शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

बेशिस्त वाहनचालकांना चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:12 IST

वाहतूक शाखेच्या चेंबर तीनच्या पथकाने नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविणाºयांवर धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यांत पाच कोटींचे तडजोड शुल्क वसूलअवघ्या तीन महिन्यांत १,७१४ वाहनचालकांवर कारवाईचेंबर तीनच्या वाहतूक पोलिसांचा धडाका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहतूक शाखेच्या चेंबर तीनच्या पथकाने नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविणाºयांवर धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. अवघ्या सहा महिन्यांत पाचपैकी चेंबरच्या तीन पथकाने पाच कोटी, एक लाख रुपयांचे तडजोड शुल्क वसूल केले आहे.गेल्या काही महिन्यांत वाहतूक शाखेच्या पोलिसांसोबत वाद घालणे, मारहाण करणे आणि त्यांच्या अंगावर वाहने घालण्याचाही प्रकार वाढला आहे. या गैरप्रकारामागची पार्श्वभूमी लक्षात घेता वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांनी कडक मात्र कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश सर्व वाहतूक शाखेच्या अधिकारी-कर्मचाºयांना दिले. शहरातील वाहतूक शाखेच्या चेंबर तीनचे प्रमुख वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक बागुल यांनी प्रारंभी आपल्याच अधिनस्थ अधिकारी-कर्मचाºयांना तणावमुक्त करण्यासाठी योग, प्राणायाम, ध्यानसाधना आदी शिबिराचे आयोजन करून त्यांना शिस्त लावली. त्यानंतर शाळा, महाविद्यालये, मॉल, बाजारपेठा तसेच शहरातील गर्दीच्या ठिकाणी सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने वाहनचालकांसाठी जनजागरणाचे विविध उपक्रम राबविले. त्यांना वाहतूकीच्या नियमांची माहिती दिली. त्यानंतर बागुल यांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईची धडक मोहीम सुरू केली. धोकादायक पद्धतीने, वेगात वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, ट्रीपल सिट दुचाकी चालविणे, चुकीच्या बाजूने (राँग साईड) वाहने चालविणे, मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी भरून वाहने चालविणे यांच्याविरुद्ध कारवाईची धडक मोहीम राबविणे सुरू केल्याने वाहतूक शाखेला सहा महिन्यांत पाच कोटी, एक लाख रुपयांचा महसूल दंडापोटी मिळाला. अवघ्या तीन महिन्यात विविध वाहनचालकांचे ३७ हजार २९७ हार्ड चलान बनविण्यात आले. तर, ५३ हजार ९१४ बेशिस्त वाहनचालकांना ई-चालान पाठविण्यात आले.कारवाई अन् समुपदेशनहीपोलीस निरीक्षक बागुल यांच्या माहितीनुसार, २५ ते २८ आॅक्टोबर या तीन दिवसांत विशेष अभियान राबविण्यात आले. या अभियानात आॅटोचालकांना बैठक व्यवस्था नीट करणे, गणवेश घालून वाहन चालविणे, मर्यादित वेगातच वाहन चालविणे, मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी न घेणे, अवैध प्रवासी वाहतूक न करणे आदींबाबत सूचना, समुपदेशन करण्यात आले. त्याला न जुमानणाºया १७१४ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यात ५६२ आॅटोचालकांचाही समावेश आहे. या कारवाई दरम्यान २६० वाहने ताब्यात घेण्यात आली. विशेष म्हणजे, बेशिस्त आॅटोचालकांना वठणीवर आणण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेतून मोठ्या प्रमाणात ई-चालान पाठवून ३१ लाख, ६८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. पोलीस निरीक्षक वाय. एम. सोलसे, सहायक निरीक्षक धनराज निळे, पोलीस उपनिरीक्षक आखरे, सावरकर, पवार, राठोड आणि केदारे तसेच त्यांच्या सहकाºयांचाही या मोहिमेत विशेष सहभाग असल्याचे या पथकाचे प्रमुख अशोक बागुल यांनी सांगितले. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहील, असे बागुल यांनी लोकमतला सांगितले.