शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

परीक्षा ओळखपत्रांसाठी विद्यार्थ्यांची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:10 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीकॉम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारचा दिवस अक्षरश: धावपळीचा ठरला.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : ओळखपत्रांमध्ये त्रुटी, जबाबदार कोण?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीकॉम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारचा दिवस अक्षरश: धावपळीचा ठरला. परीक्षा सुरू होण्याच्या ऐन एक दिवस अगोदर ओळखपत्रासाठी त्यांची पायपीट सुरू होती. महाविद्यालयांनी अगोदर ओळखपत्रे डाऊनलोड का केली नाहीत, असा प्रश्न विद्यापीठाकडून करण्यात आला आहे, तर विद्यापीठाने अनेक ओळखपत्रांमध्ये चुका केल्या असल्याचा आरोप महाविद्यालयांकडून करण्यात आला आहे. मात्र याचा नाहक मनस्ताप विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.विद्यापीठातर्फे परीक्षेच्या २ ते ३ आठवडे अगोदरच ‘आॅनलाईन’ परीक्षा ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात येते, असे दावे करण्यात येतात. यंदादेखील अनेक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना अगोदरच ओळखपत्र मिळाले. मात्र बीकॉम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मात्र ओळखपत्रासाठी परीक्षेच्या पूर्वसंध्येपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. अनेक विद्यार्थ्यांची ओळखपत्रे ‘डाऊनलोड’ होत नसल्याचे महाविद्यालयांतर्फे सांगण्यात आले. तर बºयाच विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रांमध्ये चुका असल्याचे दिसून आले. त्यामुळे परीक्षा भवनात विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. शंभरहून अधिक विद्यार्थी ओळखपत्राच्या प्रतीक्षेत होते.महाविद्यालयांना १८ आॅक्टोबररोजी ‘रोल लिस्ट’ पाठविली होती. त्या आधारे त्यांना संबंधित संकेतस्थळावरून परीक्षा ओळखपत्र ‘डाऊनलोड’ करायचे होते. मात्र महाविद्यालयांनी वेळेवर ते काम केले नाही. सोबतच विद्यार्थ्यांची माहिती महाविद्यालयांनी चुकीची दिली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावरच परीक्षा ओळखपत्र तयार करण्यात आले, अशी माहिती परीक्षा विभागातील सूत्रांनी दिली.महाविद्यालयांनी तक्रार का केली नाही ?यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांना संपर्क केला असता, महाविद्यालयांकडून एकही अधिकृत तक्रार आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अगोदरच ओळखपत्र ‘डाऊनलोड’ करण्याची सुविधा असतानादेखील महाविद्यालये वेळेवरच काम करतात. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. जर ओळखपत्रांमध्ये त्रुटी होत्या, तर महाविद्यालयांनी तक्रार का केली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, जर विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रात त्रुटी असतील, तर त्या लगेच सुधारण्यात येतील, असेदेखील त्यांनी सांगितले.