतर त्यांची सेवा आपोआप समाप्त होणार होती. त्याकरिता, चंदन यांनी पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. उच्च न्यायालयाने त्यावरील निर्णयात वरील बाब स्पष्ट करून चंदन यांना सेवेत कायम ठेवण्याचे निर्देश दिले. चंदन यांच्यातर्फे ॲड. शैलेश नारनवरे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय