शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त वाहनचालकांना चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:12 IST

वाहतूक शाखेच्या चेंबर तीनच्या पथकाने नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविणाºयांवर धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यांत पाच कोटींचे तडजोड शुल्क वसूलअवघ्या तीन महिन्यांत १,७१४ वाहनचालकांवर कारवाईचेंबर तीनच्या वाहतूक पोलिसांचा धडाका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहतूक शाखेच्या चेंबर तीनच्या पथकाने नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविणाºयांवर धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. अवघ्या सहा महिन्यांत पाचपैकी चेंबरच्या तीन पथकाने पाच कोटी, एक लाख रुपयांचे तडजोड शुल्क वसूल केले आहे.गेल्या काही महिन्यांत वाहतूक शाखेच्या पोलिसांसोबत वाद घालणे, मारहाण करणे आणि त्यांच्या अंगावर वाहने घालण्याचाही प्रकार वाढला आहे. या गैरप्रकारामागची पार्श्वभूमी लक्षात घेता वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांनी कडक मात्र कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश सर्व वाहतूक शाखेच्या अधिकारी-कर्मचाºयांना दिले. शहरातील वाहतूक शाखेच्या चेंबर तीनचे प्रमुख वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक बागुल यांनी प्रारंभी आपल्याच अधिनस्थ अधिकारी-कर्मचाºयांना तणावमुक्त करण्यासाठी योग, प्राणायाम, ध्यानसाधना आदी शिबिराचे आयोजन करून त्यांना शिस्त लावली. त्यानंतर शाळा, महाविद्यालये, मॉल, बाजारपेठा तसेच शहरातील गर्दीच्या ठिकाणी सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने वाहनचालकांसाठी जनजागरणाचे विविध उपक्रम राबविले. त्यांना वाहतूकीच्या नियमांची माहिती दिली. त्यानंतर बागुल यांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईची धडक मोहीम सुरू केली. धोकादायक पद्धतीने, वेगात वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, ट्रीपल सिट दुचाकी चालविणे, चुकीच्या बाजूने (राँग साईड) वाहने चालविणे, मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी भरून वाहने चालविणे यांच्याविरुद्ध कारवाईची धडक मोहीम राबविणे सुरू केल्याने वाहतूक शाखेला सहा महिन्यांत पाच कोटी, एक लाख रुपयांचा महसूल दंडापोटी मिळाला. अवघ्या तीन महिन्यात विविध वाहनचालकांचे ३७ हजार २९७ हार्ड चलान बनविण्यात आले. तर, ५३ हजार ९१४ बेशिस्त वाहनचालकांना ई-चालान पाठविण्यात आले.कारवाई अन् समुपदेशनहीपोलीस निरीक्षक बागुल यांच्या माहितीनुसार, २५ ते २८ आॅक्टोबर या तीन दिवसांत विशेष अभियान राबविण्यात आले. या अभियानात आॅटोचालकांना बैठक व्यवस्था नीट करणे, गणवेश घालून वाहन चालविणे, मर्यादित वेगातच वाहन चालविणे, मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी न घेणे, अवैध प्रवासी वाहतूक न करणे आदींबाबत सूचना, समुपदेशन करण्यात आले. त्याला न जुमानणाºया १७१४ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यात ५६२ आॅटोचालकांचाही समावेश आहे. या कारवाई दरम्यान २६० वाहने ताब्यात घेण्यात आली. विशेष म्हणजे, बेशिस्त आॅटोचालकांना वठणीवर आणण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेतून मोठ्या प्रमाणात ई-चालान पाठवून ३१ लाख, ६८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. पोलीस निरीक्षक वाय. एम. सोलसे, सहायक निरीक्षक धनराज निळे, पोलीस उपनिरीक्षक आखरे, सावरकर, पवार, राठोड आणि केदारे तसेच त्यांच्या सहकाºयांचाही या मोहिमेत विशेष सहभाग असल्याचे या पथकाचे प्रमुख अशोक बागुल यांनी सांगितले. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहील, असे बागुल यांनी लोकमतला सांगितले.