शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

उत्पादनातील घट होण्यामागे अत्याधिक लालसा कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्रात जलवायू परिवर्तनामुळे विदर्भासह मराठवाडा आणि खानदेशात कापूस, सोयाबीन, चणा आणि गव्हाच्या उत्पादनावर परिणाम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्रात जलवायू परिवर्तनामुळे विदर्भासह मराठवाडा आणि खानदेशात कापूस, सोयाबीन, चणा आणि गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. भविष्यात याचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे. अलीकडेच आलेल्या ‘आय इन्स्टिट्यूूट फॉर सस्टेनेबल कम्युनिटीज’च्या सर्वेक्षण अहवालात याचा उल्लेख झाला आहे. जलवायू परिवर्तनासोबतच अत्याधिक उत्पादन घेण्याच्या लालसेपोटी उत्पादकता घटत आहे, अशी माहिती नीरीचे माजी मुख्य वैज्ञानिक तथा जलवायू परिवर्तन विभागाचे प्रमुख डॉ. जय शंकर पाण्डेय यांनी ‘लोकमत’ला दिली.

डॉ. पाण्डेय म्हणाले, प्रत्येक वस्तूप्रमाणे मातीचीदेखील क्षमता असते. त्यानुसारच तिची उत्पादकता असते. मात्र, क्षमतेपेक्षा अधिक उत्पादन घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. परिणामत: अधिक उत्पादनाऐवजी उत्पादकता घटत चालली आहे. विकासातील सातत्य (सस्टेनेबल डेव्हलपमेंट)साठी इंडस्ट्रियल, कमर्शियल, फॉरेस्ट, ॲग्रीकल्चर अँड रेसिडेन्सियल (आयसीएफएआर) ॲक्टिव्हिटीजच्या प्रमाणाचे पालन करणे आवश्यक आहे. हे योग्य पालन झाले तरच आम्हाला विकासातील सातत्य साधता येईल. यात थोडा जरी असमतोल झाला तर जेवणात मीठ, हळद, तेल, तिखट कमीअधिक झाल्यावर असमतोल होतो, तसाच यातही होईल.

ते म्हणाले, पूर्वी कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी काही काळासाठी जमीन पडीत ठेवली जायची. मात्र, आज असे होत नाही. एकापाठोपाठ एक उत्पन्न घेण्यावर भर असतो. यामुळे मातीच्या क्षमतेवर ताण येतो. त्याचा परिणाम उत्पादकता घटण्यात होतो.

...

प्रत्येक जिल्ह्यासाठी पर्यावरण आरोग्य कार्ड बनावे

डॉ. पाण्डेय म्हणाले, आयसीएफएआरचे प्रमाण प्रत्येक क्षेत्रासाठी वेगवेगळे असते. यामुळे प्रत्येक जिल्ह्याचे पर्यावरण आरोग्य कार्ड तयार केले जावे. त्यानुसारच संबंधित जिल्ह्यात उपक्रम राबविले जावे. याच्या अंमलबजावणीसाठी संबंधित क्षेत्राशी जुळलेल्या प्रत्येक स्तरातील लोकांना सहभागी केले गेले तरच याचे सकारात्मक परिणाम दिसतील. ...

असा आहे अहवाल

इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल कम्युनिटीजचा ‘महाराष्ट्रातील कृषीविषयक जलवायू बदलाचे परिणाम’ असे शीर्षक असलेल्या अहवालात मागील ३० वर्षांतील (१९८९ ते २०१८) मधील आठवडानिहाय आकड्यांचे विश्लेषण करून विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत होणाऱ्या पुढील ३० वर्षांतील (२०२१ ते २०५०) संभाव्य पर्जन्यमान आणि उष्णतामानाच्या आकड्यांचा अंदाज लावण्यात आला आहे. यानुसार राज्यातील सोयाबीन, कापूस, गहू आणि चणा ही चार प्रमुख पिके प्रभावित होण्याचा अनुमान आहे.

...