शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

परीक्षा ओळखपत्रांसाठी विद्यार्थ्यांची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:10 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीकॉम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारचा दिवस अक्षरश: धावपळीचा ठरला.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : ओळखपत्रांमध्ये त्रुटी, जबाबदार कोण?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीकॉम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारचा दिवस अक्षरश: धावपळीचा ठरला. परीक्षा सुरू होण्याच्या ऐन एक दिवस अगोदर ओळखपत्रासाठी त्यांची पायपीट सुरू होती. महाविद्यालयांनी अगोदर ओळखपत्रे डाऊनलोड का केली नाहीत, असा प्रश्न विद्यापीठाकडून करण्यात आला आहे, तर विद्यापीठाने अनेक ओळखपत्रांमध्ये चुका केल्या असल्याचा आरोप महाविद्यालयांकडून करण्यात आला आहे. मात्र याचा नाहक मनस्ताप विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.विद्यापीठातर्फे परीक्षेच्या २ ते ३ आठवडे अगोदरच ‘आॅनलाईन’ परीक्षा ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात येते, असे दावे करण्यात येतात. यंदादेखील अनेक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना अगोदरच ओळखपत्र मिळाले. मात्र बीकॉम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मात्र ओळखपत्रासाठी परीक्षेच्या पूर्वसंध्येपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. अनेक विद्यार्थ्यांची ओळखपत्रे ‘डाऊनलोड’ होत नसल्याचे महाविद्यालयांतर्फे सांगण्यात आले. तर बºयाच विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रांमध्ये चुका असल्याचे दिसून आले. त्यामुळे परीक्षा भवनात विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. शंभरहून अधिक विद्यार्थी ओळखपत्राच्या प्रतीक्षेत होते.महाविद्यालयांना १८ आॅक्टोबररोजी ‘रोल लिस्ट’ पाठविली होती. त्या आधारे त्यांना संबंधित संकेतस्थळावरून परीक्षा ओळखपत्र ‘डाऊनलोड’ करायचे होते. मात्र महाविद्यालयांनी वेळेवर ते काम केले नाही. सोबतच विद्यार्थ्यांची माहिती महाविद्यालयांनी चुकीची दिली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावरच परीक्षा ओळखपत्र तयार करण्यात आले, अशी माहिती परीक्षा विभागातील सूत्रांनी दिली.महाविद्यालयांनी तक्रार का केली नाही ?यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांना संपर्क केला असता, महाविद्यालयांकडून एकही अधिकृत तक्रार आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अगोदरच ओळखपत्र ‘डाऊनलोड’ करण्याची सुविधा असतानादेखील महाविद्यालये वेळेवरच काम करतात. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. जर ओळखपत्रांमध्ये त्रुटी होत्या, तर महाविद्यालयांनी तक्रार का केली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, जर विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रात त्रुटी असतील, तर त्या लगेच सुधारण्यात येतील, असेदेखील त्यांनी सांगितले.